शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

रत्नागिरी : पोलीस बंदोबस्तात तालुक्यांमध्ये धान्य वाहतूक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 16:28 IST

स्थानिक वाहतूकदार आणि शासकीय ठेकेदार यांच्यातील वादामुळे नोव्हेंबर महिन्याची धान्याची वाहतूक खोळंबली असल्याने जनतेची गैरसोय होऊ नये, यासाठी बुधवारपासून अन्न महामंडळाच्या गोदामापासून पोलीस बंदोबस्तात सर्व तालुक्यांमध्ये धान्य वाहतूक सुरू करण्यात आली आहे. या वाहतुकीत अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास पुरवठा विभागाकडून गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. ​

ठळक मुद्देपोलीस बंदोबस्तात तालुक्यांमध्ये धान्य वाहतूक सुरूअडथळा आणण्यांवर गुन्हे दाखल करणार

रत्नागिरी : स्थानिक वाहतूकदार आणि शासकीय ठेकेदार यांच्यातील वादामुळे नोव्हेंबर महिन्याची धान्याची वाहतूक खोळंबली असल्याने जनतेची गैरसोय होऊ नये, यासाठी बुधवारपासून अन्न महामंडळाच्या गोदामापासून पोलीस बंदोबस्तात सर्व तालुक्यांमध्ये धान्य वाहतूक सुरू करण्यात आली आहे. या वाहतुकीत अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास पुरवठा विभागाकडून गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.स्थानिक वाहतूकदारांना डावलून क्रिएटिव्ह क्रेन या शासननियुक्त ठेकेदाराकडून सध्या धान्य वाहतूक केली जात आहे. त्यामुळे स्थानिक ठेकेदारांवर अन्याय होत असल्याचा आरोप स्थानिक वाहतूकदारांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे मध्यंतरी शासननियुक्त ठेकेदाराच्या गाड्या स्थानिक वाहतूकदारांनी परत पाठविल्या होत्या.जिल्ह्यातील सर्वच धान्य दुकानांमधून सप्टेंबर महिन्यातील धान्याची उचल झाली असून, आॅक्टोबर महिन्याच्या एकूण ६६०० टन धान्यापैकी ६४ टक्के धान्याची उचल पॉस मशीनद्वारे करण्यात आली आहे. मात्र, शासकीय ठेकेदाराची वाहने भीतीपोटी कमी करण्यात आल्याने नोव्हेंबरच्या धान्याच्या वाहतुकीत अडथळा निर्माण झाला आहे.

पुढील महिन्याच्या सहा तारखेपासून दिवाळी असल्याने जनतेची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्यासोबत मंगळवारी बैठक घेऊन पोलीस बंदोबस्तात तालुक्यांमध्ये धान्य वाहतूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शहरानजीकच्या औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रातील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामापासून पोलीस बंदोबस्तात धान्याची वाहतूक सर्व तालुक्यांना सुरू झाली आहे.जनतेला वेळेत धान्य मिळावे, यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे दक्ष असून, याठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रत्येक तालुक्याला जाणाऱ्या धान्याच्या वाहनासोबत पोलीस कर्मचारी देण्यात येत आहे.

पोलीस प्रशासन आणि पुरवठा विभाग यांच्या सहकार्याने ही धान्याची वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. त्यामुळे जनतेला दिवाळीचे नियतन वेळेत मिळणार असल्याचा दावा जिल्हा पुरवठा विभागाकडून करण्यात आला आहे. 

नोव्हेंबर महिन्यातील धान्याच्या वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता. मात्र, पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने ही वाहतूक आता सुरळीत सुरू झाली आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याचे धान्याचे वितरण जनतेला वेळेत होणार आहे. या वाहतुकीत अडथळा निर्माण करून गैरसोय निर्माण करण्याचा प्रयत्न करणाºया दोषी व्यक्तींवर यापुढेही गुन्हे दाखल करण्यात येतील.डॉ. जयकृष्ण फड, जिल्हा पुरवठा अधिकारी, रत्नागिरी

टॅग्स :GovernmentसरकारRatnagiriरत्नागिरी