शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

रत्नागिरी : पोलीस बंदोबस्तात तालुक्यांमध्ये धान्य वाहतूक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 16:28 IST

स्थानिक वाहतूकदार आणि शासकीय ठेकेदार यांच्यातील वादामुळे नोव्हेंबर महिन्याची धान्याची वाहतूक खोळंबली असल्याने जनतेची गैरसोय होऊ नये, यासाठी बुधवारपासून अन्न महामंडळाच्या गोदामापासून पोलीस बंदोबस्तात सर्व तालुक्यांमध्ये धान्य वाहतूक सुरू करण्यात आली आहे. या वाहतुकीत अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास पुरवठा विभागाकडून गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. ​

ठळक मुद्देपोलीस बंदोबस्तात तालुक्यांमध्ये धान्य वाहतूक सुरूअडथळा आणण्यांवर गुन्हे दाखल करणार

रत्नागिरी : स्थानिक वाहतूकदार आणि शासकीय ठेकेदार यांच्यातील वादामुळे नोव्हेंबर महिन्याची धान्याची वाहतूक खोळंबली असल्याने जनतेची गैरसोय होऊ नये, यासाठी बुधवारपासून अन्न महामंडळाच्या गोदामापासून पोलीस बंदोबस्तात सर्व तालुक्यांमध्ये धान्य वाहतूक सुरू करण्यात आली आहे. या वाहतुकीत अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास पुरवठा विभागाकडून गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.स्थानिक वाहतूकदारांना डावलून क्रिएटिव्ह क्रेन या शासननियुक्त ठेकेदाराकडून सध्या धान्य वाहतूक केली जात आहे. त्यामुळे स्थानिक ठेकेदारांवर अन्याय होत असल्याचा आरोप स्थानिक वाहतूकदारांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे मध्यंतरी शासननियुक्त ठेकेदाराच्या गाड्या स्थानिक वाहतूकदारांनी परत पाठविल्या होत्या.जिल्ह्यातील सर्वच धान्य दुकानांमधून सप्टेंबर महिन्यातील धान्याची उचल झाली असून, आॅक्टोबर महिन्याच्या एकूण ६६०० टन धान्यापैकी ६४ टक्के धान्याची उचल पॉस मशीनद्वारे करण्यात आली आहे. मात्र, शासकीय ठेकेदाराची वाहने भीतीपोटी कमी करण्यात आल्याने नोव्हेंबरच्या धान्याच्या वाहतुकीत अडथळा निर्माण झाला आहे.

पुढील महिन्याच्या सहा तारखेपासून दिवाळी असल्याने जनतेची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्यासोबत मंगळवारी बैठक घेऊन पोलीस बंदोबस्तात तालुक्यांमध्ये धान्य वाहतूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शहरानजीकच्या औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रातील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामापासून पोलीस बंदोबस्तात धान्याची वाहतूक सर्व तालुक्यांना सुरू झाली आहे.जनतेला वेळेत धान्य मिळावे, यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे दक्ष असून, याठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रत्येक तालुक्याला जाणाऱ्या धान्याच्या वाहनासोबत पोलीस कर्मचारी देण्यात येत आहे.

पोलीस प्रशासन आणि पुरवठा विभाग यांच्या सहकार्याने ही धान्याची वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. त्यामुळे जनतेला दिवाळीचे नियतन वेळेत मिळणार असल्याचा दावा जिल्हा पुरवठा विभागाकडून करण्यात आला आहे. 

नोव्हेंबर महिन्यातील धान्याच्या वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता. मात्र, पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने ही वाहतूक आता सुरळीत सुरू झाली आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याचे धान्याचे वितरण जनतेला वेळेत होणार आहे. या वाहतुकीत अडथळा निर्माण करून गैरसोय निर्माण करण्याचा प्रयत्न करणाºया दोषी व्यक्तींवर यापुढेही गुन्हे दाखल करण्यात येतील.डॉ. जयकृष्ण फड, जिल्हा पुरवठा अधिकारी, रत्नागिरी

टॅग्स :GovernmentसरकारRatnagiriरत्नागिरी