शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

रत्नागिरी : क्रीडांगण बनले मद्यपींचा अड्डा, प्रेक्षक गॅलरीवरील पत्रे तुटलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 18:57 IST

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाची सुरक्षाच आता रामभरोसे राहिली आहे. या क्रीडांगणाला बंदिस्त गेट नसल्याने रात्रीच्यावेळी याठिकाणी पार्ट्यांचे प्रमाण वाढले आहे. क्रीडांगणातील प्रेक्षक गॅलरी म्हणजे मद्यपींचा अड्डाच बनला आहे. या पार्ट्या करणारे बाटल्या मात्र तेथेच टाकून निघून जात असल्याने याठिकाणी बाटल्यांचा खच पडू लागला आहे.

ठळक मुद्देरात्री पार्ट्यांना जोर, देखरेखीबाबत उदासिनताच खेळपट्टी सोडल्यास अन्य ठिकाणी केवळ माती आणि दगडच 

रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाची सुरक्षाच आता रामभरोसे राहिली आहे. या क्रीडांगणाला बंदिस्त गेट नसल्याने रात्रीच्यावेळी याठिकाणी पार्ट्यांचे प्रमाण वाढले आहे. क्रीडांगणातील प्रेक्षक गॅलरी म्हणजे मद्यपींचा अड्डाच बनला आहे. या पार्ट्या करणारे बाटल्या मात्र तेथेच टाकून निघून जात असल्याने याठिकाणी बाटल्यांचा खच पडू लागला आहे.रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच मारूती मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण उभारण्यात आले आहे. रणजीसारखे सामने ज्या क्रीडांगणावर खेळविण्यात आले, त्याच क्रीडांगणाची आता बिकट अवस्था झाली आहे.

क्रीडांगणावरील हिरवळ तर नामशेष झाली असून, याठिकाणी सराव करणाऱ्या खेळाडूंना लाल मातीतच रंगून जावे लागत आहे. त्यातही एखाद्या खेळाडूने पडून चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला तर हातपाय मोडण्याचीच भीती अधिक असते. त्यामुळे अनेकजण घाबरतच याठिकाणी सराव करताना दिसतात.क्रीडांगणावर असलेल्या प्रेक्षक गॅलरीवरील पत्रे तुटल्याचे विदारक चित्रही बघायला मिळत आहे. या तुटलेल्या पत्र्यांचे तुकडे खाली बसणाऱ्या प्रेक्षकांच्या अंगावरच पडण्याची अधिक भीती असते. याच प्रेक्षक गॅलरीत पक्ष्यांनी इतकी घाण करून ठेवली आहे की, प्रेक्षक गॅलरीत पाऊल ठेवणेही नकोसे वाटत आहे.क्रीडांगणाच्या सभोवताली संरक्षक भिंत असली तरी बंदिस्त गेटच नसल्याने रात्रीच्यावेळी क्रीडांगणात ओल्या पार्ट्या करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. प्रेक्षक गॅलरीत बिनधास्तपणे बसून त्याठिकाणी दारू पिऊन बाटल्या तिथेच टाकल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे.

क्रीडांगणावर सकाळी येणाऱ्या अनेकांना या बाटल्यांचे दर्शन घडत आहे. या क्रीडांगणाला बंदिस्त गेट करण्याची आवश्यकता असून, त्याकडे कित्येक वर्ष पालिकेकडून दुर्लक्षच करण्यात आले आहे.सगळच रामभरोसेछत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर येण्यासाठी मुख्य दरवाजा आहे. हा दरवाजा कायमस्वरूपी बंदच असतो. मात्र, त्याशिवाय अनेक ठिकाणी मोठे गेट करून ठेवण्यात आल्याने कोणीही क्रीडांगणावर प्रवेश करू शकतो. या गेटना कोठेच दरवाजेच नसल्याने क्रीडांगणाची सुरक्षा रामभरोसेच असल्याचे दिसत आहे. त्यामुळे कुणीही कसेही याठिकाणी येते. 

टॅग्स :Sportsक्रीडाRatnagiriरत्नागिरी