शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

रत्नागिरी : चिपळूण येथे बचत गटांचा पापड महोत्सव, ४० गावांतील ४८ बचत गट सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 15:50 IST

चिपळूण येथील खेडेकर क्रीडा संकुलाबाहेरील मैदानात चिपळूण पंचायत समिती, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान - उमेद अंतर्गत सभापती पूजा निकम यांच्या पुढाकाराने बचत गटांचा पापड महोत्सव कार्यक्रम घेण्यात आला आहे. हा महोत्सव दोन दिवस सुरु राहणार आहे. या महोत्सवात तालुक्यातील ४० गावांतील ४८ बचत गट सहभागी झाले आहेत.

ठळक मुद्देचिपळूण येथे बचत गटांचा पापड महोत्सव४० गावांतील ४८ बचत गट सहभागी अधिकाराची जाणीव होण्यासाठी दिवस : शीतल जानवे

चिपळूण : चिपळूण येथील खेडेकर क्रीडा संकुलाबाहेरील मैदानात चिपळूण पंचायत समिती, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान - उमेद अंतर्गत सभापती पूजा निकम यांच्या पुढाकाराने बचत गटांचा पापड महोत्सव कार्यक्रम घेण्यात आला आहे. हा महोत्सव दोन दिवस सुरु राहणार आहे. या महोत्सवात तालुक्यातील ४० गावांतील ४८ बचत गट सहभागी झाले आहेत.

महिलांनी आजचा जागतिक महिला दिन केवळ एक दिवस साजरा न करता, वर्षाचे ३६५ दिवस साजरा करावा. स्त्री ही सोशिक नाही तर ती सजग राहावी, कर्तृत्ववान व्हावी, तिला तिच्या अधिकाराची जाणीव व्हावी यासाठी महिला दिन साजरा करावा, असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शीतल जानवे यांनी केले.या महोत्सवाचा शुभारंभ उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. जानवे व पोलीस निरीक्षक नीशा जाधव यांच्या हस्ते गुढी उभारुन तर रेणुका राजेशिर्के यांच्या हस्ते फित कापून झाला. मार्गताम्हाणे बचत गटाच्या स्नेहल चव्हाण यांनी श्रीफळ वाढवले.

या कार्यक्रमाला सभापती पूजा निकम, नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, माजी सभापती दीप्ती माटे, जिल्हा परिषद सदस्या दिशा दाभोळकर, माजी नगरसेविका सीमा चाळके, आदिती देशपांडे, स्मिता जानवलकर, पाणी सभापती वर्षा जागुष्टे, नगरसेविका फैरोजा मोडक, सफा गोठे, शिवानी पवार, अपर्णा बेलोसे उपस्थित होत्या.यावेळी सभापती निकम यांनी पापड महोत्सवाचा उद्देश सांगताना ग्रामीण भागातील महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी व त्यांना आर्थिक लाभ मिळावा यासाठी सहकार्य केल्याचे सांगितले.

उपविभागीय अधिकारी डॉ. जानवे पुढे म्हणाल्या की, महिलांमध्ये संघभावना आहे व तीच कुटुंबाला एकत्र ठेवते तरीही महिला सबलीकरणाची गरज आहे का? आज महिला सबलीकरणासाठी विविध चळवळी सुरु आहेत, अनेक कार्यक्रम घेतले जातात. याला आपणच कारणीभूत आहोत.

महिलांच्या हातात जशी पाळण्याची दोरी असते तशी संस्काराची शिदोरीही त्यांच्याच हातात आहे. आपल्या मुलाला आपणच संस्कार देत असतो. मग मुलगा आणि मुलगी यांना वेगवेगळे संस्कार दिल्याने पुरुषप्रधान संस्कृती रुजते. याला जबाबदार आपणच आहोत, असे जानवे म्हणाल्या. यावेळी प्राची गोखले यांनी आपल्या सहकाऱ्यांसह महिला दिनाचा पोवाडा सादर केला. सूत्रसंचालन भारती तारे यांनी केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWomenमहिला