शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : चिपळूण येथे बचत गटांचा पापड महोत्सव, ४० गावांतील ४८ बचत गट सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 15:50 IST

चिपळूण येथील खेडेकर क्रीडा संकुलाबाहेरील मैदानात चिपळूण पंचायत समिती, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान - उमेद अंतर्गत सभापती पूजा निकम यांच्या पुढाकाराने बचत गटांचा पापड महोत्सव कार्यक्रम घेण्यात आला आहे. हा महोत्सव दोन दिवस सुरु राहणार आहे. या महोत्सवात तालुक्यातील ४० गावांतील ४८ बचत गट सहभागी झाले आहेत.

ठळक मुद्देचिपळूण येथे बचत गटांचा पापड महोत्सव४० गावांतील ४८ बचत गट सहभागी अधिकाराची जाणीव होण्यासाठी दिवस : शीतल जानवे

चिपळूण : चिपळूण येथील खेडेकर क्रीडा संकुलाबाहेरील मैदानात चिपळूण पंचायत समिती, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान - उमेद अंतर्गत सभापती पूजा निकम यांच्या पुढाकाराने बचत गटांचा पापड महोत्सव कार्यक्रम घेण्यात आला आहे. हा महोत्सव दोन दिवस सुरु राहणार आहे. या महोत्सवात तालुक्यातील ४० गावांतील ४८ बचत गट सहभागी झाले आहेत.

महिलांनी आजचा जागतिक महिला दिन केवळ एक दिवस साजरा न करता, वर्षाचे ३६५ दिवस साजरा करावा. स्त्री ही सोशिक नाही तर ती सजग राहावी, कर्तृत्ववान व्हावी, तिला तिच्या अधिकाराची जाणीव व्हावी यासाठी महिला दिन साजरा करावा, असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शीतल जानवे यांनी केले.या महोत्सवाचा शुभारंभ उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. जानवे व पोलीस निरीक्षक नीशा जाधव यांच्या हस्ते गुढी उभारुन तर रेणुका राजेशिर्के यांच्या हस्ते फित कापून झाला. मार्गताम्हाणे बचत गटाच्या स्नेहल चव्हाण यांनी श्रीफळ वाढवले.

या कार्यक्रमाला सभापती पूजा निकम, नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, माजी सभापती दीप्ती माटे, जिल्हा परिषद सदस्या दिशा दाभोळकर, माजी नगरसेविका सीमा चाळके, आदिती देशपांडे, स्मिता जानवलकर, पाणी सभापती वर्षा जागुष्टे, नगरसेविका फैरोजा मोडक, सफा गोठे, शिवानी पवार, अपर्णा बेलोसे उपस्थित होत्या.यावेळी सभापती निकम यांनी पापड महोत्सवाचा उद्देश सांगताना ग्रामीण भागातील महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी व त्यांना आर्थिक लाभ मिळावा यासाठी सहकार्य केल्याचे सांगितले.

उपविभागीय अधिकारी डॉ. जानवे पुढे म्हणाल्या की, महिलांमध्ये संघभावना आहे व तीच कुटुंबाला एकत्र ठेवते तरीही महिला सबलीकरणाची गरज आहे का? आज महिला सबलीकरणासाठी विविध चळवळी सुरु आहेत, अनेक कार्यक्रम घेतले जातात. याला आपणच कारणीभूत आहोत.

महिलांच्या हातात जशी पाळण्याची दोरी असते तशी संस्काराची शिदोरीही त्यांच्याच हातात आहे. आपल्या मुलाला आपणच संस्कार देत असतो. मग मुलगा आणि मुलगी यांना वेगवेगळे संस्कार दिल्याने पुरुषप्रधान संस्कृती रुजते. याला जबाबदार आपणच आहोत, असे जानवे म्हणाल्या. यावेळी प्राची गोखले यांनी आपल्या सहकाऱ्यांसह महिला दिनाचा पोवाडा सादर केला. सूत्रसंचालन भारती तारे यांनी केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWomenमहिला