शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

रत्नागिरीत पांडुरंगाच्या रथासमोर राजश्रीने साकारली सलग पाच तास रांगोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 17:27 IST

रत्नागिरीे येथील विठ्ठल मंदिरातील एकादशी उत्सवानिमित्त गिनीज बुकमध्ये नोंद असलेली राजश्री जुन्नरकर हिने विठ्ठल मंदिर ते गवळीवाडा व परत विठ्ठल मंदिर अशी सलग पाच तास रस्त्यावर रांगोळी काढली. हे दृष्य पाहण्यासाठी रत्नागिरीकरांनी रात्री गर्दी केली होती.

ठळक मुद्दे सलग पाच तासाच्या रांगोळीने रत्नागिरीकर थक्क राजश्री जुन्नरकर हिने साकारला सलग रांगोळीचा विक्रम३०० किलो फुलांचा वापर, ७०० किलो रांगोळीचा वापरमध्यरात्रीदेखील रत्नागिरीकरांची गर्दी एकादशीनिमित्त रत्नागिरीत आयोजन माऊलीच्या रथाप्रमाणे विठोबाच्या रथाची सजावट

रत्नागिरीे, दि. २ : येथील विठ्ठल मंदिरातील एकादशी उत्सवानिमित्त गिनीज बुकमध्ये नोंद असलेली राजश्री जुन्नरकर हिने विठ्ठल मंदिर ते गवळीवाडा व परत विठ्ठल मंदिर अशी सलग पाच तास रस्त्यावर रांगोळी काढली. हे दृष्य पाहण्यासाठी रत्नागिरीकरांनी रात्री गर्दी केली होती.

माऊलीच्या रथाप्रमाणे फुलांनी सजवलेला विठोबाचा रथ आणि या रथाच्या चार किलोमीटर मार्गावर सुमारे पाच तास रेखाटलेल्या रांगोळीने रत्नागिरीकरांना अचंबित करून टाकले. ज्ञानेश्वर माऊलींच्या रथाची सजावट करणारे कलाकार विष्णू आवटे आणि गिनीज बुकमध्ये नोंद झालेली रंगावली कलाकार राजश्री जुन्नरकर यांच्या अदाकारीने रत्नागिरीकांनाही त्यांच्या मोहात पाडले. कार्तिकी एकादशीनिमित्त मंगळवारी रात्री या उपक्रमाचे आयोजन केले होते.

प्रतिपंढरपूर मानले जाणाºया रत्नागिरीतील विठ्ठल मंदिराला तीनशे वर्षांची परंपरा आहे. यावर्षीचा उत्सव आगळावेगळा करण्यासाठी विठ्ठल मंदिर देवस्थान व विठ्ठल रखुमाई मित्रमंडळाने विशेष कार्यक्रम आखला होता. त्यासाठी आवटे व जुन्नरकर यांना रत्नागिरीत येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार या दोघांनीही रत्नागिरीत उपस्थित राहून आपल्या कलेचे दर्शन दाखविले.

रंगावलीकार राजश्री जुन्नरकर यांनी सायंकाळी ७.३० वाजता मंदिरात विठोबाचा सुमारे दहा फुटी रांगोळी साकारण्यास प्रारंभ केला. ९.३० वाजता ही रांगोळी पूर्ण झाली. रात्री ११.३० वाजता मंदिरातून विठोबाचा रथ निघाला. हॉटेल प्रभा, धनजी नाका, राम मंदिर, तेली आळी, मारुती आळी व पुन्हा विठ्ठल मंदिर या मार्गावर पहाटे पाच वाजेपर्यंत रथाने नगर प्रदक्षिणा केली.

रथाच्या समोर राजश्री जुन्नरकर यांनी रांगोळी काढण्यास सुरूवात केली. सुमारे चार किलोमीटरच्या मार्गावर रांगोळ्या रेखाटून रत्नागिरीकरांचे लक्ष वेधून घेतले. रंगावली उपक्रमाची जबाबदारी राजा केळकर यांनी व रथ सजावटीसाठी नगरसेवक राजू तोडणकर यांनी विठोबाची सेवा करण्यासाठी जबाबदारी स्वीकारली होती.

आषाढी एकादशीच्या वारीत माऊलींच्या रथासमोर रांगोळी 

शोभिवंत, नक्षीदार, पट्टा, गालिचा, मोर, फुले, तुतारी वाजवणाऱ्या युवती, डफ वाजवणारे युवक अशा विविध रांगोळ्या जुन्नरकर यांनी साकारल्या. यासाठी ५०० किलो पांढरी रांगोळी व २०० किलो रंगीत रांगोळी लागली. जुन्नरकर यांचे कौशल्य, तसेच त्यांनी न बसता वाकून काढलेल्या या रांगोळ्यांचे रत्नागिरीकरांनी कौतुक केले. कोणाच्याही मदतीशिवाय तिने या रांगोळ्या साकारल्या. 

आषाढी वारीला आळंदीत माऊलींचा रथ विष्णू आवटे सजवतात. येथे विठोबाचा रथ सजवण्यासाठी त्यांनी तब्बल २५० ते ३०० फुले वापरली. झेंडू, जरबेरा, गुलाब, शेवंती, मोगरा, तुळशी आदी नानाविध प्रकारची फुले सजावटीसाठी वापरली. विठोबासाठी खास हार त्यांनी साकारला. सजावटीसाठी त्यांनी सुमारे चार तासांची मेहनत घेतली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPandharpurपंढरपूर