शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी पंचायत समितीची सभा गाजली अनुपस्थित अधिकाऱ्यांमुळे , सभेत खडाजंगी, तीव्र संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 16:30 IST

अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे रत्नागिरी पंचायत समितीच्या सभेचे कामकाज काही वेळ थांबविण्यात आले होते. तसेच सभा तहकूब करण्याची मागणीही काही सदस्यांनी केली़ मात्र, उपसभापती शंकर सोनवडकर यांनी पुढाकार घेतल्याने सभा पुढे सुरु ठेवण्यात आली़

ठळक मुद्देरत्नागिरी पंचायत समितीची सभा गाजली अनुपस्थित अधिकाऱ्यांमुळे सभेत खडाजंगी, तीव्र संताप, तहकुब करण्याची सदस्यांची मागणी

रत्नागिरी : अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे रत्नागिरी पंचायत समितीच्या सभेचे कामकाज काही वेळ थांबविण्यात आले होते. तसेच सभा तहकूब करण्याची मागणीही काही सदस्यांनी केली़ मात्र, उपसभापती शंकर सोनवडकर यांनी पुढाकार घेतल्याने सभा पुढे सुरु ठेवण्यात आली़या सभेमध्ये सुरुवातीला माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी, केरळमध्ये वादळाने मृत्यू पावलेल्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली़ सभेच्या सुरुवातीलाच अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबाबत सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली़ सार्वजनिक बांधकाम खाते, शिक्षण विभाग, तालुका कृषी विभाग, महावितरण आदींचे अधिकारी सभेला अनुपस्थित होते़ त्यामुळे सभा तहकूब करण्याची मागणी सदस्यांनी केली़. त्यासाठी काही वेळ सभेचे कामकाजही सदस्यांनी थांबविले होते़ .

त्यावेळी उपसभापती सोनवडकर यांनी सर्व खात्यांच्या अधिकाऱ्यांना एकत्रित बोलावून याबाबत चर्चा करण्यात येईल़ सभेचे कामकाज सुरु ठेवा, अशी विनंती सदस्यांनी केली़ त्यावेळी सदस्यांनी त्यांच्या विनंतीला मान देत सभा पुढे सुरु ठेवली़ यावेळी उशिरा आलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना सभापती विभांजली पाटील यांनी चांगलेच फैलावर घेतले़ त्यांनी यापुढे कारण सांगून चालणार नाही, अशा शब्दात सुनावले़जिओ कंपनीकडून ग्रामीण भागामध्ये जमीनीची खोदाई करुन केबल टाकण्याचे काम सुरु आहे़ याबाबत बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांसमोर प्रश्न उपस्थित करुन त्यांना तात्काळ काम बंद करण्याचे नोटीस देण्यात यावी़ त्याचबरोबर त्यांच्याकडून काम सुरु करण्यापूर्वी अनामत रक्कम घ्यावी, अशा सूचना सदस्य गजानन पाटील यांनी दिली़ त्याचबरोबर केबलच्या खोदाईमुळे अनेक ठिकाणी अपघात होऊन जिवितहानी होण्याची भिती सदस्यांनी व्यक्त केली़यावेळी सदस्या साक्षी रावणंग यांनी १७ शाळा पटसंख्येअभावी बंद करण्यात आल्या आहेत़ त्यातील विद्यार्थ्यांची अन्य शाळेमध्ये सोय करण्यात आली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला़ मात्र, हे करताना काही विद्यार्थ्यांना दोन ते अडीच किलोमीटर पायी प्रवास करावा लागतो़ त्याचबरोबर नाखरे उंबरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंद करण्यात आल्याने तेथील विद्यार्थीही शाळेत जात नसल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले़यावेळी सदस्य गजानन पाटील, अभय खेडेकर, ऋषिकेश भोंगले, दत्तात्रय मयेकर, सदस्या मेघना पाष्टे, संजना माने, रिहाना साखरकर, स्रेहा चव्हाण, साक्षी रावणंग व अन्य उपस्थित होते़निषेधाचा ठरावदिल्लीतील जंतरमंतर येथे समाजकंटकांकडून राज्यघटनेची प्रत जाळण्यात आली़ तसेच भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलही अपशब्द वापरण्यात आले़ याबद्दल सदस्या साक्षी रावणंग यांनी सभागृहामध्ये निषेधाचा ठराव मांडला़ त्याला पंचायत समितीच्या सभागृहाने मंजुरी दिली़

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीRatnagiriरत्नागिरी