शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

रत्नागिरी : पॅकेज, जादा मोबदल्याचे आमिष : अशोक वालम , आंदोलकांच्या अंगावर प्रकल्पसमर्थक, दलालांना सोडले जातेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 17:53 IST

रिफायनरी प्रकल्पाला आमचा प्रखर विरोध असतानाही शासनातर्फे पॅकेज व वाढीव मोबदल्याच्या नावाखाली प्रकल्पसमर्थक व दलालांना आंदोलकांच्या अंगावर सोडले जात आहे. जे आंदोलक त्यांचे ऐकत नाहीत, त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल करण्याचा डाव असल्याचा संशय कोकण रिफायनरी प्रकल्पविरोधी संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी राजापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

ठळक मुद्देपॅकेज, जादा मोबदल्याचे आमिष : अशोक वालम आंदोलकांच्या अंगावर प्रकल्पसमर्थक, दलालांना सोडले जातेय

राजापूर : रिफायनरी प्रकल्पाला आमचा प्रखर विरोध असतानाही शासनातर्फे पॅकेज व वाढीव मोबदल्याच्या नावाखाली प्रकल्पसमर्थक व दलालांना आंदोलकांच्या अंगावर सोडले जात आहे. जे आंदोलक त्यांचे ऐकत नाहीत, त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल करण्याचा डाव असल्याचा संशय कोकण रिफायनरी प्रकल्पविरोधी संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी राजापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.रिफायनरीविरोधात सुरु असलेला लढा यापुढेही एकजुटीने कायम ठेवू व हा विनाशकारी प्रकल्प रद्द करायला शासनाला भाग पाडू, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. रिफायनरी प्रकल्पावरून जोरदार रणकंदन सुरु असून, यापूर्वी रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल कंपनीच्यावतीने पत्रकार परिषद घेऊन रिफायनरी प्रकल्प कसा चांगला आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न झाला होता.

त्या पार्श्वभूमीवर कोकण रिफायनरी प्रकल्पविरोधी संघर्ष समिती व शेतकरी, मच्छीमार संघटनेच्या वतीने राजापुरात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी कोकण रिफायनरी प्रकल्पविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांनी शासनाच्या भूमिकेवर टीका केली.कोकणचा नाश होऊ नये, यासाठी आम्ही सुरुवातीपासूनच प्रकल्पाला प्राणपणाने विरोध करीत आहोत. त्यातूनच मागील काही दिवसात या प्रकल्पाविरोधात अनेक आंदोलने केली आहेत. आम्हाला कोणताही मोबदला किंवा पॅकेज नको आहे. आमच्या कोकणला अशा विनाशकारी प्रकल्पांपासून वाचवायचे आहे, अशा शब्दात वालम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.प्रकल्पग्रस्त १४ गावांतील ४२ हजार ५०० खातेदारांना बत्तीस दोनच्या नोटीस पाठवण्यात आल्या. पण, त्यातील अनेक खातेदारांना अद्याप नोटीसच मिळालेल्या नाहीत. मलादेखील ती मिळालेली नाही. एकाच खातेदाराला तर अनेक नोटीस देण्यात आल्या आहेत. गोठीवरे परिसरातील तीन खातेदारांना तब्बल सहाशेपेक्षा अधिक नोटीस धाडण्यात आल्या आहेत, असे ते म्हणाले.

 

 

 

 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcollectorतहसीलदार