शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

रत्नागिरी : पॅकेज, जादा मोबदल्याचे आमिष : अशोक वालम , आंदोलकांच्या अंगावर प्रकल्पसमर्थक, दलालांना सोडले जातेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 17:53 IST

रिफायनरी प्रकल्पाला आमचा प्रखर विरोध असतानाही शासनातर्फे पॅकेज व वाढीव मोबदल्याच्या नावाखाली प्रकल्पसमर्थक व दलालांना आंदोलकांच्या अंगावर सोडले जात आहे. जे आंदोलक त्यांचे ऐकत नाहीत, त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल करण्याचा डाव असल्याचा संशय कोकण रिफायनरी प्रकल्पविरोधी संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी राजापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

ठळक मुद्देपॅकेज, जादा मोबदल्याचे आमिष : अशोक वालम आंदोलकांच्या अंगावर प्रकल्पसमर्थक, दलालांना सोडले जातेय

राजापूर : रिफायनरी प्रकल्पाला आमचा प्रखर विरोध असतानाही शासनातर्फे पॅकेज व वाढीव मोबदल्याच्या नावाखाली प्रकल्पसमर्थक व दलालांना आंदोलकांच्या अंगावर सोडले जात आहे. जे आंदोलक त्यांचे ऐकत नाहीत, त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल करण्याचा डाव असल्याचा संशय कोकण रिफायनरी प्रकल्पविरोधी संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी राजापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.रिफायनरीविरोधात सुरु असलेला लढा यापुढेही एकजुटीने कायम ठेवू व हा विनाशकारी प्रकल्प रद्द करायला शासनाला भाग पाडू, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. रिफायनरी प्रकल्पावरून जोरदार रणकंदन सुरु असून, यापूर्वी रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल कंपनीच्यावतीने पत्रकार परिषद घेऊन रिफायनरी प्रकल्प कसा चांगला आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न झाला होता.

त्या पार्श्वभूमीवर कोकण रिफायनरी प्रकल्पविरोधी संघर्ष समिती व शेतकरी, मच्छीमार संघटनेच्या वतीने राजापुरात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी कोकण रिफायनरी प्रकल्पविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांनी शासनाच्या भूमिकेवर टीका केली.कोकणचा नाश होऊ नये, यासाठी आम्ही सुरुवातीपासूनच प्रकल्पाला प्राणपणाने विरोध करीत आहोत. त्यातूनच मागील काही दिवसात या प्रकल्पाविरोधात अनेक आंदोलने केली आहेत. आम्हाला कोणताही मोबदला किंवा पॅकेज नको आहे. आमच्या कोकणला अशा विनाशकारी प्रकल्पांपासून वाचवायचे आहे, अशा शब्दात वालम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.प्रकल्पग्रस्त १४ गावांतील ४२ हजार ५०० खातेदारांना बत्तीस दोनच्या नोटीस पाठवण्यात आल्या. पण, त्यातील अनेक खातेदारांना अद्याप नोटीसच मिळालेल्या नाहीत. मलादेखील ती मिळालेली नाही. एकाच खातेदाराला तर अनेक नोटीस देण्यात आल्या आहेत. गोठीवरे परिसरातील तीन खातेदारांना तब्बल सहाशेपेक्षा अधिक नोटीस धाडण्यात आल्या आहेत, असे ते म्हणाले.

 

 

 

 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcollectorतहसीलदार