शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

रत्नागिरी : सुकोंडी धरणाचे पाणी उद्योगपतींना देण्यास विरोध, पंचक्रोशीतील लोकांमधून प्रचंड संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 17:13 IST

सुकोंडी - वाघिवणे - बोरथळ पंचक्रोशीतील धरणाचे पाणी हर्णै - अडखळ बायपास येथील बिल्डरांना द्यावे, असा शासन आदेश झाला आहे. मुळातच या धरणाला गेली अनेक वर्षे गळती असून, या धरणाच्या आजूबाजुच्या गावांची तहान या धरणावर न भागवता हे पाणी बिल्डरला देण्याचा शासन आदेश झाल्याने पंचक्रोशीतील लोकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देहर्णै -अडखळ बायपास येथील बिल्डरांना देण्याचा शासन आदेश धरणाला गेली अनेक वर्षे गळती सुरूपंचक्रोशीतील प्रचंड संताप, आधी गावची तहान भागवा.

दापोली : सुकोंडी - वाघिवणे - बोरथळ पंचक्रोशीतील धरणाचे पाणी हर्णै - अडखळ बायपास येथील बिल्डरांना द्यावे, असा शासन आदेश झाला आहे. मुळातच या धरणाला गेली अनेक वर्षे गळती असून, या धरणाच्या आजूबाजुच्या गावांची तहान या धरणावर न भागवता हे पाणी बिल्डरला देण्याचा शासन आदेश झाल्याने पंचक्रोशीतील लोकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.स्थानिक लोकांना पुरेसे पाणी मिळत नसताना ते उद्योगपतींच्या घशात घालणार असाल, तर आमचा प्रचंड विरोध असेल, अशी भूमिका आंजर्ले पंचक्रोशीने घेतली आहे. गुरूवारी झालेल्या सभेत हा शासन आदेश रद्द करण्याची जोरदार मागणी करण्यात आली.आंजर्ले - पंचक्रोशीची तहान भागवण्यासाठी १५ वर्षांपूर्वी सुकोंडी - वाघिवणे धरण बांधण्यात आले. पंचक्रोशीच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन स्थानिक लोकांनी आपल्या जमिनी कवडीमोल किमतीने धरणासाठी दिल्या.

धरणाची क्षमता (४१७ टीएमसी) एवढी आहे. या पाण्यावर पंचक्रोशीची तहान भागत नाही. या भागातील अनेक वाड्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. गेली अनेक वर्षे या धरणाला गळती लागली आहे.धरणाची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत असताना शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. धरण नादुरुस्त असल्यामुळे पंचक्रोशीतील अनेक वाड्यांची पाण्याची गरज पूर्ण होत नाही. असे असताना धरण क्षेत्राच्या बाहेरील अडखळ - हर्णै बायपास परिसरातील बिल्डर मुकुंद श्रीधर दंडवते यांना दररोज (८७ टीएमसी) म्हणजे लाखो लीटर पाणी उचलण्याची परवानगी शासनाने दिली आहे.

धरण परिसरातील लोकांची गरज लक्षात घेण्याऐवजी लोकांच्या तोंडचे पाणी पळवून उद्योगपतींच्या घशात घातले जाणार असेल तर पंचक्रोशीचा प्रखर विरोध असेल, अशी भूमिका पंचक्रोशीने घेतली आहे.वाघिवणे धरणाला गळती असल्यामुळे सध्या या धरणात २५ टक्केसुद्धा पाणीसाठा नाही. धरण कोरडे पडले आहे, अशा परिस्थितीत ८७ टीएमसी पाणी देण्याचा शासन निर्णय झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पंचक्रोशीने नोव्हेंबर महिन्यात विरोधाचे पत्र शासनाकडे दिले होते.

पंचक्रोशीची हरकत असताना शासनाने एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी उचलण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे ही परवानगी रद्द करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश म्हादलेकर यांनी दिला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणी