शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : सुकोंडी धरणाचे पाणी उद्योगपतींना देण्यास विरोध, पंचक्रोशीतील लोकांमधून प्रचंड संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 17:13 IST

सुकोंडी - वाघिवणे - बोरथळ पंचक्रोशीतील धरणाचे पाणी हर्णै - अडखळ बायपास येथील बिल्डरांना द्यावे, असा शासन आदेश झाला आहे. मुळातच या धरणाला गेली अनेक वर्षे गळती असून, या धरणाच्या आजूबाजुच्या गावांची तहान या धरणावर न भागवता हे पाणी बिल्डरला देण्याचा शासन आदेश झाल्याने पंचक्रोशीतील लोकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देहर्णै -अडखळ बायपास येथील बिल्डरांना देण्याचा शासन आदेश धरणाला गेली अनेक वर्षे गळती सुरूपंचक्रोशीतील प्रचंड संताप, आधी गावची तहान भागवा.

दापोली : सुकोंडी - वाघिवणे - बोरथळ पंचक्रोशीतील धरणाचे पाणी हर्णै - अडखळ बायपास येथील बिल्डरांना द्यावे, असा शासन आदेश झाला आहे. मुळातच या धरणाला गेली अनेक वर्षे गळती असून, या धरणाच्या आजूबाजुच्या गावांची तहान या धरणावर न भागवता हे पाणी बिल्डरला देण्याचा शासन आदेश झाल्याने पंचक्रोशीतील लोकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.स्थानिक लोकांना पुरेसे पाणी मिळत नसताना ते उद्योगपतींच्या घशात घालणार असाल, तर आमचा प्रचंड विरोध असेल, अशी भूमिका आंजर्ले पंचक्रोशीने घेतली आहे. गुरूवारी झालेल्या सभेत हा शासन आदेश रद्द करण्याची जोरदार मागणी करण्यात आली.आंजर्ले - पंचक्रोशीची तहान भागवण्यासाठी १५ वर्षांपूर्वी सुकोंडी - वाघिवणे धरण बांधण्यात आले. पंचक्रोशीच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन स्थानिक लोकांनी आपल्या जमिनी कवडीमोल किमतीने धरणासाठी दिल्या.

धरणाची क्षमता (४१७ टीएमसी) एवढी आहे. या पाण्यावर पंचक्रोशीची तहान भागत नाही. या भागातील अनेक वाड्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. गेली अनेक वर्षे या धरणाला गळती लागली आहे.धरणाची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत असताना शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. धरण नादुरुस्त असल्यामुळे पंचक्रोशीतील अनेक वाड्यांची पाण्याची गरज पूर्ण होत नाही. असे असताना धरण क्षेत्राच्या बाहेरील अडखळ - हर्णै बायपास परिसरातील बिल्डर मुकुंद श्रीधर दंडवते यांना दररोज (८७ टीएमसी) म्हणजे लाखो लीटर पाणी उचलण्याची परवानगी शासनाने दिली आहे.

धरण परिसरातील लोकांची गरज लक्षात घेण्याऐवजी लोकांच्या तोंडचे पाणी पळवून उद्योगपतींच्या घशात घातले जाणार असेल तर पंचक्रोशीचा प्रखर विरोध असेल, अशी भूमिका पंचक्रोशीने घेतली आहे.वाघिवणे धरणाला गळती असल्यामुळे सध्या या धरणात २५ टक्केसुद्धा पाणीसाठा नाही. धरण कोरडे पडले आहे, अशा परिस्थितीत ८७ टीएमसी पाणी देण्याचा शासन निर्णय झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पंचक्रोशीने नोव्हेंबर महिन्यात विरोधाचे पत्र शासनाकडे दिले होते.

पंचक्रोशीची हरकत असताना शासनाने एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी उचलण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे ही परवानगी रद्द करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश म्हादलेकर यांनी दिला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणी