शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
Nitin Shete: मोठी बातमी! शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
6
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
7
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
8
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
9
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
10
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
11
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
12
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
13
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
14
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
15
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
16
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
17
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
18
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
19
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
20
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...

रत्नागिरी : काजू प्रक्रिया उद्योगासाठी नवीन धोरण, मुंबईत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 15:33 IST

वस्त्रोद्योग धोरणाच्या धर्तीवर काजू प्रक्रिया उद्योगासाठी नवीन धोरण लवकरच जाहीर करणार असल्याचे आश्वासन राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काजू उद्योजकांच्या शिष्टमंडळाशी बोलताना दिले. यामुळे काजू व्यवसायाला आलेली मरगळ आता दूर होण्याची आशा निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देमुंबईत बैठक : उद्योजकांच्या मागण्यांना अर्थमंत्र्यांचा हिरवा कंदीलअर्थमंत्र्यां सोबतच्या बैठकीत अनेक समस्यांवर तोडगा, उद्योग मरगळ झटकणार

दापोली : वस्त्रोद्योग धोरणाच्या धर्तीवर काजू प्रक्रिया उद्योगासाठी नवीन धोरण लवकरच जाहीर करणार असल्याचे आश्वासन राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काजू उद्योजकांच्या शिष्टमंडळाशी बोलताना दिले. यामुळे काजू व्यवसायाला आलेली मरगळ आता दूर होण्याची आशा निर्माण झाली आहे.चुकीच्या धोरणांमुळे तसेच दुर्लक्षित केल्याने सद्यस्थितीत काजू व्यवसाय आजारी अवस्थेत पोहोचला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर येथील काजू व्यावसायिकांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. या सर्व समस्या शासन दरबारी मांडून ठोस उपाय योजना करण्याकरिता काजू पिक समिती सदस्यांसह, शेतकरी, व्यावसायिक यांच्या शिष्टमंडळासमवेत अर्थमंत्री सुधी मुनगंटीवार यांच्या सोबत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते.सिंधुदुर्ग भाजपा माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपा युवा नेते संदेश पारकर, राजश्री विश्वासराव, काजू उद्योजक हरिष कांबळे दापोली यांच्या सोबत काजू पिक समितीचे शिष्टमंडळ महाराष्ट्रराज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सह्याद्री विश्रामगृहावर भेटले. यावेळी ऊर्जा आणि उत्पादनशुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हेसुद्धा उपस्थित होते.यावेळी झालेल्या सांगोपांग चर्चेअंती काजू प्रक्रिया उद्योगासाठी प्रोत्साहन योजनेतून ६ टक्के व्याज परतावा (६ टक्के इंटरेस्ट सबसिडी) देण्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आली असून, काजू उद्योगाच्या मूल्य वर्धित कर परातव्यापैकी २०१० पासूनची शासनाकडे प्रलंबित असलेली १५ टक्के रक्कम आठ दिवसात वितरित करण्याचे आदेश अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी संबंधित विभागाला दिले.

काजू प्रक्रिया उद्योगांनी त्यांना आवश्यक असणारी विजेची गरज अपारंपरिक स्रोताद्वारे म्हणजे सोलर प्रकल्प उभारून पूर्ण केल्यास सोलर प्रकल्पासाठी तब्बल ५० टक्के अनुदान देण्यात येईल, अशी ग्वाही देखिल मुनगंटीवार यांनी दिली.या बैठकीसाठी प्रदेश कार्यालय सहसचिव शरद चव्हाण, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजन चिके, काजू पिक समिती सदस्य अमित आवटे, मंदार कल्याणकर, संदीप गावडे, काजू उत्पादक शेतकरी साई नाईक, वेंगुर्ला येथील काजू कारखानदार दिपक माडकर, दादू कविटकर, धनंजय यादव, काजू उद्योजक अनिरुद्ध गावकर, कोल्हापूर कॅशु मॅनुफॅक्चरर अ‍ॅण्ड ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष मोहन परब, शामराव बेनके, अभिषेक चव्हाण उपस्थित होते.

टॅग्स :MumbaiमुंबईRatnagiriरत्नागिरी