शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
3
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
4
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
5
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
6
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
7
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
8
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
9
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
10
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
11
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
12
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
13
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
14
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
15
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
16
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
17
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
18
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
19
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
20
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 

रत्नागिरी - नागपूर महामार्गापाठचे शुक्लकाष्ठ कायमच, चौपदरीकरण रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 14:28 IST

रत्नागिरी-नागपूर महामार्ग क्रमांक १६६च्या चौपदरीकरणासाठी आवश्यक जमिनीचे, मालमत्तांचे मूल्यांकन अद्याप पूर्ण झालेले नाही. अनेक बांधकामांची मूल्यांकने न झाल्याने महामार्गाचे काम रखडले आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी - नागपूर महामार्गापाठचे शुक्लकाष्ठ कायमच, चौपदरीकरण रखडलेअपूर्ण मूल्यांकनामुळे मालमत्ताधारकांची कोंडी

रत्नागिरी : रत्नागिरी-नागपूर महामार्ग क्रमांक १६६च्या चौपदरीकरणासाठी आवश्यक जमिनीचे, मालमत्तांचे मूल्यांकन अद्याप पूर्ण झालेले नाही. अनेक बांधकामांची मूल्यांकने न झाल्याने महामार्गाचे काम रखडले आहे.त्यामुळे या महामार्ग चौपदरीकरणात ज्यांची घरे, मालमत्ता जात आहेत, त्यांना दुसरीकडे जागा घेऊन घर बांधणे अशक्य झाले आहे. निवाडे न झाल्याने या प्रकल्पग्रस्तांची आर्थिक कोंडी झाली असून, ही मूल्यांकने व निवाडे लवकर होऊन भरपाई तातडीने देण्याची मागणी भूधारकांमधून होत आहे.रत्नागिरी - नागपूर या महामार्ग चौपदरीकरणासाठी गेल्या ३ वर्षांपासून जमीन संपादनाचे, मालमत्ता मूल्यांकनाचे काम सुरू होते. यातील रत्नागिरी विभागातील मालमत्तांची मूल्यांकनेच रखडली आहेत. सुरुवातीला या मार्गासाठी जागा देण्यास कुवारबाव येथील व्यापारी व जमीनधारकांनी विरोध केला होता. तत्कालीन युती सरकार व केंद्रातील मंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंत हा विषय गेला होता.

या चौपदरीकरणात कुवारबाव बाजारपेठ पूर्णत: स्थलांतरीत करावी लागणार आहे. प्रथम विरोधानंतर कुवारबावमधील जमीनधारकांनी जमिनी देण्याचे मान्य केले. अन्य ठिकाणीही याप्रमाणेच जमीनधारकांनी सहकार्य केले. परंतु रत्नागिरी विभागातील मूल्यांकने रेंगाळल्याने या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला उशीर होत आहे.चौपदरीकरणात ज्यांची घरे जाणार आहेत, त्यांना नवीन घरासाठी जुन्या जागेवर, घरावर कर्जही मिळेनासे झाले आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने या मालमत्ताधारकांची ही आर्थिक कोंडी फोडावी, अशी मागणी होत आहे. रत्नागिरी-नागपूर या महामार्गाची चार वर्षांपूर्वीच आखणी करण्यात आली आहे.

रत्नागिरी - कोल्हापूर-मिरज - सांगोला - मंगळवेढा -सोलापूर - तुळजापूर - लातूर - नांदेड - पुसद - यवतमाळ - नागपूर असा हा मार्ग आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र , मराठवाडा, विदर्भाला जोडणारा हा महामार्ग महत्त्वाचा मानला जातो. सातत्याने या मार्गावर वाहनांची वर्दळ असते. त्यामुळेच या महामार्गाचे चौपदरीकरण महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, रत्नागिरी बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे काम रेंगाळल्याने नाराजी व्यक्त होत आहे.रत्नागिरी विभागात १५३ मूल्यांकने शिल्लक असल्याचे या महामार्गाच्या सक्षम अधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविले होते. त्यानंतर ४ सप्टेंबर २०१९ रोजी नाचणे, झाडगाव येथील एकुण २३ बांधकामांचे मूल्यांकन करण्यात आले. उर्वरित १३० बांधकामांचे मूल्यांकन झालेले नाही. यामध्ये कुवारबावमधील २३, पडवेवाडीतील ६, नाचणेतील ६०, झाडगावमधील २१ या बांधकामांचा समावेश आहे.

मूल्यांकनेच झालेली नसल्याने या बांधकामांची नुकसानभरपाई मालकांना मिळू शकलेली नाही. परिणामी अन्यत्र जागा घेऊन घर बांधणे अशक्य झाले आहे. याच महामार्गावरील नाणीजचा निवाडाही अद्याप रखडला असून मूल्यांकने लवकर करावीत, अशी मागणी होत आहे.मूल्यांकने न झाल्याने तीव्र नाराजीमुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या जोरात सुरू आहे. मात्र हे चौपदरीकरण काम रत्नागिरी विभागातच अपूर्ण आहे. रत्नागिरीला कोल्हापूर, नागपूरशी जोडणाऱ्या रत्नागिरी-नागपूर महामार्ग चौपदरीकरणाची प्रक्रियाही रत्नागिरी विभागातच अपूर्ण आहे. त्यामुळे हा योगायोग आहे की, दुर्लक्ष याबाबत आता चर्चेला उधाण आले आहे.

टॅग्स :highwayमहामार्गRatnagiriरत्नागिरी