शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
4
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
5
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
6
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
7
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
8
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
9
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
10
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
11
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
12
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
13
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
14
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
15
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
16
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
17
Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता
18
"ते माझं भवितव्य बरबाद करतील...", 'इंडियन आयडल' जिंकल्यानंतर अभिजीत सावंतने केलेला मोठा गौप्यस्फोट
19
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
20
अरे हे काय! मुंबईच्या संघात दोन-दोन रोहित; व्हायरल फोटो पाहून चाहते थक्क, हिटमॅनचा 'ड्युप्लिकेट' कोण?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी - नागपूर महामार्गाच्या मोबदला वाटपाला मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 18:10 IST

रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनासाठी रत्नागिरी तालुक्यातील सहा गावांच्या मोबदल्याची रक्कम ६९ कोटी १३ लाख ११ हजार १६४ रुपये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे. या रकमेच्या वाटप प्रक्रियेला २ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे.

ठळक मुद्दे२ सप्टेंबरपासून होणार वाटपाला प्रारंभ रत्नागिरी तालुक्यातील सहा गावांना ६९ कोटी

रत्नागिरी : रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनासाठी रत्नागिरी तालुक्यातील सहा गावांच्या मोबदल्याची रक्कम ६९ कोटी १३ लाख ११ हजार १६४ रुपये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे. या रकमेच्या वाटप प्रक्रियेला २ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे.रत्नागिरी - कोल्हापूर - नागपूर या राष्ट्रीय महामार्गाची भूसंपादन प्रक्रिया २०१७ सालापासून सुरू झाली आहे. रत्नागिरी ते आंबा घाटापर्यंतच्या चौपदरीकरणाच्या भूसंपादनाची जबाबदारी रत्नागिरी उपविभागीय कार्यालयाकडे देण्यात आली आहे. त्यानुसार या कार्यालयाकडून संगमेश्वर तालुक्यातील १३ गावांमधील एकूण १३,३६,८३७ चौरस मीटर आणि रत्नागिरी तालुक्यातील १४ गावांमधील ६,५२,२२० चौरस मीटर क्षेत्र संपादित करण्यात आले आहे.रत्नागिरीतील सहा आणि संगमेश्वर तालुक्यातील दहा अशा एकूण १६ गावांतील जमीनमालकांचे मोबदला निवाडेही फेब्रुवारी २०१९ मध्ये झाले आहेत. या निवाड्यांची एकूण रक्कम ३१४ कोटी १३ लाख २१ हजार इतकी आहे. या निवाड्यांचा अहवाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला होता.

तब्बल एक वर्षानंतर म्हणजेच, फेब्रुवारी २०२० मध्ये केवळ रत्नागिरी तालुक्यातील सहा गावांच्या निवाड्याची रक्कम ६९ कोटी १३ लाख ११ हजार १६४ रूपये प्राधिकरणाकडून येथील उपविभागीय कार्यालयाकडे फेब्रुवारी अखेर प्राप्त झाला आहे. मात्र, कोरोना संकटामुळे निधी वाटप खोळंबले होते.आता ही प्रक्रिया सुरू झाली असून, खातेदारांना नोटीस आणि बँकेच्या खाते क्रमांकाबरोबरच इतर माहितीसाठी अर्ज पाठविण्यात आला आहे. २ सप्टेंबरपासून मोबदला वाटप प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. या खातेदारांना तारखांनुसार त्यांच्या ग्रामपंचायतींमध्ये बोलावण्यात येणार आहे. कोरोनामुळे प्रत्येक दिवशी ५० खातेदारांना बोलाविले जाणार आहे.लोकमतकडून सातत्याने पाठपुरावारत्नागिरी जिल्ह्यातील पाली, पाली बाजारपेठ, साठरे, खानू, हातखंबा आणि पानवल या सहा गावांसाठी ६९ कोटी २० लाख ७२ हजार रूपये प्रांत कार्यालयाकडे फेब्रुवारीत आले आहेत. कोरोनामुळे वाटप प्रक्रिया थांबली होती. याबाबत लोकमतने सातत्याने पाठपुरावा केला.

टॅग्स :highwayमहामार्गRatnagiriरत्नागिरी