शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

रत्नागिरी : नाणार रिफायनरी प्रकल्प : सुकथनकर समितीमुळे नव्या वादाला तोंड?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 15:45 IST

नाणार रिफायनरी प्रकल्पाला असलेला विरोध डावलून हा प्रकल्प रेटून नेण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरू आहे. यासाठी गठीत केलेल्या या समितीमुळे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता असून, वाद उफाळण्याची भीती व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देसुकथनकर समितीमुळे नव्या वादाला तोंड?आमदार नितेश राणे यांचा व्टिटरवरून इशारा

रत्नागिरी : नाणार रिफायनरी प्रकल्पाला असलेला विरोध डावलून हा प्रकल्प रेटून नेण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरू आहे. त्याअंतर्गत आता राज्याचे माजी मुख्य सचिव द. म. सुकथनकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पातील अडचणी दूर करण्यासाठी चार सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. मात्र, प्रकल्प व्हावा व मनपरिवर्तन व्हावे, यासाठी गठीत केलेल्या या समितीमुळे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता असून, वाद उफाळण्याची भीती व्यक्त होत आहे.

कोणत्याही समितीने प्रकल्प व्हावा म्हणून मनपरिवर्तन करण्यासाठी देवगड, विजयदुर्गमध्ये पाऊल टाकले तर प्रसाद दिल्याशिवाय परत पाठवणार नाही. जनतेने पुन्हा-पुन्हा सांगितले आहे की, आम्हाला चर्चा नको, नाणार प्रकल्प रद्दच करा. मग ही समिती कुठले भजन करायला येणार आहे, असा सवाल करीत समिती येथे आलीच तर त्यावेळी काय घडेल, त्याची जबाबदारी आमची नाही, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी व्टिटरवरून दिला आहे.

राजापूर परिसरातही समितीला अटकाव करण्यासाठी रणनीती आखली जात असल्याची चर्चा आहे. सुकथनकर समितीचे गठन हे नाणार प्रकल्पाच्या प्रवर्तक आॅईल कंपन्यांनी गठीत केली असून, त्यामध्ये राज्याचे माजी मुख्य सचिव द. म. सुकथनकर, माजी वित्त आणि पेट्रोलियम सचिव डॉ. विजय केळकर, प्राध्यापक अभय पेठे, कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर यांचा समावेश आहे.आधी समर्थन व नंतर विरोध अशी भूमिका घेत वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या शिवसेनेकडून आता समितीच्या मुद्यावर कोणती भूमिका घेतली जाणार आहे, याकडे जिल्हावासियांचे लक्ष आहे. मात्र नाणार प्रकल्पाच्या विरोधात कार्यरत असलेल्या संघर्ष समिती व अन्य स्थानिक प्रकल्पग्रस्तांकडून समितीला तीव्र विरोध होत आहे.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पRatnagiriरत्नागिरीNitesh Raneनीतेश राणे