शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

 रत्नागिरीतील नगरवाचनालय एक लाख ग्रंथ परिपूर्तीच्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 17:05 IST

जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने एक लाख पुस्तक संख्या करण्याचा संकल्प केला. १०० दिवसांत ६ हजार पुस्तके जमा करण्याचे आव्हान होते. मात्र, रत्नागिरीतील वाचकप्रेमी नागरिकांनी वाचनालयाचा संकल्प तडीस नेण्यासाठी मोठा सहयोग केला आहे. जिल्हा नगरवाचनालय एक लाख ग्रंथ परिपूर्तीच्या उंबरठ्यावर असल्याची माहिती जिल्हा नगरवाचनालयाचे अध्यक्ष अ‍ॅड़ दीपक पटवर्धन यांनी दिली.

ठळक मुद्देवाचकप्रेमींचा संकल्पपूर्तीसाठी हातभारवाचनालयात पुस्तकांची समृद्धी, अ‍ॅड़ दीपक पटवर्धन यांची माहिती

रत्नागिरी : जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने एक लाख पुस्तक संख्या करण्याचा संकल्प केला. १०० दिवसांत ६ हजार पुस्तके जमा करण्याचे आव्हान होते. मात्र, रत्नागिरीतील वाचकप्रेमी नागरिकांनी वाचनालयाचा संकल्प तडीस नेण्यासाठी मोठा सहयोग केला आहे. जिल्हा नगरवाचनालय एक लाख ग्रंथ परिपूर्तीच्या उंबरठ्यावर असल्याची माहिती जिल्हा नगरवाचनालयाचे अध्यक्ष अ‍ॅड़ दीपक पटवर्धन यांनी दिली.पटवर्धन यांनी सांगितले की, समाजाच्या सर्व स्तरातून मोठा प्रतिसाद मिळाला आणि जी पुस्तक संख्या प्राप्त होण्यासाठी चार वर्षे लागली असती. ती पूर्ण करण्यासाठी जनसहयोग मिळाल्याने १०० दिवसात एक लाखांच्या पुसतकांचं स्वप्न साकार होताना दिसतंय.

विद्यार्थी, शिक्षक, डॉक्टर्स, वकील, बँकर्स, संस्था चालक शासकीय अधिकारी, कर्मचारी, साहित्यिक तसेच काही संस्था या सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि आजअखेर ९९ हजार पुस्तक संख्येचा टप्पा नगरवाचनालयाने गाठला आहे. आता एक हजार पुस्तकांची प्रतीक्षा आहे.अनेकांनी नजीकच्या काही दिवसांत पुस्तके देण्याचे मान्य केले आहे. या सर्वांच्या सहभागाने आपले रत्नागिरी जिल्हा नगरवाचनालय हे एक लाख ग्रंथ संपदेने सुसज्ज वाचनालय बनेल.

वाचनालयाला सहा हजार पुस्तके खरेदी करण्यासाठी किमान चार वर्षांचा कालावधी लागला असता तसेच लोकसहभागाचा मार्ग स्वीकारल्याने वाचकांनी आपल्या आवडीचे साहित्य प्रकार, पुस्तके जमा केली. त्यामुळे वाचनालयाच्या पुस्तकांची समृध्दी वाढली.रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय एक लाख ग्रंथ संख्या असणाऱ्या मोजक्या वाचनालयांच्या यादीत समाविष्ट होण्याचा क्षण समीप आला आहे. रत्नागिरीच्या इतिहासाचा जागता साक्षीदार असलेले हे वाचनालय १९० वर्षे रत्नागिरीकरांच्या वाचन तृष्णा वाढवत नेवून भागवत आहे.

इतिहासातील अनेक संदर्भ वाचनालयाशी निगडीत आहेत. रत्नागिरी शहराच्या सुसंस्कृत चेहऱ्याचे रत्नागिरी जिल्हा वाचनालय हे प्रतीक आहे. अनेक ज्येष्ठ, श्रेष्ठ स्वातंत्र्यकर्मी, साहित्यिक, राजकीय नेते यांच्या सहवासाने आणि ग्रंथसंपदेने संपन्न असे हे वाचनालय नव्या युगातल्या तंत्रज्ञानाचा अंगिकार करुन दिमाखदार रुपात आजही वाचन संस्कृती जतन करीत आहे.३१ जुलै रोजी हे वाचनालय एक लाख पुस्तक संख्या असलेले वाचनालय म्हणून ओळखले जाईल, असा विश्वासही पटवर्धन यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :literatureसाहित्यRatnagiriरत्नागिरी