शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

रत्नागिरी नगर परिषद : थेट निवडणुकीला सामोरे जाण्यावरून सेनेत दोन गट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 17:00 IST

रत्नागिरी नगर परिषदेत येत्या काही काळात नगराध्यक्ष पदावरून राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. विद्यमान नगराध्यक्ष राहुल पंडित यांना पक्षाने दिलेली २ वर्षांची मुदत डिसेंबर २०१८ मध्ये संपणार आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी नगर परिषद : थेट निवडणुकीला सामोरे जाण्यावरून सेनेत दोन गटनगराध्यक्षपदावरून राजकीय भूकंप होणार?

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेत येत्या काही काळात नगराध्यक्ष पदावरून राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. विद्यमान नगराध्यक्ष राहुल पंडित यांना पक्षाने दिलेली २ वर्षांची मुदत डिसेंबर २०१८ मध्ये संपणार आहे. त्यानंतर ठरल्याप्रमाणे बंड्या साळवी यांना नगराध्यक्षपदासाठी संधी देण्याचेही ठरले होते. त्यामुळे राहुल पंडित यांचा राजीनामा घेऊन थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला शिवसेनेने सामोरे जावे की, त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे, यावरून सेनेत दोन गट पडले आहेत.

नगराध्यक्ष राहुल पंडित

सन २०१९मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेट निवडणूक होणे सेनेला धोकादायक वाटते आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक होईपर्यंत पंडित यांना नगराध्यक्षपदावर मुदतवाढ मिळणार का, या चर्चेलाही उधाण आले आहे.३० सदस्य असलेल्या रत्नागिरी नगर परिषदेत सध्या सेनेकडे १७ नगरसेवकांचे बळ आहे. राष्ट्रवादीकडे ६, भाजपकडे ५ व अपक्ष २ असे विरोधकांकडे १३ नगरसेवकांचे बळ आहे. रत्नागिरी नगर परिषदेत एकहाती सत्ता मिळाल्यानंतर नगराध्यक्षपदासाठी अनेकजण इच्छुक होते. पदाचा वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाल्याने त्याबाबत ग्रामदेवतेच्या साक्षीने मार्ग काढण्यात आला.

बंड्या साळवी

नगराध्यक्षपदावर प्रथम २ वर्षांसाठी राहुल पंडित यांना संधी देण्याचे ठरले व त्यानंतर सेनेचे गटनेते बंड्या साळवी यांना नगराध्यक्षपदाची संधी देण्याचे ठरविण्यात आले होते.शिवसेनेत जे ठरते, त्याची अंमलबजावणी होते, हे याआधीही रत्नागिरीत दिसून आले आहे. उपनगराध्यक्ष असताना राहुल पंडित यांनी मुदत संपताच स्वत:हून राजीनामा दिला होता. नगराध्यक्षपदासाठी राहुल पंडित यांच्यासाठी शिवसेनेने ठरविलेला त्यांचा दोन वर्षांचा कार्यकाल येत्या डिसेंबर महिन्यात संपणार आहे.

त्यामुळे राहुल पंडित नगराध्यक्षपदाचा राजीनामा देतील, अशी चर्चा आहे. मात्र, विधानसभा निवडणूक पुढील वर्षी होणार असल्याने पंडित यांना राजीनामा द्यायला लावून थेट नगराध्यक्ष निवडणुकीला सामोरे जाण्यात सेनेतील एका गटाला धोका वाटत आहे.चांगले काम झाले नाही?ठरल्याप्रमाणे पंडित यांचा नगराध्यक्षपदाचा राजीनामा घेणे योग्यच आहे. रत्नागिरी शहर हा सेनेचा बालेकिल्ला असताना थेट नगराध्यक्ष निवडणुकीला सामोरे जाण्यात कोणताही धोका नाही, असे सेनेतील दुसऱ्या गटाचे म्हणणे आहे. थेट निवडणुकीला सामोरे जाण्यात काहीजणांना धोका वाटण्यामागे गेल्या दोन वर्षात चांगले काम झाले नाही, असे कोणाला वाटते काय, याचीही चर्चा सुरू झाली आहे.विरोधी नगरसेवकांना आॅफरनगरपरिषदेतील सत्ताधारी सेनेच्या काही नेत्यांकडून विरोधकांमधील दोन नगरसेवकांना एका गुप्त बैठकीत मोठी आॅफर देण्यात आल्याची चर्चा आहे. दोनपैकी एकाला उपनगराध्यक्षपदाची आॅफर मिळाली आहे. तसेच या काळात नगराध्यक्ष पंडित यांना सक्तीच्या रजेवर पाठवून कारभार उपनगराध्यक्षांकडे ठेवण्याचीही खेळी आहे.

मात्र, नगराध्यक्ष केवळ दोन महिन्यांसाठीच सक्तीच्या रजेवर जाऊ शकतात. त्यामुळे केवळ उपनगराध्यक्षपदाची खुर्ची मिळविण्यात कोणतेही स्वारस्य नाही, असे या दोन्ही नगरसेवकांकडून सांगितले जात आहे. या खेळीने नेमके काय साध्य होणार, याबाबतही तर्क वितर्क सुरू आहेत. 

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षRatnagiriरत्नागिरी