शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

रत्नागिरी : कडवई प्राथमिक आरोग्य केंद्राला ठोकले मनसेने टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 13:40 IST

कडवई प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवारी रात्री ९.३० वाजता विंचूदंशाचा रुग्ण आणला असता, त्याठिकाणी डॉक्टर किंवा कर्मचारी कोणीही उपस्थित नसल्याने अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी चक्क या आरोग्य केंद्रालाच टाळे ठोकत निषेध नोंदवला.

ठळक मुद्देकडवई प्राथमिक आरोग्य केंद्राला ठोकले मनसेने टाळे चर्चा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर टाळे काढण्याचा निर्णय

आरवली : कडवई प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवारी रात्री ९.३० वाजता विंचूदंशाचा रुग्ण आणला असता, त्याठिकाणी डॉक्टर किंवा कर्मचारी कोणीही उपस्थित नसल्याने अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी चक्क या आरोग्य केंद्रालाच टाळे ठोकत निषेध नोंदवला. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर वैद्यकिय अधिकारी कदम यांनी विनंती केल्यानंतर अखेर रात्री उशीरा टाळे खोलण्यात आले.बुधवारी रात्री तुरळ चोबारवाडी येथील विंचूदंशाचा रुग्ण कृ ष्णा पाचकले यांना येथे आणले असता केंद्राच्या दरवाजाला कडी आढळून आली. ग्रामस्थांनी ही बाब मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या कानावर घातली. चव्हाण यांनी प्रत्यक्ष पहाणी केली असता तेथे डॉक्टर किंवा कर्मचारी कोणीच नसल्याचे दिसले. त्यानंतर चव्हाण यांनी संबंधित रुग्णाला खासगी डॉक्टरकडे उपचारासाठी हलविले आणि तासभर वाट पाहिली. मात्र कोणीही दिसून न आल्याने अखेर त्यांंनी आरोग्य केंद्राला टाळे ठोकून या गोष्टीचा निषेध व्यक्त केला.

याचवेळी ह्युमिनीटी युनाटेड फेडरेशनचे कोकण विभागाचे अध्यक्ष सचिन शिंदे, रुपेश सावंत, सतिश राणे हे पदाधिकारी या भागात आपल्या खासगी कामासाठी आले असता त्यांना या घटनेची माहिती मिळताच ते ही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीची माहिती घेऊन ही बाब तात्काळ जिल्हा आरोग्य अधिकारी आठल्ये यांच्या कानी घालण्यात आली. तालुका आरोग्य अधिकारी रायभोळे यांना भ्रमणध्वनीवर याबाबतची माहिती देण्यात आली.रुग्णकल्याण समिती अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे यांना घटनेची खबर मिळताच त्यांनी चव्हाण यांच्याशी संपर्क साधून याबाबत माहिती घेतली. घटनेची खबर मिळताच परिसरातील ३० ते ४० ग्रामस्थ याठिकाणी जमा झाले होते.संबंधित वैद्यकिय अधिकारी यांचे निवासस्थानाची पहाणी केली असता निवासस्थानाच्या बाहेरील मुख्य दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. यावेळी याठिकाणी पांढऱ्या रंगाच्या दोन पिशव्यांमध्ये २५ ते ३० दारुच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या.या सर्व घटनांची पंचयादी सर्व उपस्थितांच्या समक्ष आणि कर्मचाऱ्यांच्या सहीने घालण्यात आली. त्याचवेळी ड्युटीवर असणाºया वैद्यकिय अधिकारी कदम येथे हमर झाल्या मात्र कोणतीही चर्चा न करता निघून गेल्या.

तासाभराने कदम यांनी जितेंद्र चव्हाण यांना टाळे काढण्याची विनंती केली. त्यानंतर रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर रात्री उशीरा चव्हाण यांनी टाळे काढण्याचा निर्णय घेतला. जिल्हा आरोग्य अधिकारी आठल्ये यांनी यावर समक्ष भेट देऊन चर्चा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आपण टाळे काढण्याचा निर्णय घेत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.आरोग्य केंद्रात शवविच्छेदन केंद्रावर लाखो रुपये खर्च होऊनही शवविच्छेदनासाठी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात जावे लागत असल्याने मृतांच्या नातेवाईकांची ससेहोलपट होत आहे. आरोग्य केंद्र परिसरात वाढलेले गवताचे जंगल मात्र तसेच असल्याने या परिसरात फिरणे धोकादायक बनले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.कडवई प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या दोन डॉक्टर कार्यरत आहेत. त्यामुळे पूर्वी एकच डॉक्टर असताना रुग्णाच्या होणाऱ्या तक्रारी आता कमी होणे गरजेचे आहे. मात्र तसे न होता या तक्रारी वाढत असल्याचे निदर्शनास येत आहेत. याबाबत तक्रार केली असता आपली नियुक्ती रद्द करुन घेण्याच्या धमक्या देत असल्याने ग्रामस्थ तक्रार करण्यास धजावत नसल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :MNSमनसेRatnagiriरत्नागिरी