शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रत्नागिरी नगराध्यक्ष निवडणूक: भाजपचा उमेदवार आज ठरणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 13:25 IST

रत्नागिरीच्या नगराध्यक्षपदासाठी २५ डिसेंबर रोजी निवडणूक होत आहे.

रत्नागिरी : थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक यावेळी चांगलीच रंगण्याची चिन्ह आहेत. शहर विकास आघाडीचे उमेदवार म्हणून मिलिंद कीर उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, तर ३० वर्षांची मैत्री तुटल्यानंतर शिवसेनेचे संभाव्य उमेदवार बंड्या साळवी यांच्यासमोर भाजपचा उमेदवारही निवडणूक आखाड्यात उतरविला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे रत्नागिरी प्रभारी प्रसाद लाड, आमदार निरंजन डावखरे आणि नीलेश राणे हे शनिवारी रत्नागिरीत येत असून, या दिवशी भाजपचा उमेदवार कोण हे ठरण्याची शक्यता आहे.

रत्नागिरीच्या नगराध्यक्षपदासाठी २५ डिसेंबर रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत शिवसेनेतर्फे सध्याचे प्रभारी नगराध्यक्ष बंड्या साळवी यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीत झालेली युती निवडणुकीनंतर तुटल्याने आता भाजप ही शिवसेना विरोधात आक्रमक झाली आहे.

रत्नागिरीच्या थेट नगराध्यक्षपदासाठी भाजपतर्फे राजेश सावंत, भाऊ शेट्ये, राजीव कीर तसेच मुन्ना चवंडे यांची नावे चर्चेत आहेत. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षपदासाठी कोणत्या नेत्याला उमेदवारी द्यावी, याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यासाठी भाजपचे नेते शनिवारी रत्नागिरी येत असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी प्रसारमाध्यमांना शुक्रवारी दिली.

अॅड. पटवर्धन म्हणाले, रत्नागिरी नगराध्यक्षपदाची निवडणूक ही रत्नागिरीकरांवर लादलेली आहे. निवडणुकीबाबत जनतेत संताप आहे. त्यामुळेच या निवडणुकीत भाजप आक्रमकपणे भाग घेणार आहे. शनिवारच्या नेत्यांच्या सभेत उमेदवार कोण हे निश्चित होईल, असे सांगितले.