शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

रत्नागिरी : पर्यटकांसाठी महाराष्ट्रातील पहिलीच नैसर्गिक गुहा खुली, जिद्दी माऊंटेनिअरिंगचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 17:53 IST

साहसी उपक्रमांबरोबरच समाजोपयोगी उपक्रमात सातत्याने सहभाग असलेल्या येथील जिद्दी माऊंटेनिअरिंगतर्फे रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली नैसर्गिक गुहा पर्यटकांसाठी खुली केली आहे. महाराष्ट्रातील ही पहिली नैसर्गिक गुहा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

ठळक मुद्देरत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी पर्यटकांसाठी नैसर्गिक गुहाजिद्दी माऊंटेनिअरिंगचे प्रयत्न, रोमांचकारी अनुभव३ ते ८५ वयोगटातील पर्यटकांनी घेतला गुहेत जाण्याचा रोमांचकारी अनुभव ४०० फुटापर्यंत खोल आहे गुहेचे अंतरंग

रत्नागिरी : साहसी उपक्रमांबरोबरच समाजोपयोगी उपक्रमात सातत्याने सहभाग असलेल्या येथील जिद्दी माऊंटेनिअरिंगतर्फे रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली नैसर्गिक गुहा पर्यटकांसाठी खुली केली आहे. महाराष्ट्रातील ही पहिली नैसर्गिक गुहा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पहिल्याच दिवशी ३ ते ८५ वयोगटातील पर्यटकांनी या गुहेत जाण्याचा रोमांचकारी अनुभव घेतला.गेल्या वर्षी नगरपरिषदेचा पर्यटन महोत्सव झाला. यावेळी नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी रत्नदुर्ग किल्ल्यावर असलेली गुहा काही कालावधीनंतर पर्यटकांना पाहण्यास खुली होईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार याची जबाबदारी जिद्दी माऊंटेनिअरिंग यांच्याकडे दिली होती. त्यानुसार आता ही गुहा पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे.

या गुहेतील आतील भाग अद्भूत असाच आहे. गुहेत असलेल्या २३५ फूट लांबीचा पाण्यातील प्रवास करण्यासाठी पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना लाईफ जॅकेटचीही सोय उपलब्ध आहे. आतील दोन निमुळत्या शिळांमधून प्रवास करणे, पर्यटकांसाठी आगळावेगळा अनुभव ठरतो. मंगळवारी पहिल्याच दिवशी ३ ते ८५ वयोगटातील पर्यटकांनी या गुहेत जाण्याचा रोमांचकारी अनुभव घेतला.असे आहे गुहेचे अंतरंगही गुहा ४०० फुटापर्यंत खोल आहे. गुहेत प्रवेश करताना सुरूवातीला ३ हात उतरावे लागते. त्यानंतर खऱ्या अर्थाने गुहेत जाण्याची वाट सुरू होते. १० फूट चालत गेल्यानंतर त्यापुढे ५ फूट सरपटत जावे लागते. पुन्हा ८ ते १० फूट चालत जावे लागते. त्यानंतर पुढे त्रिकोणी आकाराची शिळा चढून जावे लागते. पुन्हा १० ते १२ फूट उतरावे लागते. त्यासाठी शिडीची सोय आहे. पाण्यात उतरल्यानंतर २३५ फूट पाण्याचा प्रवास करावा लागतो.सुरक्षिततेची काळजीया गुहेतील २३५ फूट लांब आणि ४० इतकी खोली असलेल्या या पाण्यातील प्रवास करताना पर्यटकांच्या सुरक्षिततेला जिद्दी माऊंटेनिअरिंग संस्थेने प्राधान्य दिले आहे. हा प्रवास करताना प्रत्येक पर्यटकाला लाईफ जॅकेट पुरविले जाते. पर्यटकांसोबत या संस्थेचे दोन इन्स्ट्रक्टर दिले जातात. त्यांचे प्रशिक्षण जम्मू - काश्मीर तसेच राजस्थान येथे झालेले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीtourismपर्यटन