शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

रत्नागिरी : पुढाऱ्यांच्या शिफारशीवर कर्ज देणे बँकांसाठी संकटाचे :  तानाजीराव चोरगे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 13:59 IST

केवळ पुढाऱ्यांची शिफारस म्हणून कर्जवाटप केले गेले तर सहकार क्षेत्र कोणत्याही क्षणी धोक्यात येऊ शकते. ग्राहकाची विश्वासार्हता, त्यासाठीचे तारण आणि कर्ज घेण्यामागील कारण या त्रिसुत्रीचा विचार करूनच कर्जवाटप होणे गरजेचे आहे, असे मत रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देपुढाऱ्यांच्या शिफारशीवर कर्ज देणे बँकांसाठी संकटाचे : तानाजीराव चोरगे दापोलीतील मृतांच्या नातेवाईकांना अर्थसाह्य जिल्हा मध्यवर्ती बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा

रत्नागिरी : केवळ पुढाऱ्यांची शिफारस म्हणून कर्जवाटप केले गेले तर सहकार क्षेत्र कोणत्याही क्षणी धोक्यात येऊ शकते. ग्राहकाची विश्वासार्हता, त्यासाठीचे तारण आणि कर्ज घेण्यामागील कारण या त्रिसुत्रीचा विचार करूनच कर्जवाटप होणे गरजेचे आहे, असे मत रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे यांनी व्यक्त केले. अपघातात दगावलेल्या दापोली कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना दहा हजार रूपयांची मदत देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात झाली. देशातील सर्वोत्कृष्ट जिल्हा बँक अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल डॉ. चोरगे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये, शामराव पानवलकर, सुधाकर सावंत, मधुकर टिळेकर यांनी डॉ. चोरगे यांचा सत्कार केला.राजकीय पक्षांंचे पुढारी कार्यकर्त्यांसाठी कर्ज मागणीचे प्रस्ताव पाठवतात. मात्र, वेळेवर परतफेड होत आहे की नाही, याकडे दुर्लक्ष करतात. ही प्रवृत्ती वाढत असल्याने बँका, पतसंस्था अडचणीत येत आहेत. यापुढे प्रत्येक पुढाºयाने कर्ज मागणीचा प्रस्ताव सादर करताना परतफेडीची हमी द्यावी, असा सल्ला डॉ. चोरगे यांनी दिला.बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक या पदावर केलेली जीवन गांगण यांची नियुक्ती योग्यच असल्याचा निर्वाळा डॉ. चोरगे यांनी दिला. व्यवस्थापकीय संचालक पदावर गांगण यांची केलेली नियुक्ती सर्व सहमतीनेच आहे. कुणीही या नियुक्तीवर आक्षेप, हरकत घेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.साखर कारखान्यांच्या कर्जपुरवठ्यासाठी समितीराज्याच्या काही जिल्ह्यांतील साखर कारखान्यांनी जिल्हा बँकेकडे कर्जाची मागणी केली आहे. या कारखान्याची आर्थिक क्षमता पाहण्यासाठी जिल्हा बँक उपाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली असून, त्यात सात संचालकांचा समावेश आहे.

साखर कारखान्याचे अध्यक्ष, संचालक मंडळातील मान्यवर पुढारी नसल्यास त्यांना मागणीनुसार कर्जपुरवठा करण्याचे धोरण बँकेने स्वीकारले आहे, असे ते म्हणाले. अनेक पुढाऱ्यांनी जिल्हा बँकेला फसवले आहे. कर्ज वितरणातील चूक जिल्हा बँकेला कोणत्याही क्षणी महागात पडू शकते. त्यामुळेच ही समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती निपक्षपातीपणे आपले काम पार पाडेल, असा विश्वास डॉ. चोरगे यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रRatnagiriरत्नागिरी