शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : कोकण रेल्वेमुळे एस. टी.चा फायदा, सर्वाधिक ७२७ जादा गाड्या रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 16:57 IST

कोकण रेल्वेत मंगळवारी झालेल्या गोंधळात एस्. टी. महामंडळाचा फायदा झाला आहे. मंगळवारी रेल्वेचे प्रवासी एस्. टी.कडे वळल्याने जादा गाड्यांच्या वेळापत्रकापेक्षा तब्बल ६१ आणखी जादा गाड्या मुंबईकडे मार्गस्थ झाल्या.

ठळक मुद्देकोकण रेल्वेमुळे एस. टी.चा फायदासर्वाधिक ७२७ जादा गाड्या रवाना

रत्नागिरी : कोकण रेल्वेत मंगळवारी झालेल्या गोंधळात एस्. टी. महामंडळाचा फायदा झाला आहे. मंगळवारी रेल्वेचे प्रवासी एस्. टी.कडे वळल्याने जादा गाड्यांच्या वेळापत्रकापेक्षा तब्बल ६१ आणखी जादा गाड्या मुंबईकडे मार्गस्थ झाल्या.गौरी-गणपतींच्या विसर्जनाच्या दुसऱ्याच दिवशी एस. टी.च्या ६६६ गाड्यांचे आरक्षण करण्यात आले होते. कोकण रेल्वेच्या गाड्यांमध्ये रत्नागिरीच्या प्रवाशांना पायही ठेवायला जागा नसल्याने अनेक प्रवाशांनी अखेर एस. टी.कडे मोर्चा वळवला. त्यामुळे मंगळवारी एका दिवसात एस. टी.च्या ७२७ गाड्या मुंबईकडे रवाना झाल्या.गौरी - गणपतीसाठी मुंबई व उपनगरांतून २२२५ गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. पैकी रत्नागिरी जिल्ह्यात एकूण २ हजार ६९ गाड्या आल्या होत्या. मुंबईकरांच्या परतीच्या प्रवासासाठी रत्नागिरी विभागातून सोमवारपासूनच जादा गाड्या सुरू झाल्या आहेत. एकूण १३६६ जादा गाड्यांचे आरक्षण करण्यात आले होते. मात्र, कोकण रेल्वेत पाय ठेवायलाही जागा नसल्यामुळे प्रवासी अखेर एस. टी.कडे वळले असल्याने एस. टी.च्या संख्येत अचानक वाढ झाली आहे.कोकण रेल्वेच्या गाड्या सिंधुदुर्गातूनच भरून येत असल्यामुळे पॅसेंजर गाड्यातही जागा मिळत नाही. आरक्षण असूनही बसायला जागा मिळत नसल्याचे रेल्वे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे. रेल्वेच्या गर्दीत निभाव लागणार नसल्यामुळेच प्रवाशांनी एस. टी. प्रवासाला पसंती दर्शविली आहे.

मंगळवारी एस. टी.च्या ६६६ गाड्यांचे आरक्षण असतानाच प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे महामंडळाने आणखी ६१ जादा गाड्या सोडल्या. बुधवारसाठी ४२७ गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे ४५० गाड्या सोडण्यात आल्या.

प्रवाशांच्या मागणीनुसार एसटीने जादा गाड्या उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी रत्नागिरीविभागातील सर्व आगारातून जादा गाड्यांना मागणी वाढली. त्यामुळे एकाच दिवशी ६१ जादा गाड्या सोडण्यात आल्या. बुधवारी देखील २५ जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले. प्रवाशांची गैरसोय होवू नये यासाठी एसटी प्रशासन जादा गाड्यांची उपलब्धता करून देणार आहे.- अनिल मेहतर, विभागनियंत्रक, रत्नागिरी

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळRatnagiriरत्नागिरी