शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
6
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
7
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
8
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
9
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
10
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
11
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
12
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
13
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
14
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
15
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
16
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
17
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
18
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
19
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
20
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य

रत्नागिरी : कोकण रेल्वेमुळे एस. टी.चा फायदा, सर्वाधिक ७२७ जादा गाड्या रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 16:57 IST

कोकण रेल्वेत मंगळवारी झालेल्या गोंधळात एस्. टी. महामंडळाचा फायदा झाला आहे. मंगळवारी रेल्वेचे प्रवासी एस्. टी.कडे वळल्याने जादा गाड्यांच्या वेळापत्रकापेक्षा तब्बल ६१ आणखी जादा गाड्या मुंबईकडे मार्गस्थ झाल्या.

ठळक मुद्देकोकण रेल्वेमुळे एस. टी.चा फायदासर्वाधिक ७२७ जादा गाड्या रवाना

रत्नागिरी : कोकण रेल्वेत मंगळवारी झालेल्या गोंधळात एस्. टी. महामंडळाचा फायदा झाला आहे. मंगळवारी रेल्वेचे प्रवासी एस्. टी.कडे वळल्याने जादा गाड्यांच्या वेळापत्रकापेक्षा तब्बल ६१ आणखी जादा गाड्या मुंबईकडे मार्गस्थ झाल्या.गौरी-गणपतींच्या विसर्जनाच्या दुसऱ्याच दिवशी एस. टी.च्या ६६६ गाड्यांचे आरक्षण करण्यात आले होते. कोकण रेल्वेच्या गाड्यांमध्ये रत्नागिरीच्या प्रवाशांना पायही ठेवायला जागा नसल्याने अनेक प्रवाशांनी अखेर एस. टी.कडे मोर्चा वळवला. त्यामुळे मंगळवारी एका दिवसात एस. टी.च्या ७२७ गाड्या मुंबईकडे रवाना झाल्या.गौरी - गणपतीसाठी मुंबई व उपनगरांतून २२२५ गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. पैकी रत्नागिरी जिल्ह्यात एकूण २ हजार ६९ गाड्या आल्या होत्या. मुंबईकरांच्या परतीच्या प्रवासासाठी रत्नागिरी विभागातून सोमवारपासूनच जादा गाड्या सुरू झाल्या आहेत. एकूण १३६६ जादा गाड्यांचे आरक्षण करण्यात आले होते. मात्र, कोकण रेल्वेत पाय ठेवायलाही जागा नसल्यामुळे प्रवासी अखेर एस. टी.कडे वळले असल्याने एस. टी.च्या संख्येत अचानक वाढ झाली आहे.कोकण रेल्वेच्या गाड्या सिंधुदुर्गातूनच भरून येत असल्यामुळे पॅसेंजर गाड्यातही जागा मिळत नाही. आरक्षण असूनही बसायला जागा मिळत नसल्याचे रेल्वे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे. रेल्वेच्या गर्दीत निभाव लागणार नसल्यामुळेच प्रवाशांनी एस. टी. प्रवासाला पसंती दर्शविली आहे.

मंगळवारी एस. टी.च्या ६६६ गाड्यांचे आरक्षण असतानाच प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे महामंडळाने आणखी ६१ जादा गाड्या सोडल्या. बुधवारसाठी ४२७ गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे ४५० गाड्या सोडण्यात आल्या.

प्रवाशांच्या मागणीनुसार एसटीने जादा गाड्या उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी रत्नागिरीविभागातील सर्व आगारातून जादा गाड्यांना मागणी वाढली. त्यामुळे एकाच दिवशी ६१ जादा गाड्या सोडण्यात आल्या. बुधवारी देखील २५ जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले. प्रवाशांची गैरसोय होवू नये यासाठी एसटी प्रशासन जादा गाड्यांची उपलब्धता करून देणार आहे.- अनिल मेहतर, विभागनियंत्रक, रत्नागिरी

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळRatnagiriरत्नागिरी