शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

रत्नागिरी : कोकण रेल्वे-प्रकल्पग्रस्त वाद टिपेला,  जिल्हा प्रशासनाने उपोषणकर्त्यांना दिलेल्या वागणुकीचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 11:38 IST

प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने उपोषण करणाऱ्यांना आंदोलनकर्त्यांच्या अटकेचा आदेश देऊन हीन वागणूक देण्यात आली. या सर्व प्रकाराचा कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समिती आणि कुवारबाव व्यापारी संघाने पत्रकार परिषदेत निषेध केला व जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी केली.

ठळक मुद्देकोकण रेल्वे-प्रकल्पग्रस्त वाद टिपेलाजिल्हा प्रशासनाने उपोषणकर्त्यांना दिलेल्या वागणुकीचा निषेधरत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीची मागणीनोकर भरती आॅनलाईन, पारदर्शक करावी

रत्नागिरी : प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने उपोषण करणाऱ्यांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचे साधे सौजन्य रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविले नाही. मात्र, सायंकाळी आंदोलनकर्त्यांच्या अटकेचा आदेश देऊन हीन वागणूक देण्यात आली.

या सर्व प्रकाराचा कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समिती आणि कुवारबाव व्यापारी संघाने पत्रकार परिषदेत निषेध केला व जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी केली. याबाबत कोकण रेल्वेतर्फे भूमिका मांडली जाणार आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचा हा तिढा सुटणार की नाही, याबाबत चर्चेला उधाण आले आहे.२६ जानेवारी २०१८ रोजी विविध प्रश्नांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील आंदोलकांनी सकाळी ८ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपोषण केले. लोकशाही मार्गाने हे आंदोलन सुरू असताना जिल्हा प्रशासनाने त्याची साधी दखलही घेतली नाही.

उलट संतापलेल्या व जयस्तंभ येथे रस्त्यावर उभ्या राहिलेल्या उपोषणकर्त्यांच्या अटकेचे आदेश मात्र तत्काळ दिले गेले. हा सर्व प्रकारच अन्यायकारक आहे, असे चव्हाण, साळवी यांनी स्पष्ट केले व आपली भूमिका प्रसारमाध्यमांसमोर मांडली.यावेळी कोकणभूमी समितीचे अध्यक्ष संतोष चव्हाण व कुवारबाव व्यापारी संघाचे अध्यक्ष सुनील साळवी म्हणाले, प्रजासत्ताकदिनी लोकशाही पध्दतीने आंदोलन करणाऱ्यांबाबत घडलेला हा प्रकारच निषेधार्ह आहे.

जिल्हा प्रशासनाचे प्रमुख म्हणून या स्थितीला जिल्हाधिकारी जबाबदार आहेत. त्यांची येथून बदली होत नाही व आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरुच राहणार आहे. यावेळी कोकणभूमी कृती समितीचे कार्याध्यक्ष विनय मुकादम, सचिव अमोल सावंत, मानद सचिव प्रभाकर हातणकर, सहसचिव प्रतीक्षा सावंत, राजेंद्र आयरे, कुवारबाव व्यापारी संघाचे पदाधिकारी नीलेश लाड, सुधाकर सुर्वे आदी उपस्थित होते.यावेळी चव्हाण म्हणाले, उपोषण सुरू असताना रत्नागिरीचे आमदार उदय सामंत, भाजपचे पदाधिकारी राजेश सावंत, कॉँग्रेसचे चिपळूणचे प्रवक्ते अशोक जाधव, बॅ. नाथ पै सेवा संस्थेचे सल्लागार उमेश गोळवणकर यांनी उपोषणाच्या ठिकाणी येऊन आंदोलनाबाबतची भूमिका जाणून घेतली. मात्र, दिवसभरात जिल्हा प्रशासनातर्फे कोणताही प्रतिनिधी उपोषणकर्त्यांना भेटला नाही. सायंकाळी ५.१५ वाजेपर्यंत आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारण्यासही कोणी आले नाही.प्रकल्पग्रस्तांच्या १२०० मुलांना रेल्वेत नोकरीत घेतल्याचे कोकण रेल्वेचे अधिकारी सांगत आहेत. आम्ही त्यांची माहिती, नावे मागितली तर ती दिली जात नाहीत. ती नावे जाहीर करावीत, त्यांची यादी समितीला द्यावी, या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एका सातबारावरील एकाच व्यक्तिला नोकरीत घ्यावे, असे ठरलेले असताना एकाच सातबारावर नावे असलेल्या १३ जणांना कसे काय रेल्वेत सामावून घेतले जाते, याबाबत कोकण रेल्वेने खुलासा करावा, अशी मागणीही चव्हाण यांनी केली.नोकर भरती आॅनलाईन, पारदर्शक करावीकोकण रेल्वेचा सर्व कारभार आता संगणकीकृत आहे. आॅनलाईन आहे. असे असताना नोकर भरती प्रक्रिया आॅनलाईन का राबवली जात नाही. रेल्वेचा कारभार भरतीबाबतही पारदर्शक व्हावा, यासाठी आॅलाईन परीक्षा घ्यावी. उत्तर पत्रिका निकालानंतर आॅनलाईन शो करावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीIndian Railwayभारतीय रेल्वेcollectorतहसीलदार