शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

रत्नागिरी : बेशिस्त पार्किंगला जॅमर, वाहतूक शाखेची धडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 16:03 IST

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही दिवसांपूर्वीच शासकीय आणि खासगी व्यक्तींसाठी वाहनतळ निश्चित करण्यात आले आहेत. मात्र, तरीही बेशिस्तपणे वाहने लावली जात होती. मात्र, बुधवारपासून या परिसरात शहर वाहतूक शाखेकडून धडक कारवाई मोहीम राबविण्यात येत असल्याने बेशिस्त पार्किंगला चाप बसू लागला आहे. दरम्यान, या दोन दिवसांत ५० जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

ठळक मुद्देचालकांना शिस्त लागेपर्यंत कारवाई सुरूच राहणारवाहतूक शाखेकडून कडक कारवाईचे धोरण, सहकार्याचे आवाहन.

रत्नागिरी : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही दिवसांपूर्वीच शासकीय आणि खासगी व्यक्तींसाठी वाहनतळ निश्चित करण्यात आले आहेत. मात्र, तरीही बेशिस्तपणे वाहने लावली जात होती. मात्र, बुधवारपासून या परिसरात शहर वाहतूक शाखेकडून धडक कारवाई मोहीम राबविण्यात येत असल्याने बेशिस्त पार्किंगला चाप बसू लागला आहे. दरम्यान, या दोन दिवसांत ५० जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दोन इमारतींसह, प्रांत कार्यालय तसेच अन्य कार्यालयेही आहेत. या कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांकडून दुचाकी तसेच चारचाकी वाहने वाट्टेल तशी लावली जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. या परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसरात शासकीय वाहने तसेच खासगी वाहने यांच्यासाठी वाहतूक व्यवस्था नियोजित करण्यात आली आहे.गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी तसेच नागरिकांच्या खासगी वाहनांसाठी निश्चित केलेल्या ठिकाणांवर ह्यनो पार्किंगह्णचे फलकही लावण्यात आले आहेत. मात्र, तरीही नागरिक त्याच्यासमोरच आपली वाहने दामटवून लावत होते. त्यामुळे प्रशासनाला ही डोकदुखी ठरत होती.अखेर या बेशिस्त वाहतुकीला आळा बसण्यासाठी जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी शहर वाहतूक शाखेला या बेशिस्त पार्किंगवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या शाखेचा पदभार नुकताच स्वीकारलेले पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांच्या नेतृत्वाखाली बुधवारपासून या परिसरात कडक कारवाईला प्रारंभ झाला आहे.

नो पार्किंग झोनमध्ये लावलेल्या वाहनांना जॅमर लावण्यात येत असून, २०० रूपयांचा दंड आकारला जात आहे. याठिकाणी कडक कारवाई करण्यास सुरुवात झाल्याने आता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात होणाऱ्या वाहनांच्या गर्दीला शिस्त लागणार आहे.या परिसरातील वाहनव्यवस्था सुरळीत होईपर्यंत ही कारवाई करण्यात येणार असल्याचे शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी सांगितले. शहरात बेशिस्तपणे वाहने उभी करण्याचे प्रमाण वाढले आहे. वाहनचालकांनी ह्यनो पार्किंगह्णमध्ये वाहने उभी न करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी केल्या आहेत.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसRatnagiriरत्नागिरी