शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

रत्नागिरी : बेशिस्त पार्किंगला जॅमर, वाहतूक शाखेची धडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 16:03 IST

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही दिवसांपूर्वीच शासकीय आणि खासगी व्यक्तींसाठी वाहनतळ निश्चित करण्यात आले आहेत. मात्र, तरीही बेशिस्तपणे वाहने लावली जात होती. मात्र, बुधवारपासून या परिसरात शहर वाहतूक शाखेकडून धडक कारवाई मोहीम राबविण्यात येत असल्याने बेशिस्त पार्किंगला चाप बसू लागला आहे. दरम्यान, या दोन दिवसांत ५० जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

ठळक मुद्देचालकांना शिस्त लागेपर्यंत कारवाई सुरूच राहणारवाहतूक शाखेकडून कडक कारवाईचे धोरण, सहकार्याचे आवाहन.

रत्नागिरी : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही दिवसांपूर्वीच शासकीय आणि खासगी व्यक्तींसाठी वाहनतळ निश्चित करण्यात आले आहेत. मात्र, तरीही बेशिस्तपणे वाहने लावली जात होती. मात्र, बुधवारपासून या परिसरात शहर वाहतूक शाखेकडून धडक कारवाई मोहीम राबविण्यात येत असल्याने बेशिस्त पार्किंगला चाप बसू लागला आहे. दरम्यान, या दोन दिवसांत ५० जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दोन इमारतींसह, प्रांत कार्यालय तसेच अन्य कार्यालयेही आहेत. या कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांकडून दुचाकी तसेच चारचाकी वाहने वाट्टेल तशी लावली जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. या परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसरात शासकीय वाहने तसेच खासगी वाहने यांच्यासाठी वाहतूक व्यवस्था नियोजित करण्यात आली आहे.गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी तसेच नागरिकांच्या खासगी वाहनांसाठी निश्चित केलेल्या ठिकाणांवर ह्यनो पार्किंगह्णचे फलकही लावण्यात आले आहेत. मात्र, तरीही नागरिक त्याच्यासमोरच आपली वाहने दामटवून लावत होते. त्यामुळे प्रशासनाला ही डोकदुखी ठरत होती.अखेर या बेशिस्त वाहतुकीला आळा बसण्यासाठी जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी शहर वाहतूक शाखेला या बेशिस्त पार्किंगवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या शाखेचा पदभार नुकताच स्वीकारलेले पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांच्या नेतृत्वाखाली बुधवारपासून या परिसरात कडक कारवाईला प्रारंभ झाला आहे.

नो पार्किंग झोनमध्ये लावलेल्या वाहनांना जॅमर लावण्यात येत असून, २०० रूपयांचा दंड आकारला जात आहे. याठिकाणी कडक कारवाई करण्यास सुरुवात झाल्याने आता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात होणाऱ्या वाहनांच्या गर्दीला शिस्त लागणार आहे.या परिसरातील वाहनव्यवस्था सुरळीत होईपर्यंत ही कारवाई करण्यात येणार असल्याचे शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी सांगितले. शहरात बेशिस्तपणे वाहने उभी करण्याचे प्रमाण वाढले आहे. वाहनचालकांनी ह्यनो पार्किंगह्णमध्ये वाहने उभी न करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी केल्या आहेत.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसRatnagiriरत्नागिरी