शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

रत्नागिरी : असा साजरा झाला एसटीचा बर्थ डे, चालक, वाहकांनाही गुलाबपुष्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 16:48 IST

सुरक्षित प्रवास आणि विश्वासार्हता ही एस. टी.ची बलस्थाने आहेत. एस. टी.ची लोकप्रियता जनमानसात कायम आहे. काळाच्या ओघात एस. टी.चे रूपडे पालटत आहे. गेल्या ७० वर्षांच्या कालखंडात खूप बदल झाला असून, शिवशाही हे त्याचे द्योतक आहे. भविष्यात स्पर्धेच्या दृष्टीकोनातून एस. टी.ने आणखी दर्जेदार सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून द्याव्यात, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे यांनी केले.

ठळक मुद्देएसटी प्रशासनाने आणखी दर्जेदार सुविधा उपलब्ध कराव्यातप्रशासनामार्फत प्रवाशांनादेखील शुभेच्छा, चालक, वाहकांनाही गुलाबपुष्प

रत्नागिरी : सुरक्षित प्रवास आणि विश्वासार्हता ही एस. टी.ची बलस्थाने आहेत. एस. टी.ची लोकप्रियता जनमानसात कायम आहे. काळाच्या ओघात एस. टी.चे रूपडे पालटत आहे. गेल्या ७० वर्षांच्या कालखंडात खूप बदल झाला असून, शिवशाही हे त्याचे द्योतक आहे. भविष्यात स्पर्धेच्या दृष्टीकोनातून एस. टी.ने आणखी दर्जेदार सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून द्याव्यात, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे यांनी केले.राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७०व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून रत्नागिरी विभागातर्फे मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर विभाग नियंत्रक अनिल मेहतर, यंत्रअभियंता (चालन) विजय दिवटे, विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे, आगार व्यवस्थापक अजय मोरे उपस्थित होते. विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश विषद केला. यंत्रअभियंता (चालन) विजय दिवटे यांनी गेल्या ७० वर्षातील एस. टी. महामंडळाच्या कारकीर्दीचा आढावा घेतला.विभाग नियंत्रक अनिल मेहतर म्हणाले की, प्रवाशांच्या सहकार्यामुळे एस. टी.ने ७० वर्षांचा अविरत प्रवास साध्य केला आहे. यापुढील प्रवासही प्रवाशांच्या सहकार्यातूनच होणार आहे. प्रवाशांसाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. विभाग नियंत्रक मेहतर यांच्या हस्ते अभिजीत घोरपडे यांचे स्वागत करण्यात आले. सूत्रसंचालन राजलक्ष्मी सुर्वे यांनी केले. आगार व्यवस्थापक अजय मोरे यांनी आभार मानले.स्थानकांचा कायापालटसुरूवातीच्या काळातील एसटी व आताची एसटी यामध्ये प्रचंड बदल झाला असून आधुनिक तंत्रज्ञानाचे अवलंबन करून लागल्याने एसटीबरोबर बसस्थानकांचेही कायापालट होत असल्याचे यावेळी स्पष्ट केले. यावेळी एस्. टी. प्रशासनामार्फत प्रवाशांना पेढा व गुलाबपुष्प देवून शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीstate transportराज्य परीवहन महामंडळ