शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
3
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
4
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
5
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
6
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
7
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
8
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
9
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
10
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
11
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
12
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
13
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
16
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
17
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
18
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
19
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

रत्नागिरी : असा साजरा झाला एसटीचा बर्थ डे, चालक, वाहकांनाही गुलाबपुष्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 16:48 IST

सुरक्षित प्रवास आणि विश्वासार्हता ही एस. टी.ची बलस्थाने आहेत. एस. टी.ची लोकप्रियता जनमानसात कायम आहे. काळाच्या ओघात एस. टी.चे रूपडे पालटत आहे. गेल्या ७० वर्षांच्या कालखंडात खूप बदल झाला असून, शिवशाही हे त्याचे द्योतक आहे. भविष्यात स्पर्धेच्या दृष्टीकोनातून एस. टी.ने आणखी दर्जेदार सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून द्याव्यात, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे यांनी केले.

ठळक मुद्देएसटी प्रशासनाने आणखी दर्जेदार सुविधा उपलब्ध कराव्यातप्रशासनामार्फत प्रवाशांनादेखील शुभेच्छा, चालक, वाहकांनाही गुलाबपुष्प

रत्नागिरी : सुरक्षित प्रवास आणि विश्वासार्हता ही एस. टी.ची बलस्थाने आहेत. एस. टी.ची लोकप्रियता जनमानसात कायम आहे. काळाच्या ओघात एस. टी.चे रूपडे पालटत आहे. गेल्या ७० वर्षांच्या कालखंडात खूप बदल झाला असून, शिवशाही हे त्याचे द्योतक आहे. भविष्यात स्पर्धेच्या दृष्टीकोनातून एस. टी.ने आणखी दर्जेदार सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून द्याव्यात, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे यांनी केले.राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७०व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून रत्नागिरी विभागातर्फे मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर विभाग नियंत्रक अनिल मेहतर, यंत्रअभियंता (चालन) विजय दिवटे, विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे, आगार व्यवस्थापक अजय मोरे उपस्थित होते. विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश विषद केला. यंत्रअभियंता (चालन) विजय दिवटे यांनी गेल्या ७० वर्षातील एस. टी. महामंडळाच्या कारकीर्दीचा आढावा घेतला.विभाग नियंत्रक अनिल मेहतर म्हणाले की, प्रवाशांच्या सहकार्यामुळे एस. टी.ने ७० वर्षांचा अविरत प्रवास साध्य केला आहे. यापुढील प्रवासही प्रवाशांच्या सहकार्यातूनच होणार आहे. प्रवाशांसाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. विभाग नियंत्रक मेहतर यांच्या हस्ते अभिजीत घोरपडे यांचे स्वागत करण्यात आले. सूत्रसंचालन राजलक्ष्मी सुर्वे यांनी केले. आगार व्यवस्थापक अजय मोरे यांनी आभार मानले.स्थानकांचा कायापालटसुरूवातीच्या काळातील एसटी व आताची एसटी यामध्ये प्रचंड बदल झाला असून आधुनिक तंत्रज्ञानाचे अवलंबन करून लागल्याने एसटीबरोबर बसस्थानकांचेही कायापालट होत असल्याचे यावेळी स्पष्ट केले. यावेळी एस्. टी. प्रशासनामार्फत प्रवाशांना पेढा व गुलाबपुष्प देवून शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीstate transportराज्य परीवहन महामंडळ