शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

रत्नागिरी : असा साजरा झाला एसटीचा बर्थ डे, चालक, वाहकांनाही गुलाबपुष्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 16:48 IST

सुरक्षित प्रवास आणि विश्वासार्हता ही एस. टी.ची बलस्थाने आहेत. एस. टी.ची लोकप्रियता जनमानसात कायम आहे. काळाच्या ओघात एस. टी.चे रूपडे पालटत आहे. गेल्या ७० वर्षांच्या कालखंडात खूप बदल झाला असून, शिवशाही हे त्याचे द्योतक आहे. भविष्यात स्पर्धेच्या दृष्टीकोनातून एस. टी.ने आणखी दर्जेदार सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून द्याव्यात, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे यांनी केले.

ठळक मुद्देएसटी प्रशासनाने आणखी दर्जेदार सुविधा उपलब्ध कराव्यातप्रशासनामार्फत प्रवाशांनादेखील शुभेच्छा, चालक, वाहकांनाही गुलाबपुष्प

रत्नागिरी : सुरक्षित प्रवास आणि विश्वासार्हता ही एस. टी.ची बलस्थाने आहेत. एस. टी.ची लोकप्रियता जनमानसात कायम आहे. काळाच्या ओघात एस. टी.चे रूपडे पालटत आहे. गेल्या ७० वर्षांच्या कालखंडात खूप बदल झाला असून, शिवशाही हे त्याचे द्योतक आहे. भविष्यात स्पर्धेच्या दृष्टीकोनातून एस. टी.ने आणखी दर्जेदार सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून द्याव्यात, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे यांनी केले.राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७०व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून रत्नागिरी विभागातर्फे मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर विभाग नियंत्रक अनिल मेहतर, यंत्रअभियंता (चालन) विजय दिवटे, विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे, आगार व्यवस्थापक अजय मोरे उपस्थित होते. विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश विषद केला. यंत्रअभियंता (चालन) विजय दिवटे यांनी गेल्या ७० वर्षातील एस. टी. महामंडळाच्या कारकीर्दीचा आढावा घेतला.विभाग नियंत्रक अनिल मेहतर म्हणाले की, प्रवाशांच्या सहकार्यामुळे एस. टी.ने ७० वर्षांचा अविरत प्रवास साध्य केला आहे. यापुढील प्रवासही प्रवाशांच्या सहकार्यातूनच होणार आहे. प्रवाशांसाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. विभाग नियंत्रक मेहतर यांच्या हस्ते अभिजीत घोरपडे यांचे स्वागत करण्यात आले. सूत्रसंचालन राजलक्ष्मी सुर्वे यांनी केले. आगार व्यवस्थापक अजय मोरे यांनी आभार मानले.स्थानकांचा कायापालटसुरूवातीच्या काळातील एसटी व आताची एसटी यामध्ये प्रचंड बदल झाला असून आधुनिक तंत्रज्ञानाचे अवलंबन करून लागल्याने एसटीबरोबर बसस्थानकांचेही कायापालट होत असल्याचे यावेळी स्पष्ट केले. यावेळी एस्. टी. प्रशासनामार्फत प्रवाशांना पेढा व गुलाबपुष्प देवून शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीstate transportराज्य परीवहन महामंडळ