शहरं
Join us  
Trending Stories
1
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, कारण काय?
2
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
3
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
4
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
5
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
6
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
7
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
8
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
9
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
10
'स्क्विड गेम'मधला गी ह्युन हिंदी सिनेमात दिसणार? अभिनेता ली जुंगने दिली प्रतिक्रिया
11
भारत रशियाच्या मैत्रीमुळे अमेरिकेला पोटदुखी; ५००% टॅरिफसाठी विधेयक सादर, काय होणार आपल्यावर परिणाम?
12
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू
13
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
14
ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत असतानाच झाला स्फोट; पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याचा बॉम्बस्फोटात मृत्यू
15
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
16
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
17
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
18
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
19
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
20
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

रत्नागिरी : पाठपुरावा करुनही मंत्र्यांचा प्रतिसाद नाही हे आमचे दुर्दैव : विनायक राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 17:13 IST

शिक्षक भरतीबाबत पाठपुरावा करुनही मंत्र्यांचा प्रतिसाद मिळत नाही, हे आमचे दुर्दैव आहे, असे प्रतिपादन रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी केले.

ठळक मुद्देपाठपुरावा करुनही मंत्र्यांचा प्रतिसाद नाही हे आमचे दुर्दैव : विनायक राऊतअशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघाच्या त्रैवार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन

चिपळूण : जिल्हा परिषद शाळांची अवस्था आज बिकट झालेली आहे. शून्य पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये दोन शिक्षक तर जास्त पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये शिक्षकच नाहीत, अशी परिस्थिती आहे. याकडे शासनाचेही दुर्लक्ष होत आहे. शासनाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यावर बंदी घातली आहे. शिक्षक भरतीबाबत पाठपुरावा करुनही मंत्र्यांचा प्रतिसाद मिळत नाही, हे आमचे दुर्दैव आहे, असे प्रतिपादन रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी केले.चिपळूणमधील डीबीजे महाविद्यालयाच्या प्रांगणात महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघातर्फे अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघाच्या १२ व्या त्रैवार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन खासदार राऊत यांच्याहस्ते आज (शनिवारी) करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, सभापती पूजा निकम, नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मंगेश तांबे, प्राचार्य डॉ. श्याम जोशी, महासंघाचे सरचिटणीस डॉ. आर. बी. सिंह, आॅल इंडिया कॉलेज अ‍ॅण्ड युनिव्हर्सिटी एम्प्लॉईज फेडरेशनचे सरचिटणीस नारायण सहा, कार्याध्यक्ष शशिकांत कामठे, महासंघाचे अध्यक्ष विजय निकम, उपाध्यक्ष अनिल कलकुटकी, विजय सावंत उपस्थित होते.कार्यक्रमात प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार राऊत म्हणाले की, शासनाने शिक्षण क्षेत्राचे व्यापारीकरण केले आहे. त्यामुळे ज्ञानदानाचे पावित्र्य नष्ट होत आहे आणि याला सर्वस्वी शासनच जबाबदार आहे.

महर्षी कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पैसे जमा करुन शिक्षणासाठी योगदान दिले. शिक्षण क्षेत्रात शासन दररोज नवनवीन जीआर आणत आहे. त्यामध्ये वारंवार बदलही करण्यात येत आहेत. त्यामुळे हे शासन जीआर शासन असल्याची टीका खासदार राऊत यांनी केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महासंघाचे अध्यक्ष विजय निकम यांनी केले. गेल्या ४० वर्षांच्या संघाच्या कार्याचा यावेळी आढावा घेण्यात आला.महासंघाचे सरचिटणीस डॉ. आर. बी. सिंह म्हणाले की, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी २०१३पासून लढा उभारला आहे. विविध मागण्यांसाठी व नोकर भरतीसाठी मंत्र्यांपर्यंत पाठपुरावा केला आहे. तसेच यापुढेही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत लढा सुरु राहणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. या अधिवेशनाला नाशिक, नंदूरबार, औरंगाबाद, मराठवाडा येथील शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Teacherशिक्षकRatnagiriरत्नागिरी