शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
3
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
4
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
5
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
6
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
7
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
8
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
9
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
10
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
11
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
12
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
13
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
14
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
15
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
16
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
17
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
18
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
19
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
20
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश

रत्नागिरी : पाठपुरावा करुनही मंत्र्यांचा प्रतिसाद नाही हे आमचे दुर्दैव : विनायक राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 17:13 IST

शिक्षक भरतीबाबत पाठपुरावा करुनही मंत्र्यांचा प्रतिसाद मिळत नाही, हे आमचे दुर्दैव आहे, असे प्रतिपादन रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी केले.

ठळक मुद्देपाठपुरावा करुनही मंत्र्यांचा प्रतिसाद नाही हे आमचे दुर्दैव : विनायक राऊतअशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघाच्या त्रैवार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन

चिपळूण : जिल्हा परिषद शाळांची अवस्था आज बिकट झालेली आहे. शून्य पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये दोन शिक्षक तर जास्त पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये शिक्षकच नाहीत, अशी परिस्थिती आहे. याकडे शासनाचेही दुर्लक्ष होत आहे. शासनाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यावर बंदी घातली आहे. शिक्षक भरतीबाबत पाठपुरावा करुनही मंत्र्यांचा प्रतिसाद मिळत नाही, हे आमचे दुर्दैव आहे, असे प्रतिपादन रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी केले.चिपळूणमधील डीबीजे महाविद्यालयाच्या प्रांगणात महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघातर्फे अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघाच्या १२ व्या त्रैवार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन खासदार राऊत यांच्याहस्ते आज (शनिवारी) करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, सभापती पूजा निकम, नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मंगेश तांबे, प्राचार्य डॉ. श्याम जोशी, महासंघाचे सरचिटणीस डॉ. आर. बी. सिंह, आॅल इंडिया कॉलेज अ‍ॅण्ड युनिव्हर्सिटी एम्प्लॉईज फेडरेशनचे सरचिटणीस नारायण सहा, कार्याध्यक्ष शशिकांत कामठे, महासंघाचे अध्यक्ष विजय निकम, उपाध्यक्ष अनिल कलकुटकी, विजय सावंत उपस्थित होते.कार्यक्रमात प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार राऊत म्हणाले की, शासनाने शिक्षण क्षेत्राचे व्यापारीकरण केले आहे. त्यामुळे ज्ञानदानाचे पावित्र्य नष्ट होत आहे आणि याला सर्वस्वी शासनच जबाबदार आहे.

महर्षी कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पैसे जमा करुन शिक्षणासाठी योगदान दिले. शिक्षण क्षेत्रात शासन दररोज नवनवीन जीआर आणत आहे. त्यामध्ये वारंवार बदलही करण्यात येत आहेत. त्यामुळे हे शासन जीआर शासन असल्याची टीका खासदार राऊत यांनी केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महासंघाचे अध्यक्ष विजय निकम यांनी केले. गेल्या ४० वर्षांच्या संघाच्या कार्याचा यावेळी आढावा घेण्यात आला.महासंघाचे सरचिटणीस डॉ. आर. बी. सिंह म्हणाले की, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी २०१३पासून लढा उभारला आहे. विविध मागण्यांसाठी व नोकर भरतीसाठी मंत्र्यांपर्यंत पाठपुरावा केला आहे. तसेच यापुढेही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत लढा सुरु राहणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. या अधिवेशनाला नाशिक, नंदूरबार, औरंगाबाद, मराठवाडा येथील शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Teacherशिक्षकRatnagiriरत्नागिरी