शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
3
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
4
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
5
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
6
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
7
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
8
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
9
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
10
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
11
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
12
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
13
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
14
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
15
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
16
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
17
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
18
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
19
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
20
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित

रत्नागिरी : वैशाख वणव्यामुळे नागरिकांना जगणे असह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 16:28 IST

वैशाख वणवा सुरु झाल्याने एकूणच वातावरण कमालीचे तापले आहे. वाढत्या उष्म्यामुळे व पर्यावरणातील बदलामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत असून, उष्म्यामुळे सामान्य माणसाचे जगणे अशक्य झाले आहे.

ठळक मुद्देवैशाख वणव्यामुळे नागरिकांना जगणे असह्यवाढत्या उष्म्यामुळे, पर्यावरणातील बदलामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही

चिपळूण : वैशाख वणवा सुरु झाल्याने एकूणच वातावरण कमालीचे तापले आहे. वाढत्या उष्म्यामुळे व पर्यावरणातील बदलामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत असून, उष्म्यामुळे सामान्य माणसाचे जगणे अशक्य झाले आहे.मार्च महिन्यापासूनच कोकणात ऊन वाढायला लागते. त्याचे चटके असह्य होतात. वैशाख महिना सुरु झाला आणि उन्हाची तीव्रता अधिकच जाणवू लागली. सकाळी सूर्याची किरणे थेट अंगावर घेणे अवघड होऊ लागले. दुपारी तर सगळीकडे रखरखाट असतो. यावेळी रस्त्यावरुन चालणेही अवघड होते.

भाताची मशागत सुरु झाली असून, झाडेही अद्याप उघडी, बोडकी आहेत. त्यामुळे उष्णतेची झळ सहज शरीराला पोहोचते. दुपारच्यावेळी गरम वाफांनी घरात स्वस्त बसणेही अवघड होते. अशावेळी रस्त्यावरुन चालणे हे दिव्यच असते. सकाळी ९ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत वातावरण कमालीचे तापलेले असते. उकाड्यामुळे अंगातून घामाच्या धारा वाहत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.वाढत्या उष्म्यामुळे गेले तीन ते चार दिवस वातावरणात मोठा बदल झाला आहे. मंगळवारी सायंकाळी चिपळूण तालुक्यात वादळी पाऊस पडल्यामुळे उष्णता अधिकच वाढली आहे.

हा वैशाख वणवा असाच सुरु राहिला आणि तापमान अधिकाधिक वाढत राहिले तर उष्णतेची लाट येऊ शकते. त्याचा परिणाम मानवी आयुष्यावर होऊ शकतो. उष्म्यामुळे शीतपेय, कलिंगड किंवा थंड पदार्थांना मागणी वाढली आहे. त्यांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीTemperatureतापमान