शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

रत्नागिरी : वैशाख वणव्यामुळे नागरिकांना जगणे असह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 16:28 IST

वैशाख वणवा सुरु झाल्याने एकूणच वातावरण कमालीचे तापले आहे. वाढत्या उष्म्यामुळे व पर्यावरणातील बदलामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत असून, उष्म्यामुळे सामान्य माणसाचे जगणे अशक्य झाले आहे.

ठळक मुद्देवैशाख वणव्यामुळे नागरिकांना जगणे असह्यवाढत्या उष्म्यामुळे, पर्यावरणातील बदलामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही

चिपळूण : वैशाख वणवा सुरु झाल्याने एकूणच वातावरण कमालीचे तापले आहे. वाढत्या उष्म्यामुळे व पर्यावरणातील बदलामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत असून, उष्म्यामुळे सामान्य माणसाचे जगणे अशक्य झाले आहे.मार्च महिन्यापासूनच कोकणात ऊन वाढायला लागते. त्याचे चटके असह्य होतात. वैशाख महिना सुरु झाला आणि उन्हाची तीव्रता अधिकच जाणवू लागली. सकाळी सूर्याची किरणे थेट अंगावर घेणे अवघड होऊ लागले. दुपारी तर सगळीकडे रखरखाट असतो. यावेळी रस्त्यावरुन चालणेही अवघड होते.

भाताची मशागत सुरु झाली असून, झाडेही अद्याप उघडी, बोडकी आहेत. त्यामुळे उष्णतेची झळ सहज शरीराला पोहोचते. दुपारच्यावेळी गरम वाफांनी घरात स्वस्त बसणेही अवघड होते. अशावेळी रस्त्यावरुन चालणे हे दिव्यच असते. सकाळी ९ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत वातावरण कमालीचे तापलेले असते. उकाड्यामुळे अंगातून घामाच्या धारा वाहत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.वाढत्या उष्म्यामुळे गेले तीन ते चार दिवस वातावरणात मोठा बदल झाला आहे. मंगळवारी सायंकाळी चिपळूण तालुक्यात वादळी पाऊस पडल्यामुळे उष्णता अधिकच वाढली आहे.

हा वैशाख वणवा असाच सुरु राहिला आणि तापमान अधिकाधिक वाढत राहिले तर उष्णतेची लाट येऊ शकते. त्याचा परिणाम मानवी आयुष्यावर होऊ शकतो. उष्म्यामुळे शीतपेय, कलिंगड किंवा थंड पदार्थांना मागणी वाढली आहे. त्यांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीTemperatureतापमान