शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे धरणे, कनिष्ठ महाविद्यालये बंद, १८६ शिक्षक  सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 20:18 IST

देशात प्रथमच होणाऱ्या खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातून एकमेव ईशा केतन पवारची निवड झाली असून, धनुर्विद्या खेळात शालेय पदकाचा करिश्मा घडवून तिने कोकणच्या क्रीडाक्षेत्रात ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे.

ठळक मुद्देकनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे धरणे१८६ शिक्षक सहभागी कनिष्ठ महाविद्यालये बंद

रत्नागिरी : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध मागण्यांबाबत वारंवार आश्वासने देण्यात आली होती. मात्र, पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने आता महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेच्या नेतृत्त्वाखाली चौथ्या टप्प्यातील  आंदोलन करण्यात आले.

सर्व कनिष्ठ महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. जिल्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमिक शिक्षण विभागासमोर अर्धा दिवस धरणे आंदोलन केले. यात जिल्ह्यातील  कनिष्ठ महाविद्यालयांचे १८६ शिक्षक  सहभागी झाले होते.

२ मे २०१२ नंतरच्या पायाभूत रिक्त पदांवर शिक्षण संचालकांच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयाकडून अतिरिक्त शिक्षक न पाठवल्याने शैक्षणिक संस्थांनी शिक्षक भरती केली आहे. या शिक्षकांच्या मान्यतेसंबंधी निर्णय करण्यासाठी एप्रिल २०१७मध्ये वैयक्तिक मान्यता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. परंतु अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही.

चार महिन्यांचा कालावधी उलटूनही याबाबत अजून आढावा घेण्याचेच काम सुरू आहे. त्यामुळे या नियुक्त शिक्षकांच्या संदर्भात जोपर्यत निर्णय होत नाही तोपर्यंत अभियोग्यता चाचणीद्वारे भरती प्रक्रिया राबविण्यात येऊ नये, अशी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेची मागणी आहे. 

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध मागण्यांबाबत गेली तीन वर्षे वारंवार आश्वासने देण्यात आली आहेत. मात्र, पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने २८ फेब्रुवारी २०१७ पासून राज्य संघटनेने टप्प्याटप्प्याने आंदोलनाला प्रारंभ केला आहे.

६ सप्टेंबर २०१७ च्या बैठकीत दिवाळीपुर्वी २०१२ पासूनचच्या शिक्षकांना नियुक्ती मान्यता देण्याचे व इतर मागण्यांची पुर्तता करण्याचे आश्वासन देऊनही ते पाळण्यात आल नाही. यानंतर २३ आॅक्टोबर २०१७ ला वरिष्ठ व निवडश्रेणीबाबतचा अन्यायकारक शासनादेश काढण्यात आला.

कायम विनाअनुदानित शिक्षकांचे वेतन एप्रिल २०१४ पासून देण्याचे शासनाने मान्य करूनही अद्याप वेतन सुरू झालेले नाही. या शिक्षकांना विनावेतन काम करावे लागत आहे. नोव्हेंबर २००५ नंतरच्या नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना अद्यापही लागू झालेली नाही. 

या सर्व मागण्यांबाबत राज्य महासंघाने वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यभर आज चौथ्या टप्प्यातील आंदोलन करण्यात आले. दिवसभर जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालये बंद ठेवण्यात आली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीTeacherशिक्षक