शहरं
Join us  
Trending Stories
1
जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला
2
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
3
ट्रम्प यांचा यु-टर्न! अमेरिकेच्या 'या' निर्णयानं भारताला होणार २६ हजार कोटींचा फायदा, 'यांना' मिळणार मोठा लाभ
4
सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास
5
Chandrayaan 4: भारत चंद्रावर जाणार; तेथील नमुने पृथ्वीवर आणणार, चांद्रयान-४ मोहिमेला सरकारची मंजुरी
6
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
7
Mumbai: मिरा-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर भीषण अपघात; ६० फुटांवरून पडून सुपरवायझरचा मृत्यू!
8
GenZ च्या आंदोलनामुळे हादरलेल्या नेपाळमध्ये अखेर निवडणुकांची घोषणा, मार्च महिन्यात मतदान
9
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
10
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
11
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
12
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
13
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
14
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
15
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी धनलाभाच्या दृष्टीने शुभ दिवस, प्रवास संभवतात
16
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
17
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
18
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
19
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
20
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे धरणे, कनिष्ठ महाविद्यालये बंद, १८६ शिक्षक  सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 20:18 IST

देशात प्रथमच होणाऱ्या खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातून एकमेव ईशा केतन पवारची निवड झाली असून, धनुर्विद्या खेळात शालेय पदकाचा करिश्मा घडवून तिने कोकणच्या क्रीडाक्षेत्रात ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे.

ठळक मुद्देकनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे धरणे१८६ शिक्षक सहभागी कनिष्ठ महाविद्यालये बंद

रत्नागिरी : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध मागण्यांबाबत वारंवार आश्वासने देण्यात आली होती. मात्र, पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने आता महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेच्या नेतृत्त्वाखाली चौथ्या टप्प्यातील  आंदोलन करण्यात आले.

सर्व कनिष्ठ महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. जिल्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमिक शिक्षण विभागासमोर अर्धा दिवस धरणे आंदोलन केले. यात जिल्ह्यातील  कनिष्ठ महाविद्यालयांचे १८६ शिक्षक  सहभागी झाले होते.

२ मे २०१२ नंतरच्या पायाभूत रिक्त पदांवर शिक्षण संचालकांच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयाकडून अतिरिक्त शिक्षक न पाठवल्याने शैक्षणिक संस्थांनी शिक्षक भरती केली आहे. या शिक्षकांच्या मान्यतेसंबंधी निर्णय करण्यासाठी एप्रिल २०१७मध्ये वैयक्तिक मान्यता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. परंतु अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही.

चार महिन्यांचा कालावधी उलटूनही याबाबत अजून आढावा घेण्याचेच काम सुरू आहे. त्यामुळे या नियुक्त शिक्षकांच्या संदर्भात जोपर्यत निर्णय होत नाही तोपर्यंत अभियोग्यता चाचणीद्वारे भरती प्रक्रिया राबविण्यात येऊ नये, अशी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेची मागणी आहे. 

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध मागण्यांबाबत गेली तीन वर्षे वारंवार आश्वासने देण्यात आली आहेत. मात्र, पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने २८ फेब्रुवारी २०१७ पासून राज्य संघटनेने टप्प्याटप्प्याने आंदोलनाला प्रारंभ केला आहे.

६ सप्टेंबर २०१७ च्या बैठकीत दिवाळीपुर्वी २०१२ पासूनचच्या शिक्षकांना नियुक्ती मान्यता देण्याचे व इतर मागण्यांची पुर्तता करण्याचे आश्वासन देऊनही ते पाळण्यात आल नाही. यानंतर २३ आॅक्टोबर २०१७ ला वरिष्ठ व निवडश्रेणीबाबतचा अन्यायकारक शासनादेश काढण्यात आला.

कायम विनाअनुदानित शिक्षकांचे वेतन एप्रिल २०१४ पासून देण्याचे शासनाने मान्य करूनही अद्याप वेतन सुरू झालेले नाही. या शिक्षकांना विनावेतन काम करावे लागत आहे. नोव्हेंबर २००५ नंतरच्या नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना अद्यापही लागू झालेली नाही. 

या सर्व मागण्यांबाबत राज्य महासंघाने वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यभर आज चौथ्या टप्प्यातील आंदोलन करण्यात आले. दिवसभर जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालये बंद ठेवण्यात आली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीTeacherशिक्षक