शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरात रत्नागिरीचा ठसा : नऊ पंचायत समित्यांकडून ३ हजार ६६ हेक्टरवर लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 12:50 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात यंदा रोजगार हमी योजनेंतर्गत झालेल्या फळबाग लागवडीत रत्नागिरी जिल्हा परिषदेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. एकूण ५,७१९ ...

ठळक मुद्देफळबाग लागवडीत रत्नागिरी जिल्हा परिषद अव्वल

रत्नागिरी : जिल्ह्यात यंदा रोजगार हमी योजनेंतर्गत झालेल्या फळबाग लागवडीत रत्नागिरीजिल्हा परिषदेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. एकूण ५,७१९ हेक्टर क्षेत्रावर झालेल्या फळबाग लागवडीपैकी जिल्हा परिषदेने ३,०६६ हेक्टर क्षेत्रावर लागवड केली असून, उर्वरित क्षेत्रावर कृषी विभागातर्फे लागवड करण्यात आली आहे. एवढ्या क्षेत्रावर लागवड करणारी रत्नागिरी जिल्हा परिषद राज्यात अव्वल ठरली आहे.

रोजगार हमी योजनेंतर्गत दहा हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यानुसार प्रशासकीय मान्यताही मिळाली होती. मात्र, ऐनवेळी रोपे कमी पडल्याने केवळ पाच हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती. यावर्षी गतवर्षीचे उरलेले ४,७८८ हजार आणि यावर्षी नव्याने ७,७१०  मिळून एकूण १२,४९५ हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून खासगी रोपवाटिकांतून १६ लाख आणि शासकीय रोपवाटिकांतून व कृषी विद्यापीठातून ८ लाख अशा  २४ लाख रोपांची उपलब्धताही करण्यात आली.

जिल्ह्यात कृषी विभागाला एकूण ४,५०७ हेक्टरचे उद्दिष्ट देण्यात आले तर पंचायत समित्यांना ४,३८१ हेक्टर इतके उद्दिष्ट देण्यात आले होते.  फळबाग लागवडीचा आढावा नुकताच जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला. आत्तापर्यंत ५,७१९ हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड झाली आहे. कृषी विभागाकडून अधिक लागवडीची अपेक्षा असतानाच जिल्हा परिषदेच्या नऊही पंचायत समित्यांनी जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले काम केले आहे. जिल्हा कृषी विभागाने  २,३५३ हेक्टर क्षेत्रावर लागवड केली आहे तर नऊ पंचायत समित्यांकडून ३,०६६ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. यात रत्नागिरी, संगमेश्वर आणि खेड या तीन पंचायत समित्या अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकावर आहेत. तर दापोली, चिपळूण आणि लांजा कृषी विभाग हे अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकावर आहेत.

राज्यात जिल्हा परिषदेकडून एवढ्या मोठ्या प्रमाणावर लागवड करणारा रत्नागिरी जिल्हा एकमेव आहे. या लागवडीसाठी पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी तसेच ग्रामसेवक यांनी विशेष प्रयत्न केल्याने यावर्षी रत्नागिरी जिल्हा परिषद राज्यात अव्वल ठरली आहे.

 

यावर्षी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवक यांनी मेहनत घेतल्याने महाराष्ट्रात सर्वाधिक फळबाग लागवड करणारी रत्नागिरी जिल्हा परिषद ही पहिली जिल्हा परिषद ठरली आहे.

- डॉ. जयकृष्ण फड, प्रभारी उपजिल्हाधिकारी, रोजगार हमी योजना विभाग, रत्नागिरी.

टॅग्स :zpजिल्हा परिषदRatnagiriरत्नागिरी