शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

राज्यभरात रत्नागिरीचा ठसा : नऊ पंचायत समित्यांकडून ३ हजार ६६ हेक्टरवर लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 12:50 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात यंदा रोजगार हमी योजनेंतर्गत झालेल्या फळबाग लागवडीत रत्नागिरी जिल्हा परिषदेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. एकूण ५,७१९ ...

ठळक मुद्देफळबाग लागवडीत रत्नागिरी जिल्हा परिषद अव्वल

रत्नागिरी : जिल्ह्यात यंदा रोजगार हमी योजनेंतर्गत झालेल्या फळबाग लागवडीत रत्नागिरीजिल्हा परिषदेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. एकूण ५,७१९ हेक्टर क्षेत्रावर झालेल्या फळबाग लागवडीपैकी जिल्हा परिषदेने ३,०६६ हेक्टर क्षेत्रावर लागवड केली असून, उर्वरित क्षेत्रावर कृषी विभागातर्फे लागवड करण्यात आली आहे. एवढ्या क्षेत्रावर लागवड करणारी रत्नागिरी जिल्हा परिषद राज्यात अव्वल ठरली आहे.

रोजगार हमी योजनेंतर्गत दहा हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यानुसार प्रशासकीय मान्यताही मिळाली होती. मात्र, ऐनवेळी रोपे कमी पडल्याने केवळ पाच हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती. यावर्षी गतवर्षीचे उरलेले ४,७८८ हजार आणि यावर्षी नव्याने ७,७१०  मिळून एकूण १२,४९५ हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून खासगी रोपवाटिकांतून १६ लाख आणि शासकीय रोपवाटिकांतून व कृषी विद्यापीठातून ८ लाख अशा  २४ लाख रोपांची उपलब्धताही करण्यात आली.

जिल्ह्यात कृषी विभागाला एकूण ४,५०७ हेक्टरचे उद्दिष्ट देण्यात आले तर पंचायत समित्यांना ४,३८१ हेक्टर इतके उद्दिष्ट देण्यात आले होते.  फळबाग लागवडीचा आढावा नुकताच जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला. आत्तापर्यंत ५,७१९ हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड झाली आहे. कृषी विभागाकडून अधिक लागवडीची अपेक्षा असतानाच जिल्हा परिषदेच्या नऊही पंचायत समित्यांनी जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले काम केले आहे. जिल्हा कृषी विभागाने  २,३५३ हेक्टर क्षेत्रावर लागवड केली आहे तर नऊ पंचायत समित्यांकडून ३,०६६ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. यात रत्नागिरी, संगमेश्वर आणि खेड या तीन पंचायत समित्या अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकावर आहेत. तर दापोली, चिपळूण आणि लांजा कृषी विभाग हे अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकावर आहेत.

राज्यात जिल्हा परिषदेकडून एवढ्या मोठ्या प्रमाणावर लागवड करणारा रत्नागिरी जिल्हा एकमेव आहे. या लागवडीसाठी पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी तसेच ग्रामसेवक यांनी विशेष प्रयत्न केल्याने यावर्षी रत्नागिरी जिल्हा परिषद राज्यात अव्वल ठरली आहे.

 

यावर्षी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवक यांनी मेहनत घेतल्याने महाराष्ट्रात सर्वाधिक फळबाग लागवड करणारी रत्नागिरी जिल्हा परिषद ही पहिली जिल्हा परिषद ठरली आहे.

- डॉ. जयकृष्ण फड, प्रभारी उपजिल्हाधिकारी, रोजगार हमी योजना विभाग, रत्नागिरी.

टॅग्स :zpजिल्हा परिषदRatnagiriरत्नागिरी