शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
2
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
3
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
4
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
5
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
6
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?
7
"4 दिवसांचं युद्ध..."; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही PM शहबाज शरीफ यांच्या मोठ-मोठ्या बढाया, भारताविरोधात काय काय बोलले?
8
Janmashtami 2025: ढाक्कु माकुम ढाक्कु माकुम; 'या' राशींना फळणार गोपाळकाला, काय होणार लाभ?
9
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
10
शाहरुख खानचा 'किंग' पुढे ढकलला, काय आहे कारण? लेकीचा वडिलांसोबत पहिलाच सिनेमा
11
बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस
12
Sawaliya Foods Products shares: लिस्ट होताच IPO नं दिला १००% चा रिटर्न; पहिल्याच दिवशी दुप्पट झाले गुंतवणुकदारांचे पैसे
13
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
14
अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?
15
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
16
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
17
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
18
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
19
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
20
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!

राज्यभरात रत्नागिरीचा ठसा : नऊ पंचायत समित्यांकडून ३ हजार ६६ हेक्टरवर लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 12:50 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात यंदा रोजगार हमी योजनेंतर्गत झालेल्या फळबाग लागवडीत रत्नागिरी जिल्हा परिषदेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. एकूण ५,७१९ ...

ठळक मुद्देफळबाग लागवडीत रत्नागिरी जिल्हा परिषद अव्वल

रत्नागिरी : जिल्ह्यात यंदा रोजगार हमी योजनेंतर्गत झालेल्या फळबाग लागवडीत रत्नागिरीजिल्हा परिषदेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. एकूण ५,७१९ हेक्टर क्षेत्रावर झालेल्या फळबाग लागवडीपैकी जिल्हा परिषदेने ३,०६६ हेक्टर क्षेत्रावर लागवड केली असून, उर्वरित क्षेत्रावर कृषी विभागातर्फे लागवड करण्यात आली आहे. एवढ्या क्षेत्रावर लागवड करणारी रत्नागिरी जिल्हा परिषद राज्यात अव्वल ठरली आहे.

रोजगार हमी योजनेंतर्गत दहा हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यानुसार प्रशासकीय मान्यताही मिळाली होती. मात्र, ऐनवेळी रोपे कमी पडल्याने केवळ पाच हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती. यावर्षी गतवर्षीचे उरलेले ४,७८८ हजार आणि यावर्षी नव्याने ७,७१०  मिळून एकूण १२,४९५ हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून खासगी रोपवाटिकांतून १६ लाख आणि शासकीय रोपवाटिकांतून व कृषी विद्यापीठातून ८ लाख अशा  २४ लाख रोपांची उपलब्धताही करण्यात आली.

जिल्ह्यात कृषी विभागाला एकूण ४,५०७ हेक्टरचे उद्दिष्ट देण्यात आले तर पंचायत समित्यांना ४,३८१ हेक्टर इतके उद्दिष्ट देण्यात आले होते.  फळबाग लागवडीचा आढावा नुकताच जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला. आत्तापर्यंत ५,७१९ हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड झाली आहे. कृषी विभागाकडून अधिक लागवडीची अपेक्षा असतानाच जिल्हा परिषदेच्या नऊही पंचायत समित्यांनी जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले काम केले आहे. जिल्हा कृषी विभागाने  २,३५३ हेक्टर क्षेत्रावर लागवड केली आहे तर नऊ पंचायत समित्यांकडून ३,०६६ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. यात रत्नागिरी, संगमेश्वर आणि खेड या तीन पंचायत समित्या अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकावर आहेत. तर दापोली, चिपळूण आणि लांजा कृषी विभाग हे अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकावर आहेत.

राज्यात जिल्हा परिषदेकडून एवढ्या मोठ्या प्रमाणावर लागवड करणारा रत्नागिरी जिल्हा एकमेव आहे. या लागवडीसाठी पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी तसेच ग्रामसेवक यांनी विशेष प्रयत्न केल्याने यावर्षी रत्नागिरी जिल्हा परिषद राज्यात अव्वल ठरली आहे.

 

यावर्षी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवक यांनी मेहनत घेतल्याने महाराष्ट्रात सर्वाधिक फळबाग लागवड करणारी रत्नागिरी जिल्हा परिषद ही पहिली जिल्हा परिषद ठरली आहे.

- डॉ. जयकृष्ण फड, प्रभारी उपजिल्हाधिकारी, रोजगार हमी योजना विभाग, रत्नागिरी.

टॅग्स :zpजिल्हा परिषदRatnagiriरत्नागिरी