शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
3
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
4
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
5
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
8
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
9
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
10
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
11
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
12
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
13
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
14
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
15
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
16
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
17
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
18
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
19
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
20
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय

रत्नागिरी : जलयुक्त शिवारच्या अडचणींकडे दुर्लक्षच; योजनेला निकषांचा बांध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 14:50 IST

जलयुक्त शिवार योजनेच्या तिसरा टप्प्यासाठी अंतिम आराखडा मंजूर करण्यात आला असला तरी बंधारे बांधकामासाठीचे निकष कोकणासाठी अयोग्य असल्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील बंधाऱ्यांच्या कामाला ब्रेक मिळाला आहे. त्याबाबत ओरड होऊनही अजून त्याबाबत कोणताही बदल झालेला नाही.

ठळक मुद्दे तिसऱ्या टप्प्यासाठी जिल्ह्यातील ४० गावांची निवड जिल्ह्यासाठी १ हजार ६४७ कामांचे उद्दिष्ट ६ कोटी ८१ लाख ७२ हजारांचा निधी मंजूर.

रत्नागिरी : जलयुक्त शिवार योजनेच्या तिसरा टप्प्यासाठी अंतिम आराखडा मंजूर करण्यात आला असला तरी बंधारे बांधकामासाठीचे निकष कोकणासाठी अयोग्य असल्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील बंधाऱ्यांच्या कामाला ब्रेक मिळाला आहे. त्याबाबत ओरड होऊनही अजून त्याबाबत कोणताही बदल झालेला नाही.जलयुक्त शिवार योजनेतील पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील कामे पूर्णत्वाच्या मार्गावर असताना तिसऱ्या टप्प्यासाठी जिल्ह्यातील ४० गावांची निवड करण्यात आली. जिल्ह्यासाठी १ हजार ६४७ कामांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यासाठी १० कोटी ४६ लाख ४२ हजार रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.

या योजनेंतर्गत विकास माथा ते पायथा या तत्त्वावर गावांची निवड करून वरच्या भागात ७० टक्के क्षेत्र व खालच्या भागात ३० टक्के विकासकामांचे नियोजन करण्यात आले. जलयुक्त शिवार अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या एका बंधाऱ्यात एक दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होत असेल तर त्यासाठी ८० हजार रूपये खर्च करण्याचा निकष लावण्यात आला आहे.साधारणत: सिमेंट नालाबांध बांधण्यासाठी जर १० ते १५ लाख रूपये खर्च करण्यात आले तर त्यामध्ये दहा दक्षलक्ष घनमीटर पाणीसाठा अपेक्षित आहे. बंधारे वगळता बंधारे दुरूस्ती, फळबाग लागवड, व शेततळ्यांची कामे मात्र सुरू झाली आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण २२५ कामे पूर्ण झाली असून, ३० लाख ६४ हजार रूपये खर्च झाला आहे.

कृषी विभागाकडे१ हजार ५०४ कामांचे उद्दिष्ट असून, त्याकरिता ६ कोटी ८१ लाख ७२ हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे ४२ कामांचे उद्दिष्ट असून, ३ कोटी २६ लाख ५५ हजार रूपयांचा निधी त्यासाठी मंजूर करण्यात आला आहे.सामाजिक वनीकरण विभागाकडे अवघे एक काम सुपूर्द करण्यात आले असून, त्यासाठी ८ लाख १५ हजारांचा निधी मंजूर केला आहे. जिल्हा परिषद कृषी विभागाकडे १०० कामांचे उद्दिष्ट असून, त्यासाठी ३० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रत्नागिरी तालुक्यासाठी १३२ कामांचे उद्दिष्ट असून, त्यासाठी ४८ लाख ६९ हजार रूपये मंजूर आहेत. लांजा तालुक्याकरिता ७६ कामांचे उद्दिष्ट असून, त्यासाठी ७२ लाख ४० हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

राजापूर तालुक्यातील ३७ कामांसाठी १४ लाख ३५ हजारांचा निधी मंजूर केला आहे. मात्र, तीनही तालुक्यांतून कोणत्याही कामांना प्रारंभ झालेला नाही. चिपळूण तालुक्याला २८८ कामांचे उद्दिष्ट असून, त्यासाठी १ कोटी ६१ लाख १७ हजारांचा निधी मंजूर झाला आहे. या तालुक्यातून २६ कामे पूर्ण झाली असून, त्यासाठी १३ लाख ३५ हजार रूपये खर्च झाले आहेत.गुहागर तालुक्यामध्ये एकूण ८५ कामे करण्यात येणार असून, त्यासाठी ७० लाख ११ हजार रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. तालुक्यातील ८० कामे पूर्ण झाली असून, त्यासाठी १३ लाख ३५ हजार रूपये खर्च झाले आहेत. संगमेश्वर तालुक्यासाठी २९२ कामांचे उद्दिष्ट असून, ९७ लाख ८७ हजार रूपयांची निधी मंजूर झाला आहे. अद्याप ३० कामांची पूर्तता झाली असून, त्याकरिता २ लाख ६४ हजार रूपये खर्च झाले आहेत.दापोली तालुक्याला एकूण १४३ कामांचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी ४७ लाख २३ हजार रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, सध्या अवघे एक काम पूर्ण झाले असून, त्यासाठी २० हजार रूपये खर्च झाले आहेत. खेड तालुक्याकरिता एकूण ३६५ कामांचे उद्दिष्ट असून, १ कोटी ३० लाख ७४ हजारांचा निधी त्यासाठी मंजूर केला आहे.

तालुक्यातून ७८ कामे पूर्ण झाली असून, १० लाख ४० हजार रूपये खर्च झाले आहेत. मंडणगड तालुक्याकरिता ८६ कामांसाठी ३९ लाख १६ हजार रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. तालुक्यातून २२५ कामे पूर्ण झाली असून, त्यासाठी ३० लाख ६४ हजार रूपये खर्च झाले आहेत.केवळ २२५ कामे पूर्णकृषी विभाग वगळता सामाजिक वनीकरण, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद कृषी विभागाकडून अद्याप कोणतेही काम पूर्ण झालेले नाही. जिल्ह्यासाठी उद्दिष्ट असलेल्या १६४७ कामांपैकी आतापर्यंत २२५ कामे पूर्ण झाली असून, एक काम सुरू आहे. त्यासाठी ३० लाख ६४ हजार रूपयांचा खर्च झाला आहे. ही सर्व कामे कृषी विभागाने केली आहेत. 

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारRatnagiriरत्नागिरी