शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : जलयुक्त शिवारच्या अडचणींकडे दुर्लक्षच; योजनेला निकषांचा बांध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 14:50 IST

जलयुक्त शिवार योजनेच्या तिसरा टप्प्यासाठी अंतिम आराखडा मंजूर करण्यात आला असला तरी बंधारे बांधकामासाठीचे निकष कोकणासाठी अयोग्य असल्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील बंधाऱ्यांच्या कामाला ब्रेक मिळाला आहे. त्याबाबत ओरड होऊनही अजून त्याबाबत कोणताही बदल झालेला नाही.

ठळक मुद्दे तिसऱ्या टप्प्यासाठी जिल्ह्यातील ४० गावांची निवड जिल्ह्यासाठी १ हजार ६४७ कामांचे उद्दिष्ट ६ कोटी ८१ लाख ७२ हजारांचा निधी मंजूर.

रत्नागिरी : जलयुक्त शिवार योजनेच्या तिसरा टप्प्यासाठी अंतिम आराखडा मंजूर करण्यात आला असला तरी बंधारे बांधकामासाठीचे निकष कोकणासाठी अयोग्य असल्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील बंधाऱ्यांच्या कामाला ब्रेक मिळाला आहे. त्याबाबत ओरड होऊनही अजून त्याबाबत कोणताही बदल झालेला नाही.जलयुक्त शिवार योजनेतील पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील कामे पूर्णत्वाच्या मार्गावर असताना तिसऱ्या टप्प्यासाठी जिल्ह्यातील ४० गावांची निवड करण्यात आली. जिल्ह्यासाठी १ हजार ६४७ कामांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यासाठी १० कोटी ४६ लाख ४२ हजार रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.

या योजनेंतर्गत विकास माथा ते पायथा या तत्त्वावर गावांची निवड करून वरच्या भागात ७० टक्के क्षेत्र व खालच्या भागात ३० टक्के विकासकामांचे नियोजन करण्यात आले. जलयुक्त शिवार अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या एका बंधाऱ्यात एक दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होत असेल तर त्यासाठी ८० हजार रूपये खर्च करण्याचा निकष लावण्यात आला आहे.साधारणत: सिमेंट नालाबांध बांधण्यासाठी जर १० ते १५ लाख रूपये खर्च करण्यात आले तर त्यामध्ये दहा दक्षलक्ष घनमीटर पाणीसाठा अपेक्षित आहे. बंधारे वगळता बंधारे दुरूस्ती, फळबाग लागवड, व शेततळ्यांची कामे मात्र सुरू झाली आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण २२५ कामे पूर्ण झाली असून, ३० लाख ६४ हजार रूपये खर्च झाला आहे.

कृषी विभागाकडे१ हजार ५०४ कामांचे उद्दिष्ट असून, त्याकरिता ६ कोटी ८१ लाख ७२ हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे ४२ कामांचे उद्दिष्ट असून, ३ कोटी २६ लाख ५५ हजार रूपयांचा निधी त्यासाठी मंजूर करण्यात आला आहे.सामाजिक वनीकरण विभागाकडे अवघे एक काम सुपूर्द करण्यात आले असून, त्यासाठी ८ लाख १५ हजारांचा निधी मंजूर केला आहे. जिल्हा परिषद कृषी विभागाकडे १०० कामांचे उद्दिष्ट असून, त्यासाठी ३० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रत्नागिरी तालुक्यासाठी १३२ कामांचे उद्दिष्ट असून, त्यासाठी ४८ लाख ६९ हजार रूपये मंजूर आहेत. लांजा तालुक्याकरिता ७६ कामांचे उद्दिष्ट असून, त्यासाठी ७२ लाख ४० हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

राजापूर तालुक्यातील ३७ कामांसाठी १४ लाख ३५ हजारांचा निधी मंजूर केला आहे. मात्र, तीनही तालुक्यांतून कोणत्याही कामांना प्रारंभ झालेला नाही. चिपळूण तालुक्याला २८८ कामांचे उद्दिष्ट असून, त्यासाठी १ कोटी ६१ लाख १७ हजारांचा निधी मंजूर झाला आहे. या तालुक्यातून २६ कामे पूर्ण झाली असून, त्यासाठी १३ लाख ३५ हजार रूपये खर्च झाले आहेत.गुहागर तालुक्यामध्ये एकूण ८५ कामे करण्यात येणार असून, त्यासाठी ७० लाख ११ हजार रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. तालुक्यातील ८० कामे पूर्ण झाली असून, त्यासाठी १३ लाख ३५ हजार रूपये खर्च झाले आहेत. संगमेश्वर तालुक्यासाठी २९२ कामांचे उद्दिष्ट असून, ९७ लाख ८७ हजार रूपयांची निधी मंजूर झाला आहे. अद्याप ३० कामांची पूर्तता झाली असून, त्याकरिता २ लाख ६४ हजार रूपये खर्च झाले आहेत.दापोली तालुक्याला एकूण १४३ कामांचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी ४७ लाख २३ हजार रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, सध्या अवघे एक काम पूर्ण झाले असून, त्यासाठी २० हजार रूपये खर्च झाले आहेत. खेड तालुक्याकरिता एकूण ३६५ कामांचे उद्दिष्ट असून, १ कोटी ३० लाख ७४ हजारांचा निधी त्यासाठी मंजूर केला आहे.

तालुक्यातून ७८ कामे पूर्ण झाली असून, १० लाख ४० हजार रूपये खर्च झाले आहेत. मंडणगड तालुक्याकरिता ८६ कामांसाठी ३९ लाख १६ हजार रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. तालुक्यातून २२५ कामे पूर्ण झाली असून, त्यासाठी ३० लाख ६४ हजार रूपये खर्च झाले आहेत.केवळ २२५ कामे पूर्णकृषी विभाग वगळता सामाजिक वनीकरण, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद कृषी विभागाकडून अद्याप कोणतेही काम पूर्ण झालेले नाही. जिल्ह्यासाठी उद्दिष्ट असलेल्या १६४७ कामांपैकी आतापर्यंत २२५ कामे पूर्ण झाली असून, एक काम सुरू आहे. त्यासाठी ३० लाख ६४ हजार रूपयांचा खर्च झाला आहे. ही सर्व कामे कृषी विभागाने केली आहेत. 

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारRatnagiriरत्नागिरी