शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

रत्नागिरी : सेना सत्तेत असताना सरकार प्रकल्प कसा रेटू शकते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 17:34 IST

रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही, नाणारचा विषय आता संपलाय हवा अशी भूमिका मांडणारी शिवसेना आजही सत्तेत असताना शासन हा प्रकल्प कसा काय रेटवण्याचा प्रयत्न करीत आहे. याबाबतचे प्रश्न शिवसेनेचे पक्षप्रमुखांसह त्यांच्या लोकप्रतिनिधीनांच विचारा, अशी रोखठोक भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राजापूर येथे पत्रकारांशी बोलताना मांडली.

ठळक मुद्दे सेना सत्तेत असताना सरकार प्रकल्प कसा रेटू शकते?राज ठाकरे यांचा राजापुरात सेनेवर निशाणा

राजापूर : रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही, नाणारचा विषय आता संपलाय हवा अशी भूमिका मांडणारी शिवसेना आजही सत्तेत असताना शासन हा प्रकल्प कसा काय रेटवण्याचा प्रयत्न करीत आहे. याबाबतचे प्रश्न शिवसेनेचे पक्षप्रमुखांसह त्यांच्या लोकप्रतिनिधीनांच विचारा, अशी रोखठोक भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राजापूर येथे पत्रकारांशी बोलताना मांडली.

आपण नाणारवासीयांच्या सोबत राहू व या प्रकल्पाबाबत पुढे काय करायचे त्याचा निर्णय आमच्या पक्षाचे पदाधिकारी यांच्याशी चर्चा करुन ठरवू, असेही त्यांनी सांगितले.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा संघटनात्मक पातळीवरील राज्यव्यापी दौरा सुरु झाला आहे. गुरुवारी ते राजापुरात आले होते. महामार्गावरील गुरुमाऊली येथील हॉटेलवर त्यांनी नाणार प्रकल्पग्रस्तांची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी प्रकल्पग्रस्तांशी चर्चा केली. त्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या भूमिकेवरच सवाल उपस्थित केले.सेनेच्या दुटप्पी भूमिकेवर त्यांनी बोट ठेवले. नाणारवासियांच्या शिवसेनेकडून अपेक्षा होत्या. पण त्या पूर्ण न झाल्याने मनसे त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणार का, असे विचारले असता आम्ही नाणारवासीयांच्या समवेत आहोत व आता पुढे कसे करायचे ते लवकरच ठरवू, असे सांगितले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेRatnagiriरत्नागिरी