शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
3
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
4
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
9
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
10
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
11
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
12
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
13
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
14
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
15
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
16
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
17
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
18
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

रत्नागिरीत मध्यरात्री आगीत घर जळून १३ लाखाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 13:07 IST

Fire Ratnagiri- रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे येथील बोरसई मोहल्ला येथील घराला शनिवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत संपूर्ण घर खाक झाले. या आगीत तीन कुटुंबांचे सुमारे १३ लाख ७० हजारांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीत मध्यरात्री आगीत घर खाक सैतवडे येथील दुर्घटना, सुमारे १३ लाखाचे नुकसान

रत्नागिरी : तालुक्यातील सैतवडे येथील बोरसई मोहल्ला येथील घराला शनिवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत संपूर्ण घर खाक झाले. या आगीत तीन कुटुंबांचे सुमारे १३ लाख ७० हजारांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.सैतवडे बोरसई मोहल्ला येथील घराला शनिवारी मध्यरात्री अचानक आग लागली. आग लागल्याचे आजूबाजूच्या लोकांना कळताच त्यांनी घराकडे धाव घेतली. हे घर सामायिक असून, आगीतील सर्व सामान खाक झाले. मन्सूर हुसेन महंमदअली खलपे यांच्या घरात त्यांची बहीण मैमुना या राहतात. आग लागल्याचे कळताच त्या घरातून बाहेर पडल्याने वाचल्या.

या आगीत त्यांचे ४,५०,००० रुपयांचे नुकसान झाले आहे. अमिना महामूद खलपे या मुंबईला राहत असल्याने त्यांचे घर बंद होते. मात्र, आगीत त्यांचे ४,७०,००० रूपयांचे नुकसान झाले आहे. तर अब्दुल अजीज इसाक खलपे हे रत्नागिरीत राहत असल्याने त्यांचे घरही बंद होते. आगीमुळे त्यांचे ४,५०,००० रुपयांचे नुकसान झाले.घराला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी जयगड येथील पोर्ट, एनर्जी, चौघुले कंपनी येथील अग्निशमन दल, जयगड खंडाळा पोलीस, सैतवडे सरपंच सागर कदम, गुंबद सरपंच उषा सावंत, मुनाफ वागळे, अजिम चिकटे, साजिद शेकासन, अनिकेत सुर्वे, बानू खलपे, राजेश पालशेतकर, बोरसई ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी प्रयत्न केले. रात्री उशिराने ही आग आटोक्यात आणण्यात यश आले.या आगीबाबत जिल्हा परिषद सदस्या ऋतुजा जाधव यांनी रत्नागिरीचे तहसीलदार शशिकांत जाधव यांना रात्रीच फोनवर माहिती दिली. त्यानंतर रविवार सकाळी आगीचा पंचानामा करण्यात आला.

टॅग्स :fireआगRatnagiriरत्नागिरी