शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

रत्नागिरी नगराध्यक्षपदासाठी एकूण ५ उमेदवारी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 18:43 IST

शिवसेनेचे उपनेते आमदार उदय सामंत यांच्याकडून राज्याच्या सत्तेतील महाविकास आघाडीचे सत्ता समीकरण रत्नागिरीत राबविण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. तसे झाल्यास राष्ट्रवादी कॉँग्रेस आपला उमेदवार रिंगणातून माघारी बोलविणार का, याचीही चर्चा आहे.

रत्नागिरी : रत्नागिरीच्या थेट नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत गुरुवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपचे अ‍ॅड. दीपक पटवर्धन, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे मिलिंद कीर व मनसेचे रुपेश सावंत यांनी शक्तिप्रदर्शन करीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्याचवेळी भाजपचे कार्यकर्ते मुकुंद जोशी यांनीही आपला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ५ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, नगराध्यक्षपदाची पोटनिवडणूक तीन मुख्य स्पर्धकांमुळे तिरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.रत्नागिरीच्या थेट नगराध्यक्षपदासाठी प्रभारी नगराध्यक्ष प्रदीप तथा बंड्या साळवी यांनी बुधवारी त्यांचा उमेदवारी अर्ज शक्तिप्रदर्शन करीत दाखल केला होता. ४ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सुरू होऊनही प्रत्यक्षात ११ व १२ डिसेंबर या दोन दिवशीच ५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. येत्या १८ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यामुळे या कालावधीत यातील कोण उमेदवारी माघार घेणार, याची सर्वांना उत्कंठा आहे. २९ डिसेंबर २०१९ रोजी मतदान होणार असून, ३० डिसेंबरला मतमोजणी व निकाल घोषित होणार आहेत.शिवसेनेचे उपनेते आमदार उदय सामंत यांच्याकडून राज्याच्या सत्तेतील महाविकास आघाडीचे सत्ता समीकरण रत्नागिरीत राबविण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. तसे झाल्यास राष्ट्रवादी कॉँग्रेस आपला उमेदवार रिंगणातून माघारी बोलविणार का, याचीही चर्चा आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीElectionनिवडणूक