शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रत्नागिरी नगराध्यक्षपदासाठी एकूण ५ उमेदवारी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 18:43 IST

शिवसेनेचे उपनेते आमदार उदय सामंत यांच्याकडून राज्याच्या सत्तेतील महाविकास आघाडीचे सत्ता समीकरण रत्नागिरीत राबविण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. तसे झाल्यास राष्ट्रवादी कॉँग्रेस आपला उमेदवार रिंगणातून माघारी बोलविणार का, याचीही चर्चा आहे.

रत्नागिरी : रत्नागिरीच्या थेट नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत गुरुवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपचे अ‍ॅड. दीपक पटवर्धन, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे मिलिंद कीर व मनसेचे रुपेश सावंत यांनी शक्तिप्रदर्शन करीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्याचवेळी भाजपचे कार्यकर्ते मुकुंद जोशी यांनीही आपला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ५ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, नगराध्यक्षपदाची पोटनिवडणूक तीन मुख्य स्पर्धकांमुळे तिरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.रत्नागिरीच्या थेट नगराध्यक्षपदासाठी प्रभारी नगराध्यक्ष प्रदीप तथा बंड्या साळवी यांनी बुधवारी त्यांचा उमेदवारी अर्ज शक्तिप्रदर्शन करीत दाखल केला होता. ४ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सुरू होऊनही प्रत्यक्षात ११ व १२ डिसेंबर या दोन दिवशीच ५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. येत्या १८ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यामुळे या कालावधीत यातील कोण उमेदवारी माघार घेणार, याची सर्वांना उत्कंठा आहे. २९ डिसेंबर २०१९ रोजी मतदान होणार असून, ३० डिसेंबरला मतमोजणी व निकाल घोषित होणार आहेत.शिवसेनेचे उपनेते आमदार उदय सामंत यांच्याकडून राज्याच्या सत्तेतील महाविकास आघाडीचे सत्ता समीकरण रत्नागिरीत राबविण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. तसे झाल्यास राष्ट्रवादी कॉँग्रेस आपला उमेदवार रिंगणातून माघारी बोलविणार का, याचीही चर्चा आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीElectionनिवडणूक