शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

रत्नागिरी : ग्रामसेवक, गटविकास अधिकारी भ्रष्टाचार करतील, शिक्षक नाही : गुलाबराव पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 15:14 IST

सर्वात नॉन करप्ट कोणी असेल तर तो शिक्षक आहे. कारण त्याच्याकडून भ्रष्टाचार होत नाही. ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, डीडीआर यांच्याकडून भ्रष्टाचार होईल, पण शिक्षकाकडून होणार नाही, असा विश्वास महाराष्ट्राचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देग्रामसेवक, गटविकास अधिकारी भ्रष्टाचार करतील, शिक्षक नाही सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे रत्नागिरीत वक्तव्य

रत्नागिरी : सर्वात नॉन करप्ट कोणी असेल तर तो शिक्षक आहे. कारण त्याच्याकडून भ्रष्टाचार होत नाही. ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, डीडीआर यांच्याकडून भ्रष्टाचार होईल, पण शिक्षकाकडून होणार नाही, असा विश्वास महाराष्ट्राचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.सहकार राज्यमंत्री पाटील हे रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या आरोग्य मंदिर येथे उभारण्यात आलेल्या नूतन वास्तूचे उद्घाटन सोहळ्यात बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले की, शिक्षक हा देवता आहे.निवडणुकीत पोस्टलमध्ये मला सर्वात जास्त मते शिक्षकांची मिळतात, याचे कारण शिक्षक हा देवता आहे. पूर्वीच्या काळी मुलाने सांगितले शिक्षकाने मारले तर बाप काठी घेऊन जायचा आणि शिक्षकांना सांगायचा अजून मारा. आज तो शिक्षक आहे की नाही, हे मला माहीत नाही.ते पुढे म्हणाले की, येथे १०० टक्के गॅरंटी आहे की पगारामध्येच कटींग आहे. त्यामुळे शून्य टक्के थकबाकी आहे. बेटी बचाओ, बेटी पढाओ म्हणण्यापेक्षा तिच्या लग्नाला ५००० रुपये मदत केली तर हा सभासद तुमचा ऋणी राहील. त्याला वाटेल की ही संस्था माझ्या मागे उभी आहे. तुमच्या संस्थेकडून एखादा दवाखाना येथे उभा करावा. साडेतीन तासात कोल्हापूरला जाणाऱ्या रुग्णाचा जीव येथेच वाचला तर ती पुण्याई तुम्हाला मिळणार आहे.

६० कोटींमध्ये हा दवाखाना उभा राहिला तर तेथे शिक्षकांचीच मुले डॉक्टर म्हणून ठेवा. महामार्गावर कितीतरी लोक अपघातात जीव गमावतात. त्यामुळे तुम्ही दवाखाना उभारलात तर मला वाटेल की, मी या कार्यक्रमाला आल्याचे सार्थक झाले. यासाठी मी तुमच्या पाठीशी उभा आहे, असा दिलासा पाटील यांनी दिला.कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप महाडिक होते. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत, जिल्हा उपनिबंधक बकुळा माळी, उपाध्यक्ष अनंत कदम, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, तालुकाध्यक्ष बंड्या साळवी, संचालक दिलीप देवळेकर उपस्थित होते.आमदार, खासदारांवर स्तुतीसुमनेसर्वात जास्त योजना आणणारे कोणी आमदार असेतील तर ते उदय सामंत आहेत. तर सर्वात गोड बोलणारे आणि सर्वात जास्त संपर्क ठेवणारे या देशातले खासदार असतील तर ते विनायक राऊत आहेत.बरेचवेळा खासदार सापडत नाहीत. दिल्ली टू गल्ली हा विषय संपतो. पण आमचे राऊत बघा गोड बोलणार, चांगलं बोलणार, अधिकाऱ्यांचा सन्मान करणार. पण आज आपण भलत्याच लोकांसमोर आलोय. हे लोक आपल्याला निवडून आणण्याची ताकद ठेवतात व पाडण्याचीही. ते जे ठरवतात, तो कार्यक्रम क्लियर असतो.शेतकऱ्याचा मुलगा-मुलगी कलेक्टर होणे कौतुकास्पदजेथे पैसे देण्याची दानत आहे तेथे नोटा घेऊन लोकं उभी आहेत. साईबाबांच्या मंदिरात लोक नोटा का टाकतात. तेथे देवच सुंदर आहे. देव लक्ष ठेवतो सर्वांवर. गुलाबरावांचा, राऊत साहेबांचा, सामंत साहेबांची मुलं एमपीएसस्सी, युपीएसस्सी झाली मोठे कौतुक नाही. मुलांना घडवणाऱ्या शिक्षकाचा, शेतकऱ्याचा मुलगा-मुलगी कलेक्टर होणे कौतुकास्पद असल्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

टॅग्स :ministerमंत्रीRatnagiriरत्नागिरी