शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

रत्नागिरी :  पाणी पिऊन निघालेली मादी बिबट्या अडकली फासकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 16:26 IST

रणरणते ऊन, भयंकर उकाड्याने अंगाची लाहीलाही होत आहे. त्यामुळे माणसाप्रमाणे जनावरेदेखील पाण्याच्या शोधात फिरत आहेत. अशीच तहानलेली दोन वर्षांची मादी बिबट्या पाणी पिऊन परतत असताना रानटी जनावरांच्या शिकारीसाठी लावण्यात आलेल्या फासकीत अडकली. या बिबट्या मादीला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रमानंतर पिंजऱ्यात सुरक्षित जेरबंद केले.

ठळक मुद्देलांजा तालुक्यातील वाघ्रट येथील घटनाअथक परिश्रमानंतर पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश

लांजा : रणरणते ऊन, भयंकर उकाड्याने अंगाची लाहीलाही होत आहे. त्यामुळे माणसाप्रमाणे जनावरेदेखील पाण्याच्या शोधात फिरत आहेत. अशीच तहानलेली दोन वर्षांची मादी बिबट्या पाणी पिऊन परतत असताना रानटी जनावरांच्या शिकारीसाठी लावण्यात आलेल्या फासकीत अडकली. या बिबट्या मादीला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रमानंतर पिंजऱ्यात सुरक्षित जेरबंद केले.वाघ्रट - रांबाडेवाडी येथील काजऱ्याचे पाणी येथील पऱ्याच्या बाजूला डोंगर भागात सुरेश बाळू रांबाडे यांची आंबा, काजूची बाग आहे. याठिकाणी रांबाडेवाडी येथील ग्रामस्थ पिण्याचे पाणी भरण्यासाठी तसेच आपल्या जनावरांना पाणी पिण्यासाठी घेऊन येतात.

शनिवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या दरम्यान चंद्र्कांत पन्हळेकर व संतोष भुवड हे काजू काढण्यासाठी येथील पायवाटेने आपल्या बागेत चालले होते. ते सुरेश रांबाडे यांच्या बागेजवळ आले असता, बिबट्याने या दोघांना पाहून जोरदार डरकाळी फोडल्याने पन्हळेकर व भुवड यांची पाचावर धारण बसली.यावेळी त्यांनी आपल्या बागेकडे न जाता, आपापल्या घरी धूम ठोकली. त्यानंतर हा..... हा...... म्हणता बिबट्याची माहिती गावात पसरली. वाघ्रट येथील उद्योगपती सुदाम कामत यांना बिबट्याची माहिती मिळताच, त्यांनी लांजा वन विभागातील कर्मचाऱ्यांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर लांजा वन विभागाचे परिमंडल वन अधिकारी व्ही. वाय. गुरवळ, वनरक्षक विक्रांत कुंभार, राहुल गुंठे यांनी घटनास्थळी जात पाहणी केली.

सुरेश रांबाडे यांच्या बागेतील येण्या- जाण्याच्या वाटेवर तोडण्यात आलेल्या एका झाडाच्या खुटाला गाड्यांच्या केबलच्या सहाय्याने रानटी जनावराची शिकार करण्याच्या उद्देशाने अज्ञाताने फासकी लावली होती. बिबट्या मादी येथील पऱ्याचे पाणी पिऊन परतत असताना तिच्या छातीच्या भागाला फासकी आवळली गेल्याने ती अडकली. अथक परिश्रमानंतर बिबट्याला जेरबंद केल्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.पिंजऱ्यात जेरबंदपरिक्षेत्र वन अधिकारी बा. रा. पाटील, राजापूरच्या वनपाल राजश्री कीर, वनरक्षक गावडे हे वाघ्रट येथे दाखल झाल्यानंतर त्यांनी बागेला असलेली निवडुंगांची झाडे तोडून साधारण पिंजरा कसा लावता येईल, असा प्रयत्न करताना रस्सीचा फास तयार करून बिबट्याच्या पोटाभोवती टाकण्यात आला व त्यानंतर फासकी कोयत्याने तोडण्यात आल्यानंतर बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीleopardबिबट्या