शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

रत्नागिरी : दी गिफ्ट ट्री ला सामाजिक वनीकरणचा हात, हरित सेनेची घेणार मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 13:57 IST

रत्नागिरी शहर प्लास्टिकमुक्त होण्यासाठी दी गिफ्ट ट्री संस्थेतर्फे प्लास्टिक द्या, कापडी पिशव्या घ्या हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यातून गोळा होणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर रोपे तयार करण्यासाठी करण्यात येणार असल्याने यासाठी आता सामाजिक वनीकरण विभागानेही सहकार्याचा हात दिला आहे.

ठळक मुद्देवाया जाणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये होणार रोपांची लागवडसामाजिक वनीकरण विभागानेही दिला सहकार्याचा हात दी गिफ्ट ट्री संस्थेच् प्लास्टिकमुक्त करण्यासाठी नगरपालिकेला सहकार्य

शोभना कांबळे रत्नागिरी : शहर प्लास्टिकमुक्त होण्यासाठी दी गिफ्ट ट्री संस्थेतर्फे प्लास्टिक द्या, कापडी पिशव्या घ्या हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यातून गोळा होणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर रोपे तयार करण्यासाठी करण्यात येणार असल्याने यासाठी आता सामाजिक वनीकरण विभागानेही सहकार्याचा हात दिला आहे. त्यासाठी शाळांमधील हरित सेनेची मदत घेण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सिद्धेश धुळप यांनी दिली.रत्नागिरी शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या रत्नागिरी नगरपालिकेच्या उपक्रमांना सहकार्य करण्यासाठी शहरातील  दी गिफ्ट ट्री ही संस्था पुढे आली आहे. संस्थेच्या प्लास्टिक द्या, कापडी पिशव्या घ्या या उपक्रमाद्वारे लागवडीसाठी रोपांचे वाटप केले जाते.

शहरातील नागरिकांनी घरातील कमीत कमी पाच ते जास्तीत जास्त दहा प्लास्टिक पिशव्या, तसेच दूध, तेल, पाणी अथवा शीतपेयांच्या बाटल्या संस्थेकडे आणून द्याव्यात. हे दिल्यानंतर त्या बदल्यात एक कापडी पिशवी मोफत देण्यात येणार आहे. नागरिकांकडून घेतलेल्या या पिशव्यांचा वापर पुढील पावसाळ्यात रोपे लावण्यासाठी केला जाणार आहे.पहिल्या टप्प्यात एक हजार कापडी पिशव्या देण्यात येणार आहेत. टेलर्सकडे कपडे शिवल्यानंतर कापडाचे अनेक छोटे तुकडे उरलेले असतात. रत्नागिरीतील सर्व कपडे बनविणाऱ्या दुकानांमधून हे तुकडे गोळा करण्यासंदर्भात सध्या विचारविनिमय सुरू आहे.

यासाठी शिवणकाम करत असलेल्या बचत गटांना कापडाचे हे तुकडे देऊन त्यांच्याकडून कापडी पिशव्या बनवून घेण्याचा मानस आहे, त्यायोगे महिला बचत गटांनाही रोजगार संधी उपलब्ध होईल, असे मत धुळप यांनी व्यक्त केले.प्लास्टिक हा विघटन न होणारा कचरा असून, त्याचे दुष्परिणाम भयानक आहेत. प्लास्टिक पिशवीत अन्न बांधून कचऱ्यांत फेकण्याचे प्रकार मुक्या जनावरांच्या जिवावर बेतत आहेत.

शहरात अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूने प्लास्टिकचा कचरा विखुरलेला असतो. यामुळे शहराची स्वच्छता धोक्यात आली आहे. धुळप यांच्या दी गिफ्ट ट्री संस्थेच्या नव्या संकल्पनेमुळे स्वच्छतेत भर पडणार आहे. 

प्लास्टिक पिशव्या आणून देणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे त्यांना सोयीचे व्हावे, या दृष्टीने काही स्टॉलधारक, दुकानदार यांचीही मदत घेण्याचा आमच्या संस्थेचा विचार आहे. सध्या हातखंबा येथील अ‍ॅग्रो सेल येथे या पिशव्या स्वीकारल्या जात आहेत. लवकरच काही स्टॉलधारकांकडेही या पिशव्या स्वीकारून त्यांना लवकरच कापडी पिशव्या देण्यात येणार आहेत.- सिद्धेश धुळप

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPlastic banप्लॅस्टिक बंदी