शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

रत्नागिरी -विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात

By admin | Updated: September 11, 2014 00:10 IST

औद्योगिक प्रशिक्षण संस्था : शिक्षकच नसल्याने उडाला गोंधळ

रत्नागिरी : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये राज्य शासनाच्या मान्यतेने विविध व्यावसायिक अभ्यासक्रम शिकविण्यात येतात. त्यांचा कालावधी एक ते दोन वर्षांचा असल्याने रोजगाराची संधी उपलब्ध होईल, या आशेने विद्यार्थी प्रवेश घेतात. परंतु वर्गात शिकविण्यासाठी शिक्षकच उपलब्ध नसल्यामुळे विद्याथीवर्गाचे भवितव्य अंधारात आहे. शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत १०९४ विद्यार्थी, तर १५० विद्यार्थिनी प्रशिक्षण घेत आहेत. विविध प्रकारचे २५ अभ्यासक्रम शिकविण्यात येतात. गोरगरीब, सामान्य कुटुंबातील विद्यार्थी अभ्यासक्रम दोन वर्षांत पूर्ण झाल्यावर नोकरी, व्यवसायाची संधी उपलब्ध होईल, यासाठी औद्योगिक केंद्रात प्रशिक्षण घेतात. मात्र, काही अभ्यासक्रम शिकविण्यासाठी शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा पुरता गोंधळ उडाला आहे.वातानुकुलन विभागाच्या दोन तुकड्या आहेत. गतवर्षी (२०१३-१४) मध्ये दोन्ही तुकड्यांसाठी एकमेव अध्यापक अध्यापन करीत होते. मात्र, जूनमध्ये त्या अध्यापकांचीही बदली झाल्यामुळे शिक्षक उपलब्ध नाहीत. एका वरिष्ठ विद्यार्थ्याला काही दिवस शिकविण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र, वैयक्तिक कारणामुळे तो विद्यार्थीही निघून गेल्याने विद्यार्थी शिक्षकांच्या प्रतीक्षेत आहेत. जूनपासून या वर्गावर शिकविण्यासाठी शिक्षक उपलब्ध नाही.वेळोवेळी विद्यार्थ्यांनी प्राचार्यांची भेट घेऊन शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी केली. परंतु प्राचार्य त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार केली जात आहे. आॅगस्टपासून सुरू झालेल्या वातानुकुलनच्या वर्षामध्ये (२०१४-१५) दोन तुकड्या आहेत. एका तुकडीत २१, तर दुसऱ्या तुकडीत २६ विद्यार्थी शिकत आहेत. या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी महिला अध्यापकांची निवड करण्यात आली आहे.इलेक्ट्रॉनिक्स अभियंता असलेल्या या अध्यापकांनी आपण केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्याची ग्वाही दिली आहे, परंतु प्रॅक्टीकलसाठी नकार दर्शविला आहे. परंतु यंदाचे दुसरे वर्ष असलेले वातानुकूलीनचे विद्यार्थी मात्र शिक्षकांच्या अद्यापही प्रतीक्षेत आहेत.संबंधित विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही किंवा त्यांचे प्रॅक्टिकल झाले नाही तर दोन वर्षांनंतर संबंधित विद्यार्थ्यांना नोकरी कोण देणार? वेळोवेळी विद्यार्थी शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी करीत असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. ग्रामीण भागातून अभ्यासक्रम शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्याचे नुकसान होत आहे. शिक्षक उपलब्ध होत नव्हता. त्यामुळे संबंधित बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त न करता येथेच थांबविणे गरजेचे होते. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम अपूर्ण आहे, विद्यार्थी मानसिक दडपणाखाली वावरत असताना, त्यांची जबाबदारी कोण घेणार? पालकदेखील हैराण झाले असून, याबाबत शिक्षण संचालकाकडे तक्रार करून दाद मागणार असल्याचे या पालकांनी सांगितले. (प्रतिनिधी)नापास होण्याची भीतीनुकतीच या शाखेच्या विद्यार्थ्यांची प्रथम वर्षाची परीक्षा घेण्यात आली. मात्र, अभ्यासक्रम अपूर्ण राहिला असून, प्रॅक्टिकलचा सराव नसल्याने विद्यार्थ्यांना नापास होण्याची भीती लागून राहिली आहे. अपूर्ण राहिलेल्या या अभ्यासक्रमाला जबाबदार कोण? असा सवाल आयटीआयमधील विद्यार्थी आणि पालकांमधून करण्यात येत आहे.अध्यापकांची प्रतीक्षाऔद्योगिक प्रशिक्षण संस्थेत १०९४ विद्यार्थी, तर १५० विद्यार्थिनी घेतायत प्रशिक्षण.वातानुकूलीकरण विभागाच्या दोन तुकड्या, दोन्ही तुकड्यांसाठी एकमेव अध्यापक.विद्यार्थ्यांच्या मागणीकडे प्राचार्य दुर्लक्ष करत असल्याचा आरोप.शिक्षक कमी असतानाही कार्यरत शिक्षकाची बदली केल्याने संताप.विद्यार्थ्यांचे होतेय शैक्षणिक नुकसान.