शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी -विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात

By admin | Updated: September 11, 2014 00:10 IST

औद्योगिक प्रशिक्षण संस्था : शिक्षकच नसल्याने उडाला गोंधळ

रत्नागिरी : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये राज्य शासनाच्या मान्यतेने विविध व्यावसायिक अभ्यासक्रम शिकविण्यात येतात. त्यांचा कालावधी एक ते दोन वर्षांचा असल्याने रोजगाराची संधी उपलब्ध होईल, या आशेने विद्यार्थी प्रवेश घेतात. परंतु वर्गात शिकविण्यासाठी शिक्षकच उपलब्ध नसल्यामुळे विद्याथीवर्गाचे भवितव्य अंधारात आहे. शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत १०९४ विद्यार्थी, तर १५० विद्यार्थिनी प्रशिक्षण घेत आहेत. विविध प्रकारचे २५ अभ्यासक्रम शिकविण्यात येतात. गोरगरीब, सामान्य कुटुंबातील विद्यार्थी अभ्यासक्रम दोन वर्षांत पूर्ण झाल्यावर नोकरी, व्यवसायाची संधी उपलब्ध होईल, यासाठी औद्योगिक केंद्रात प्रशिक्षण घेतात. मात्र, काही अभ्यासक्रम शिकविण्यासाठी शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा पुरता गोंधळ उडाला आहे.वातानुकुलन विभागाच्या दोन तुकड्या आहेत. गतवर्षी (२०१३-१४) मध्ये दोन्ही तुकड्यांसाठी एकमेव अध्यापक अध्यापन करीत होते. मात्र, जूनमध्ये त्या अध्यापकांचीही बदली झाल्यामुळे शिक्षक उपलब्ध नाहीत. एका वरिष्ठ विद्यार्थ्याला काही दिवस शिकविण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र, वैयक्तिक कारणामुळे तो विद्यार्थीही निघून गेल्याने विद्यार्थी शिक्षकांच्या प्रतीक्षेत आहेत. जूनपासून या वर्गावर शिकविण्यासाठी शिक्षक उपलब्ध नाही.वेळोवेळी विद्यार्थ्यांनी प्राचार्यांची भेट घेऊन शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी केली. परंतु प्राचार्य त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार केली जात आहे. आॅगस्टपासून सुरू झालेल्या वातानुकुलनच्या वर्षामध्ये (२०१४-१५) दोन तुकड्या आहेत. एका तुकडीत २१, तर दुसऱ्या तुकडीत २६ विद्यार्थी शिकत आहेत. या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी महिला अध्यापकांची निवड करण्यात आली आहे.इलेक्ट्रॉनिक्स अभियंता असलेल्या या अध्यापकांनी आपण केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्याची ग्वाही दिली आहे, परंतु प्रॅक्टीकलसाठी नकार दर्शविला आहे. परंतु यंदाचे दुसरे वर्ष असलेले वातानुकूलीनचे विद्यार्थी मात्र शिक्षकांच्या अद्यापही प्रतीक्षेत आहेत.संबंधित विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही किंवा त्यांचे प्रॅक्टिकल झाले नाही तर दोन वर्षांनंतर संबंधित विद्यार्थ्यांना नोकरी कोण देणार? वेळोवेळी विद्यार्थी शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी करीत असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. ग्रामीण भागातून अभ्यासक्रम शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्याचे नुकसान होत आहे. शिक्षक उपलब्ध होत नव्हता. त्यामुळे संबंधित बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त न करता येथेच थांबविणे गरजेचे होते. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम अपूर्ण आहे, विद्यार्थी मानसिक दडपणाखाली वावरत असताना, त्यांची जबाबदारी कोण घेणार? पालकदेखील हैराण झाले असून, याबाबत शिक्षण संचालकाकडे तक्रार करून दाद मागणार असल्याचे या पालकांनी सांगितले. (प्रतिनिधी)नापास होण्याची भीतीनुकतीच या शाखेच्या विद्यार्थ्यांची प्रथम वर्षाची परीक्षा घेण्यात आली. मात्र, अभ्यासक्रम अपूर्ण राहिला असून, प्रॅक्टिकलचा सराव नसल्याने विद्यार्थ्यांना नापास होण्याची भीती लागून राहिली आहे. अपूर्ण राहिलेल्या या अभ्यासक्रमाला जबाबदार कोण? असा सवाल आयटीआयमधील विद्यार्थी आणि पालकांमधून करण्यात येत आहे.अध्यापकांची प्रतीक्षाऔद्योगिक प्रशिक्षण संस्थेत १०९४ विद्यार्थी, तर १५० विद्यार्थिनी घेतायत प्रशिक्षण.वातानुकूलीकरण विभागाच्या दोन तुकड्या, दोन्ही तुकड्यांसाठी एकमेव अध्यापक.विद्यार्थ्यांच्या मागणीकडे प्राचार्य दुर्लक्ष करत असल्याचा आरोप.शिक्षक कमी असतानाही कार्यरत शिक्षकाची बदली केल्याने संताप.विद्यार्थ्यांचे होतेय शैक्षणिक नुकसान.