शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

रत्नागिरी : मोहोराचा दरवळ अन् उसळत्या लाटा, पर्यटकांसाठी मोकळ्या कोकणच्या वाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 13:42 IST

उसळणाऱ्या लाटा, भर दुपारीही आल्हाददायक थंडगार वातावरण आणि जागोजागी येणारा आंबा-काजूच्या मोहोराचा दरवळ... हा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर कोकणाशिवाय पर्यायच नाही. कोकणात विशेषत: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या जिकडे-तिकडे हेच चित्र आहे.

ठळक मुद्देनाताळ आणि वर्षअखेरीच्या मुहुर्तासाठी जिल्ह्यात अनेक ठिकाणी हॉटेल्स फुल्लरत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या दहा-बारा वर्षात वाढली तुमची पावलंही वळवा, कोकणाच्या दिशेने....तुमची वाट पाहत आहेत मोहोराचा दरवळ आणि उसळत्या लाटा

मनोज मुळ्येरत्नागिरी : उसळणाऱ्या लाटा, भर दुपारीही आल्हाददायक थंडगार वातावरण आणि जागोजागी येणारा आंबा-काजूच्या मोहोराचा दरवळ... हा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर कोकणाशिवाय पर्यायच नाही. कोकणात विशेषत: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या जिकडे-तिकडे हेच चित्र आहे. त्यामुळेच नाताळ आणि वर्षअखेरीच्या मुहुर्तासाठी अनेक ठिकाणी हॉटेल्स फुल्ल होऊ लागली आहेत.रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाळ्यातील हिरवाई अगदी हिवाळाभर कायम असते. नद्यांचे पाणी कमी-अधिक असले तरी प्रवाही असते. अजूनही सिमेंटची फार जंगले उभी राहिली नसल्याने थंडावा चांगलाच जाणवतो. त्यात नाताळच्या काळात गोव्यात पाय ठेवायलाही जागा मिळत नाही. त्यामुळे गेल्या दहा-बारा वर्षात नाताळ आणि वर्षअखेरच्या हंगामात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे.

२५ ते ३१ डिसेंबर या काळात हॉटेल्स फुल्ल होतात, हा अनुभव गेली दहा वर्षे सातत्याने येत आहे. यंदाही रत्नागिरी, गुहागर, दापोली या समुद्रकिनारी असलेल्या तालुक्यांमध्ये अनेक हॉटेल्स फुल्ल झाली आहेत.पावसाळा आणि हिवाळा या दोन्ही ऋतूंमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्गातील वातावरण अतिशय प्रसन्न असते. आंबा, काजूची कलमे मोहोरलेली असतात आणि मोहोरांचा दरवळ मोहून टाकतो. मग आता वाट पाहू नका. तुमची पावलंही वळवा, कोकणाच्या दिशेने.... मोहोराचा दरवळ आणि उसळत्या लाटा तुमची वाट पाहत आहेत.

 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीtourismपर्यटन