शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
3
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
4
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
5
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
6
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
7
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
8
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
9
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
10
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
11
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
12
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
13
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
14
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
15
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
16
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
17
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
18
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
19
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
20
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल

रत्नागिरी : पाच दिवसात पावणेपाच टन प्लास्टिक जप्त, सप्टेंबरपर्यंत छापासत्र बंद राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 17:07 IST

रत्नागिरी शहरात सलग पाच दिवस टाकलेल्या छाप्यात तब्बल पावणेपाच टन प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. मात्र, प्लास्टिक पिशव्यांसाठी पर्यायी पिशव्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याची व्यापाऱ्यांची भूमिका लक्षात घेऊन रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात येत्या १ सप्टेंबरपर्यंत छापासत्र बंद राहणार आहे.

ठळक मुद्देपाच दिवसात पावणेपाच टन प्लास्टिक जप्तरत्नागिरीत १ सप्टेंबरपर्यंत छापासत्र बंद राहणारसंयुक्त सभेत उदय सामंत यांची घोषणा

रत्नागिरी : रत्नागिरी शहरात सलग पाच दिवस टाकलेल्या छाप्यात तब्बल पावणेपाच टन प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे रत्नागिरीसह जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये अद्याप टनावारी प्लास्टिक पिशव्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, प्लास्टिक पिशव्यांसाठी पर्यायी पिशव्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याची व्यापाऱ्यांची भूमिका लक्षात घेऊन रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात येत्या १ सप्टेंबरपर्यंत छापासत्र बंद राहणार आहे. हा निर्णय मंगळवारी येथे झालेल्या व्यापाऱ्यांच्या बैठकीत आमदार उदय सामंत यांनी जाहीर केला.रत्नागिरी शहरात टाकलेल्या छाप्यामध्ये तब्बल पावणेपाच टन प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या व वस्तू जप्त करण्यात आल्या. रत्नागिरी नगर परिषदेच्या भरारी पथकातील कर्मचारी दादागिरी करतात. प्रतिबंधित नसलेल्या प्लास्टिक पिशव्या, वस्तू जप्त करतात, अशी व्यापाऱ्यांची तक्रार होती.याबाबत चर्चेतून निर्णय घेण्यासाठी बुधवारी दुपारी १२.३० वाजता नगर परिषदेच्या संत गाडगेबाबा सभागृहात शहरातील व्यापारी, नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी यांची संयुक्त सभा आमदार उदय सामंत यांच्या उपस्थितीत झाली. नगराध्यक्ष राहुल पंडित, मुख्याधिकारी अरविंद माळी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष उदय पेठे व शहरातील व्यापारी उपस्थित होते.या सभेत प्लास्टिक बंदीमध्ये नेमक्या कोणत्या वस्तू आहेत व कोणत्या नाहीत, याबाबत चित्रफीत दाखविण्यात आली. त्यानंतर मार्गदर्शन करताना आमदार उदय सामंत म्हणाले, व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर येत्या १ सप्टेंबरपर्यंत भरारी पथकामार्फत शहरात सुरू असलेल्या छापासत्र थांबवाव्यात, अशी सूचना आपण नगर परिषदेला केली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांकडील प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा परत करण्यास किंवा पुनर्प्रक्रियेसाठी देण्यास यामुळे अवधी मिळेल.वेफर्स पिशव्यांची मोठी समस्यारिसायकलेबल म्हणून वेफर्स, चिप्स व विविध खाद्यवस्तूंसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांचे पर्यावरणासाठी सर्वात मोठे संकट निर्माण झाले आहे. या प्लास्टिकच्या पिशव्या रिसायकलेबल असल्या तरी त्या परत घेतल्याच जात नाहीत, त्यावर पुनर्प्रक्रियाही होत नाही. त्यामुळे या पिशव्यांचा सर्वाधिक कचरा ही मोठी समस्या बनली आहे. व्यापाऱ्यांना या नियमाची माहिती द्यावी आणि त्याची कडक अंमलबजावणी व्हावी. त्याबाबत कारवाई होणार की नाही, असा सवाल रत्नागिरीतील नागरिकांमधून केला जात आहे....त्या पिशव्या परत करणाररत्नागिरी शहरात भरारी पथकाने कारवाई करताना काही व्यापाऱ्यांकडील ५० मायक्रॉनवरील पॉलिथीन पिशव्या जप्त केल्याचे स्पष्ट झाले आहे. ही चुकीची कारवाई झाली आहे. त्यामुळे या पिशव्या संबंधित व्यापाऱ्यांना परत केल्या जातील, असे उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीRatnagiriरत्नागिरी