शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

रत्नागिरी : मच्छीमारांचा ३० कोटींचा डिझेल परतावा रखडला, मच्छीमार हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 13:48 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील सागरी मासेमारी करणाऱ्या १८०० नौकांचा गेल्या पावणेदोन वर्षांचा तब्बल ३० कोटींचा डिझेल अनुदान परतावा रखडला आहे.

ठळक मुद्देमच्छीमारांचा ३० कोटींचा डिझेल परतावा रखडला, मच्छीमार हैराणजिल्ह्यातील सागरी मासेमारी करणाऱ्या १८०० नौकांना बसला फटका

रत्नागिरी : जिल्ह्यातील सागरी मासेमारी करणाऱ्या १८०० नौकांचा गेल्या पावणेदोन वर्षांचा तब्बल ३० कोटींचा डिझेल अनुदान परतावा रखडला आहे.

या रखडलेल्या ३० कोटी परताव्यापैकी ७ कोटींचा परतावा रत्नागिरी मत्स्य व्यवसाय विभागाला गेल्याच आठवड्यात प्राप्त झाला आहे. सरकारी कर्ज घेतलेल्या मच्छीमारी नौका व खासगी मच्छीमारी नौका अशा दोन गटांमध्ये या परताव्याची रक्कम येत्या १० दिवसांमध्ये वितरीत केली जाणार आहे. ही माहिती रत्नागिरी विभागाचे सहाय्यक मत्स्य आयुक्त आनंद पालव यांनी लोकमतला दिली.सागरी मासेमारी करणाऱ्या नौकांना शासनाकडून आधी अनुदानित डिझेलचा पुरवठा केला जात होता. मात्र, काही वर्षांपासून सागरी मासेमारी करणाऱ्या नौकांना डिझेल या इंधनाची खरेदी बाजारभावाने करावी लागत आहे. इंधनावरील अनुदान शासनाकडून मच्छीमारांना दर महिन्याला दिले जाईल, असे सांगण्यात आले होते. परंतु सातत्याने वर्ष, दोन वर्षे परतावा न मिळण्याचा प्रकार अनुभवास येत आहे.याबाबत सहाय्यक मत्स्य आयुक्त पालव म्हणाले, जिल्ह्यातील १८०० नौकांना हा डिझेल अनुदान परतावा मिळायचा आहे. ३० कोटींपैकी ७ कोटींचा निधी गेल्याच आठवड्यात या कार्यालयाला प्राप्त झाला आहे.

येत्या १० दिवसांत हा परतावा जिल्ह्यातील लाभधारक नौकाधारकांना वितरीत होणार आहे. शासनाच्या कर्जावर उभारण्यात आलेल्या मासेमारी नौकांना या ७ कोटींपैकी ६० टक्के अर्थात ४ कोटी २० लाख रुपये, तर खासगी मासेमारी नौकांना ४० टक्के अर्थात २ कोटी ८० लाखांचा डिझेल परतावा वितरीत होणार आहे.शासनाने शब्द पाळला नाही!थेट डिझेल खरेदीच्या वेळी मिळणारे अनुदान शासनाने बंद केल्यानंतर शासनाकडून नंतर दर महिन्याला किवा दोन महिन्यांनी डिझेल अनुदानाचा परतावा मासेमारी नौकांना दिला जाईल, असे शासनाने त्यावेळी सांगितले होते. मात्र, त्यानंतर कधीही डिझेलचा परतावा वेळेत मिळालेला नाही, अशी मच्छीमारांची तक्रार आहे. आताच्या स्थितीत तर गेल्या पावणेदोन वर्षांचा परतावा प्रलंबित आहे. त्यामुळे शासनाने किमान दर दोन किवा तीन महिन्यांनी डिझेलचा परतावा मच्छीमारांना द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :fishermanमच्छीमारRatnagiriरत्नागिरी