शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

रत्नागिरीत बनावट सेंद्रीय खतांचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 13:50 IST

एमआयडीसी मिरजोळे येथील अ‍ॅम्बीशस फिश मिल प्रॉडक्ट कंपनीत धाड टाकून बनावट सेंद्रीय खताचा साठा जप्त करण्यात आला. जिल्हा गुणवत्ता नियंत्रक पथकाने टाकलेल्या धाडीत ५,७७१ पोती जप्त खत केले आहे. ४० किलोच्या एका पोत्याची किंमत ५५० रुपये असून, ३१ लाख ७४ हजार ५० रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला.

ठळक मुद्देरत्नागिरीत बनावट सेंद्रीय खतांचा साठा जप्त३१ लाख ७४ हजार ५० रुपयांचा माल हस्तगत

रत्नागिरी : एमआयडीसी मिरजोळे येथील अ‍ॅम्बीशस फिश मिल प्रॉडक्ट कंपनीत धाड टाकून बनावट सेंद्रीय खताचा साठा जप्त करण्यात आला. जिल्हा गुणवत्ता नियंत्रक पथकाने टाकलेल्या धाडीत ५,७७१ पोती जप्त खत केले आहे. ४० किलोच्या एका पोत्याची किंमत ५५० रुपये असून, ३१ लाख ७४ हजार ५० रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला.कंपनीचे मालक सिराज काझी यांनी २००६मध्ये सिटी कंपोस्टचा परवाना काढला होता. २००९ साली हा परवाना रद्द झाल्यानंतर तो पुन्हा काढण्यात आलेला नाही. याशिवाय कंपनीमध्ये कोणत्याही प्रकारच्या यंत्रसामुग्रीशिवाय प्रयोगशाळा उपलब्ध नसताना ५ हजार ७७१ सेंद्रीय खताची पोती सापडली आहेत.राजापूर तालुक्यातील कशेळी येथे मंगळवारी तालुका पथकाने घातलेल्या धाडीमध्ये ३४२ बोगस सेंद्रीय खताची पोती जप्त केली होती. या खत विक्रेत्यांकडेदेखील कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचे उघडकीस आले.

या नियंत्रण पथकामध्ये मिरजोळेच्या पोलीसपाटील समीक्षा पाडावे, सरपंच गणेश पाडावे, माजी सरपंच गजानन गुरव, ग्रामसेवक कृष्णकांत सावंत, जिल्हा गुणवत्ता निरीक्षक जी. आर. मुरकुटे, जिल्हा कृषी अधिकारी आरीफ शहा, पंचायत समिती कृ षी अधिकारी विशाल जाधव, तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे, कृषी पर्यवेक्षक काशिनाथ बापट, कृ षी सहाय्यक व्ही. बी. नाडे यांचा समावेश होता. 

२००६ साली सिटी कंपोस्टचा परवाना काझी यांनी काढला होता. २००९ साली हा परवाना संपला असून, त्यानंतर कोणताही परवाना नसताना खत निर्मिती करुन विक्री सुरु होती. आतापर्यंत बोगस सेंद्रीय खतामध्ये सर्वांत मोठा साठा सापडला आहे. राजापूर तालुक्यामध्ये सुरु असलेल्या बोगस खतविक्रीमुळे कंपनीतील बोगस साठ्याकडे पोहोचणे शक्य झाले. शासकीय नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे.- आरीफ शहा,कृषी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरी