शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

रत्नागिरीत बनावट सेंद्रीय खतांचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 13:50 IST

एमआयडीसी मिरजोळे येथील अ‍ॅम्बीशस फिश मिल प्रॉडक्ट कंपनीत धाड टाकून बनावट सेंद्रीय खताचा साठा जप्त करण्यात आला. जिल्हा गुणवत्ता नियंत्रक पथकाने टाकलेल्या धाडीत ५,७७१ पोती जप्त खत केले आहे. ४० किलोच्या एका पोत्याची किंमत ५५० रुपये असून, ३१ लाख ७४ हजार ५० रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला.

ठळक मुद्देरत्नागिरीत बनावट सेंद्रीय खतांचा साठा जप्त३१ लाख ७४ हजार ५० रुपयांचा माल हस्तगत

रत्नागिरी : एमआयडीसी मिरजोळे येथील अ‍ॅम्बीशस फिश मिल प्रॉडक्ट कंपनीत धाड टाकून बनावट सेंद्रीय खताचा साठा जप्त करण्यात आला. जिल्हा गुणवत्ता नियंत्रक पथकाने टाकलेल्या धाडीत ५,७७१ पोती जप्त खत केले आहे. ४० किलोच्या एका पोत्याची किंमत ५५० रुपये असून, ३१ लाख ७४ हजार ५० रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला.कंपनीचे मालक सिराज काझी यांनी २००६मध्ये सिटी कंपोस्टचा परवाना काढला होता. २००९ साली हा परवाना रद्द झाल्यानंतर तो पुन्हा काढण्यात आलेला नाही. याशिवाय कंपनीमध्ये कोणत्याही प्रकारच्या यंत्रसामुग्रीशिवाय प्रयोगशाळा उपलब्ध नसताना ५ हजार ७७१ सेंद्रीय खताची पोती सापडली आहेत.राजापूर तालुक्यातील कशेळी येथे मंगळवारी तालुका पथकाने घातलेल्या धाडीमध्ये ३४२ बोगस सेंद्रीय खताची पोती जप्त केली होती. या खत विक्रेत्यांकडेदेखील कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचे उघडकीस आले.

या नियंत्रण पथकामध्ये मिरजोळेच्या पोलीसपाटील समीक्षा पाडावे, सरपंच गणेश पाडावे, माजी सरपंच गजानन गुरव, ग्रामसेवक कृष्णकांत सावंत, जिल्हा गुणवत्ता निरीक्षक जी. आर. मुरकुटे, जिल्हा कृषी अधिकारी आरीफ शहा, पंचायत समिती कृ षी अधिकारी विशाल जाधव, तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे, कृषी पर्यवेक्षक काशिनाथ बापट, कृ षी सहाय्यक व्ही. बी. नाडे यांचा समावेश होता. 

२००६ साली सिटी कंपोस्टचा परवाना काझी यांनी काढला होता. २००९ साली हा परवाना संपला असून, त्यानंतर कोणताही परवाना नसताना खत निर्मिती करुन विक्री सुरु होती. आतापर्यंत बोगस सेंद्रीय खतामध्ये सर्वांत मोठा साठा सापडला आहे. राजापूर तालुक्यामध्ये सुरु असलेल्या बोगस खतविक्रीमुळे कंपनीतील बोगस साठ्याकडे पोहोचणे शक्य झाले. शासकीय नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे.- आरीफ शहा,कृषी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरी