शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

रत्नागिरी : देवरूख नगरपंचायतीच्या निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी पारा चढला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 19:45 IST

देवरूख नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीला आता चांगलीच रंगत येऊ लागली आहे. एकीकडे उन्हाचा पारा जसजसा वाढतोय तसतसा नगरपंचायत निवडणूक प्रचारातील आरोप - प्रत्यारोपांच्या फैरींचा पारादेखील वाढायला सुरुवात झाली आहे. शिवसेनेकडून करण्यात आलेल्या आरोपांना भाजपकडून जशास तसे उत्तर दिले जात आहे. मात्र, काँग्रेसकडून सबुरीचा पवित्रा घेतला गेला आहे.

ठळक मुद्देदेवरूख नगरपंचायत निवडणुकआरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी पारा चढला !

सचिन मोहितेदेवरुख : देवरूख नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीला आता चांगलीच रंगत येऊ लागली आहे. एकीकडे उन्हाचा पारा जसजसा वाढतोय तसतसा देवरूख नगरपंचायत निवडणूक प्रचारातील आरोप - प्रत्यारोपांच्या फैरींचा पारादेखील वाढायला सुरुवात झाली आहे. शिवसेनेकडून करण्यात आलेल्या आरोपांना भाजपकडून जशास तसे उत्तर दिले जात आहे. मात्र, काँग्रेसकडून सबुरीचा पवित्रा घेतला गेला आहे.निवडणूक म्हटलं की, प्रचाराची राळ उठविली जाते. यापूर्वी सत्तेत मित्र असलेला आणि राजकीय प्रतिस्पर्धी झाल्यावर आरोप करताना निवडणुकीत मागे-पुढे पाहिलं जात नाही. किंबहुना आपली प्रतिमा जनतेच्या मनावर ठसविण्यासाठी वातावरण निर्मिती केली जाते. यासाठी कॉर्नर सभा, जाहीर सभा यांचा अवलंब होतो.

या प्रचार सभांमुळेच खऱ्या अर्थाने निवडणुकातील रंगत वाढताना दिसते. यावेळी देवरुखच्या निवडणुकीत न्यायालयीन प्रक्रियेत किमान ५-६ दिवस वाया गेल्यामुळे आणि सध्या उन्हाचा पारा वाढलेला असल्याने जाहीर सभा व कॉर्नर सभांवर भर दिसत नाही. डोअर टु डोअर दोन-तीन फेऱ्यांवर उमेदवारांचा भर आहे.दुसरीकडे पत्रकार परिषदांच्या माध्यमातून सेना आणि भाजपमध्ये आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीकडूनही सावध भूमिका घेतली जात आहे. केवळ आणि केवळ विकासाच्या मुद्द्यावरच राष्ट्रवादीकडून बोलले जाते. मात्र, काँग्रेसचा वरिष्ठ पातळीवरचा एकही नेता देवरुखात आलेला नाही.

याबरोबरच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे वरिष्ठ नेतेदेखील सोमवारपर्यंत देवरुखमध्ये आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मनसेचे राज्याचे नेते देवरुखात तळ ठोकून आहेत. भाजपसोबत युती करुन असलेली रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट) यांचीदेखील काँग्रेससारखीच स्थिती आहे. आरपीआय हा भाजपच्या कमळ चिन्हावर प्रभाग १३ मधून एका जागेवर लढत आहे.गत पाच वर्षांचा विचार करता अडीच वर्षे सेना आणि दुसरी अडीच वर्षे भाजपने राष्ट्रवादीच्या साथीने सत्ताधारी म्हणून काम पाहिले. परंतु सध्या अडीच वर्षे सत्ताधारी म्हणून राहिलेल्या भाजपला म्हणावे तसे काम करता आले नसल्याचाच नगारा सेनेकडून बडविला जात आहे.

पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी म्हटले की, सत्ताधारी माझ्यापर्यंत प्रस्तावच घेऊन आले नाहीत. त्यामुळे इच्छा असतानाही आपल्याला निधी देता आला नाही सांगितले. तर खासदार विनायक राऊत यांनी थापा मारणाऱ्यांचीच आणि दलाली करणाऱ्यांची संख्या वाढली आहे, अशी बोचरी टीका भाजपवर केली. आघाडीकडून उमेश शेट्ये यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीElectionनिवडणूक