शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

रत्नागिरी : देवरूख नगरपंचायतीच्या निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी पारा चढला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 19:45 IST

देवरूख नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीला आता चांगलीच रंगत येऊ लागली आहे. एकीकडे उन्हाचा पारा जसजसा वाढतोय तसतसा नगरपंचायत निवडणूक प्रचारातील आरोप - प्रत्यारोपांच्या फैरींचा पारादेखील वाढायला सुरुवात झाली आहे. शिवसेनेकडून करण्यात आलेल्या आरोपांना भाजपकडून जशास तसे उत्तर दिले जात आहे. मात्र, काँग्रेसकडून सबुरीचा पवित्रा घेतला गेला आहे.

ठळक मुद्देदेवरूख नगरपंचायत निवडणुकआरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी पारा चढला !

सचिन मोहितेदेवरुख : देवरूख नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीला आता चांगलीच रंगत येऊ लागली आहे. एकीकडे उन्हाचा पारा जसजसा वाढतोय तसतसा देवरूख नगरपंचायत निवडणूक प्रचारातील आरोप - प्रत्यारोपांच्या फैरींचा पारादेखील वाढायला सुरुवात झाली आहे. शिवसेनेकडून करण्यात आलेल्या आरोपांना भाजपकडून जशास तसे उत्तर दिले जात आहे. मात्र, काँग्रेसकडून सबुरीचा पवित्रा घेतला गेला आहे.निवडणूक म्हटलं की, प्रचाराची राळ उठविली जाते. यापूर्वी सत्तेत मित्र असलेला आणि राजकीय प्रतिस्पर्धी झाल्यावर आरोप करताना निवडणुकीत मागे-पुढे पाहिलं जात नाही. किंबहुना आपली प्रतिमा जनतेच्या मनावर ठसविण्यासाठी वातावरण निर्मिती केली जाते. यासाठी कॉर्नर सभा, जाहीर सभा यांचा अवलंब होतो.

या प्रचार सभांमुळेच खऱ्या अर्थाने निवडणुकातील रंगत वाढताना दिसते. यावेळी देवरुखच्या निवडणुकीत न्यायालयीन प्रक्रियेत किमान ५-६ दिवस वाया गेल्यामुळे आणि सध्या उन्हाचा पारा वाढलेला असल्याने जाहीर सभा व कॉर्नर सभांवर भर दिसत नाही. डोअर टु डोअर दोन-तीन फेऱ्यांवर उमेदवारांचा भर आहे.दुसरीकडे पत्रकार परिषदांच्या माध्यमातून सेना आणि भाजपमध्ये आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीकडूनही सावध भूमिका घेतली जात आहे. केवळ आणि केवळ विकासाच्या मुद्द्यावरच राष्ट्रवादीकडून बोलले जाते. मात्र, काँग्रेसचा वरिष्ठ पातळीवरचा एकही नेता देवरुखात आलेला नाही.

याबरोबरच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे वरिष्ठ नेतेदेखील सोमवारपर्यंत देवरुखमध्ये आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मनसेचे राज्याचे नेते देवरुखात तळ ठोकून आहेत. भाजपसोबत युती करुन असलेली रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट) यांचीदेखील काँग्रेससारखीच स्थिती आहे. आरपीआय हा भाजपच्या कमळ चिन्हावर प्रभाग १३ मधून एका जागेवर लढत आहे.गत पाच वर्षांचा विचार करता अडीच वर्षे सेना आणि दुसरी अडीच वर्षे भाजपने राष्ट्रवादीच्या साथीने सत्ताधारी म्हणून काम पाहिले. परंतु सध्या अडीच वर्षे सत्ताधारी म्हणून राहिलेल्या भाजपला म्हणावे तसे काम करता आले नसल्याचाच नगारा सेनेकडून बडविला जात आहे.

पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी म्हटले की, सत्ताधारी माझ्यापर्यंत प्रस्तावच घेऊन आले नाहीत. त्यामुळे इच्छा असतानाही आपल्याला निधी देता आला नाही सांगितले. तर खासदार विनायक राऊत यांनी थापा मारणाऱ्यांचीच आणि दलाली करणाऱ्यांची संख्या वाढली आहे, अशी बोचरी टीका भाजपवर केली. आघाडीकडून उमेश शेट्ये यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीElectionनिवडणूक