शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

रत्नागिरी : उकाड्याने हैराण झालेल्या नाट्यरसिकांनी नाटकच पाडले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 13:49 IST

नाट्यगृहातील वातानुकुलीत यंत्रणा बंद असल्याने झालेल्या प्रचंड उकाड्यामुळे नाट्यरसिकांनी शनिवारी रात्री झालेला नाटकाचा प्रयोग मध्यंतरानंतर काही काळ थांबवला. वातानुकुलीत नाट्यगृहाची वातानुकूलित प्रयोगाची तिकिटे काढलेली असताना व तसे नाटकाच्या जाहिरातीत उल्लेख असतांना नाट्यगृहातील वातानुकूलित यंत्रणा बंद का ? असा प्रश्न विचारत प्रेक्षकांनी आयोजकांना धारेवर धरले तर, रत्नागिरी नगरपालिकेच्या व नगराध्यक्षांच्या नावाने शिमगा केला.

ठळक मुद्देउकाड्याने हैराण झालेल्या नाट्यरसिकांनी नाटकच पाडले बंदप्रयोग मध्यंतरानंतर काही काळ थांबवलाउमेश कामत, स्पृहा जोशी यांना संवाद साधावा लागला

रत्नागिरी : नाट्यगृहातील वातानुकुलीत यंत्रणा बंद असल्याने झालेल्या प्रचंड उकाड्यामुळे नाट्यरसिकांनी शनिवारी रात्री झालेला नाटकाचा प्रयोग मध्यंतरानंतर काही काळ थांबवला.

वातानुकुलीत नाट्यगृहाची वातानुकूलित प्रयोगाची तिकिटे काढलेली असताना व तसे नाटकाच्या जाहिरातीत उल्लेख असतांना नाट्यगृहातील वातानुकूलित यंत्रणा बंद का ? असा प्रश्न विचारत प्रेक्षकांनी आयोजकांना धारेवर धरले तर, रत्नागिरी नगरपालिकेच्या व नगराध्यक्षांच्या नावाने शिमगा केला.सुमारे दोन महिने नाट्यगृहातील वातानुकुलीत यंत्रणा बंद आहे, या आधी झालेल्या एका नाट्यप्रयोगाच्या वेळीही रसिकांनी तीव्र शब्दात नापसंती व्यक्त केली होती. मात्र, ही यंत्रणा सुरु करण्यास नगरपालिकेकडून विलंब होत होता.

आजवर हजारो नाटकांचे रत्नागिरीत यशस्वी आयोजन करणाऱ्या आयोजकांनादेखील नाट्यरसिकांच्या असुविधेमुळे दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ आली. वातानुकूलित यंत्रणा या प्रयोगाआधी दुरुस्त होईल अशा नगरपालिकेच्या आश्वासनामुळेच आम्ही या नाटकाचा प्रयोग लावला अशी माहिती आयोजक किशोर सावंत यांनी दिली.नाट्यगृहातील असुविधा नाट्यगृहातील असुविधेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत रसिकांनी प्रयोग रोखल्यावर नाटकातील कलाकार उमेश कामत आणि स्पृहा जोशी यांना रसिकांसमोर येऊन संवाद साधावा लागला.

नगरपालिकेच्या या असुविधेमुळे रत्नागिरीचे नाव खराब होत आहे अशी खंत अनेक रसिकांनी व्यक्त केली. सुमारे दोन महिन्यांपासून नाट्यगृहातील जनरेटर बंद असल्याने वातानुकूलित यंत्रणा सुरु करता येत नाही, यामुळे नाट्यगृहात प्रचंड उकाडा होतो.

अनेक नाट्य आयोजकांनी याबाबत नगरपालिकेला कळवूनही या कामात विलंब होत आहे. नाट्यगृहातील स्वच्छतागृहातील दुर्गंधीमुळे डाव्या बाजूकडील खुर्च्यांवर बसून कार्यक्रम बघणे देखील अतिशय कठीण होते. संपूर्ण रत्नागिरीत स्वच्छता कार्यक्रम राबवणारी पालिका किमान कार्यक्रमाच्या वेळी तरी नाट्यगृहातील स्वच्छतागृहातील स्वच्छता का करत नाही ? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcultureसांस्कृतिक