शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

रत्नागिरी : उकाड्याने हैराण झालेल्या नाट्यरसिकांनी नाटकच पाडले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 13:49 IST

नाट्यगृहातील वातानुकुलीत यंत्रणा बंद असल्याने झालेल्या प्रचंड उकाड्यामुळे नाट्यरसिकांनी शनिवारी रात्री झालेला नाटकाचा प्रयोग मध्यंतरानंतर काही काळ थांबवला. वातानुकुलीत नाट्यगृहाची वातानुकूलित प्रयोगाची तिकिटे काढलेली असताना व तसे नाटकाच्या जाहिरातीत उल्लेख असतांना नाट्यगृहातील वातानुकूलित यंत्रणा बंद का ? असा प्रश्न विचारत प्रेक्षकांनी आयोजकांना धारेवर धरले तर, रत्नागिरी नगरपालिकेच्या व नगराध्यक्षांच्या नावाने शिमगा केला.

ठळक मुद्देउकाड्याने हैराण झालेल्या नाट्यरसिकांनी नाटकच पाडले बंदप्रयोग मध्यंतरानंतर काही काळ थांबवलाउमेश कामत, स्पृहा जोशी यांना संवाद साधावा लागला

रत्नागिरी : नाट्यगृहातील वातानुकुलीत यंत्रणा बंद असल्याने झालेल्या प्रचंड उकाड्यामुळे नाट्यरसिकांनी शनिवारी रात्री झालेला नाटकाचा प्रयोग मध्यंतरानंतर काही काळ थांबवला.

वातानुकुलीत नाट्यगृहाची वातानुकूलित प्रयोगाची तिकिटे काढलेली असताना व तसे नाटकाच्या जाहिरातीत उल्लेख असतांना नाट्यगृहातील वातानुकूलित यंत्रणा बंद का ? असा प्रश्न विचारत प्रेक्षकांनी आयोजकांना धारेवर धरले तर, रत्नागिरी नगरपालिकेच्या व नगराध्यक्षांच्या नावाने शिमगा केला.सुमारे दोन महिने नाट्यगृहातील वातानुकुलीत यंत्रणा बंद आहे, या आधी झालेल्या एका नाट्यप्रयोगाच्या वेळीही रसिकांनी तीव्र शब्दात नापसंती व्यक्त केली होती. मात्र, ही यंत्रणा सुरु करण्यास नगरपालिकेकडून विलंब होत होता.

आजवर हजारो नाटकांचे रत्नागिरीत यशस्वी आयोजन करणाऱ्या आयोजकांनादेखील नाट्यरसिकांच्या असुविधेमुळे दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ आली. वातानुकूलित यंत्रणा या प्रयोगाआधी दुरुस्त होईल अशा नगरपालिकेच्या आश्वासनामुळेच आम्ही या नाटकाचा प्रयोग लावला अशी माहिती आयोजक किशोर सावंत यांनी दिली.नाट्यगृहातील असुविधा नाट्यगृहातील असुविधेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत रसिकांनी प्रयोग रोखल्यावर नाटकातील कलाकार उमेश कामत आणि स्पृहा जोशी यांना रसिकांसमोर येऊन संवाद साधावा लागला.

नगरपालिकेच्या या असुविधेमुळे रत्नागिरीचे नाव खराब होत आहे अशी खंत अनेक रसिकांनी व्यक्त केली. सुमारे दोन महिन्यांपासून नाट्यगृहातील जनरेटर बंद असल्याने वातानुकूलित यंत्रणा सुरु करता येत नाही, यामुळे नाट्यगृहात प्रचंड उकाडा होतो.

अनेक नाट्य आयोजकांनी याबाबत नगरपालिकेला कळवूनही या कामात विलंब होत आहे. नाट्यगृहातील स्वच्छतागृहातील दुर्गंधीमुळे डाव्या बाजूकडील खुर्च्यांवर बसून कार्यक्रम बघणे देखील अतिशय कठीण होते. संपूर्ण रत्नागिरीत स्वच्छता कार्यक्रम राबवणारी पालिका किमान कार्यक्रमाच्या वेळी तरी नाट्यगृहातील स्वच्छतागृहातील स्वच्छता का करत नाही ? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcultureसांस्कृतिक