शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

रत्नागिरी : उकाड्याने हैराण झालेल्या नाट्यरसिकांनी नाटकच पाडले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 13:49 IST

नाट्यगृहातील वातानुकुलीत यंत्रणा बंद असल्याने झालेल्या प्रचंड उकाड्यामुळे नाट्यरसिकांनी शनिवारी रात्री झालेला नाटकाचा प्रयोग मध्यंतरानंतर काही काळ थांबवला. वातानुकुलीत नाट्यगृहाची वातानुकूलित प्रयोगाची तिकिटे काढलेली असताना व तसे नाटकाच्या जाहिरातीत उल्लेख असतांना नाट्यगृहातील वातानुकूलित यंत्रणा बंद का ? असा प्रश्न विचारत प्रेक्षकांनी आयोजकांना धारेवर धरले तर, रत्नागिरी नगरपालिकेच्या व नगराध्यक्षांच्या नावाने शिमगा केला.

ठळक मुद्देउकाड्याने हैराण झालेल्या नाट्यरसिकांनी नाटकच पाडले बंदप्रयोग मध्यंतरानंतर काही काळ थांबवलाउमेश कामत, स्पृहा जोशी यांना संवाद साधावा लागला

रत्नागिरी : नाट्यगृहातील वातानुकुलीत यंत्रणा बंद असल्याने झालेल्या प्रचंड उकाड्यामुळे नाट्यरसिकांनी शनिवारी रात्री झालेला नाटकाचा प्रयोग मध्यंतरानंतर काही काळ थांबवला.

वातानुकुलीत नाट्यगृहाची वातानुकूलित प्रयोगाची तिकिटे काढलेली असताना व तसे नाटकाच्या जाहिरातीत उल्लेख असतांना नाट्यगृहातील वातानुकूलित यंत्रणा बंद का ? असा प्रश्न विचारत प्रेक्षकांनी आयोजकांना धारेवर धरले तर, रत्नागिरी नगरपालिकेच्या व नगराध्यक्षांच्या नावाने शिमगा केला.सुमारे दोन महिने नाट्यगृहातील वातानुकुलीत यंत्रणा बंद आहे, या आधी झालेल्या एका नाट्यप्रयोगाच्या वेळीही रसिकांनी तीव्र शब्दात नापसंती व्यक्त केली होती. मात्र, ही यंत्रणा सुरु करण्यास नगरपालिकेकडून विलंब होत होता.

आजवर हजारो नाटकांचे रत्नागिरीत यशस्वी आयोजन करणाऱ्या आयोजकांनादेखील नाट्यरसिकांच्या असुविधेमुळे दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ आली. वातानुकूलित यंत्रणा या प्रयोगाआधी दुरुस्त होईल अशा नगरपालिकेच्या आश्वासनामुळेच आम्ही या नाटकाचा प्रयोग लावला अशी माहिती आयोजक किशोर सावंत यांनी दिली.नाट्यगृहातील असुविधा नाट्यगृहातील असुविधेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत रसिकांनी प्रयोग रोखल्यावर नाटकातील कलाकार उमेश कामत आणि स्पृहा जोशी यांना रसिकांसमोर येऊन संवाद साधावा लागला.

नगरपालिकेच्या या असुविधेमुळे रत्नागिरीचे नाव खराब होत आहे अशी खंत अनेक रसिकांनी व्यक्त केली. सुमारे दोन महिन्यांपासून नाट्यगृहातील जनरेटर बंद असल्याने वातानुकूलित यंत्रणा सुरु करता येत नाही, यामुळे नाट्यगृहात प्रचंड उकाडा होतो.

अनेक नाट्य आयोजकांनी याबाबत नगरपालिकेला कळवूनही या कामात विलंब होत आहे. नाट्यगृहातील स्वच्छतागृहातील दुर्गंधीमुळे डाव्या बाजूकडील खुर्च्यांवर बसून कार्यक्रम बघणे देखील अतिशय कठीण होते. संपूर्ण रत्नागिरीत स्वच्छता कार्यक्रम राबवणारी पालिका किमान कार्यक्रमाच्या वेळी तरी नाट्यगृहातील स्वच्छतागृहातील स्वच्छता का करत नाही ? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcultureसांस्कृतिक