शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

रत्नागिरी : कोकण कृषी विद्यापीठात पदवीदान समारंभ, विद्यापीठाचे दूत म्हणून काम करा : डॉ. नरेंद्रसिंह राठोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 17:32 IST

कृषीसाठी एकत्र मनुष्यबळ निर्मितीचे कार्य देशातील सर्व कृषी विद्यापीठे समाधानकारकपणे करत आहेत. या विद्यापीठांमधून पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचे दूत म्हणून शेतकऱ्यांसाठी काम केले पाहिजे. कृषी क्षेत्रामध्ये उद्योजक कसे निर्माण होतील, यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक (शिक्षण) डॉ. नरेंद्रसिंह राठोड यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देविद्यापीठाचे दूत म्हणून काम करा : डॉ. नरेंद्रसिंह राठोडदापोली कोकण कृषी विद्यापीठात पदवीदान समारंभ,

दापोली : कृषीसाठी एकत्र मनुष्यबळ निर्मितीचे कार्य देशातील सर्व कृषी विद्यापीठे समाधानकारकपणे करत आहेत. या विद्यापीठांमधून पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचे दूत म्हणून शेतकऱ्यांसाठी काम केले पाहिजे. कृषी क्षेत्रामध्ये उद्योजक कसे निर्माण होतील, यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक (शिक्षण) डॉ. नरेंद्रसिंह राठोड यांनी व्यक्त केले.दापोली डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ३७ व्या पदवीदान समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले की, कृषी पदवीधरांनी शेतकऱ्यांप्रति बांधिलकी आणि समर्पणाची भावना अंगी बाणवणे आवश्यक आहे. यातूनच भारतातील शेती आणि शेतकरी यांचा विकास होईल, असे सांगितले.

पदवीदान समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कृषी आणि फलोत्पादन मंत्री आणि विद्यापीठाचे प्रतिकुलपती पांडुरंग फुंडकर होते. यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. तपस भट्टाचार्य, अधिष्ठाता डॉ. सतीश नारखेडे, अधिष्ठाता डॉ. हुकुमसिंंग ढाकर, अधिष्ठाता डॉ. यशवंत खांदेतोड, कार्यकारी परिषद सदस्य संजय केळकर, संजय कदम, माजी कुलगुरु डॉ. किसन लवांडे, संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, डॉ. संजय भावे, डॉ. यु. व्ही. महाडकर, डॉ. एम. एम. बुरोंडकर, डॉ. केशव पुजारी, डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते.पदव्युत्तर स्नातकांमध्ये सन २०१५-१६ करिता चिन्मयी प्रसाद बाळ (कृषी), छाया राघो कवितकर (कृषी अभियांत्रिकी), सुभाश्री बिजय मोहपात्रा (उद्यानविद्या), सौरभ सुभाष कदम (कृषी जैवतंत्रज्ञान), उबेद कयुम (एम.एफ.एस्सी.), मिलिंद दिगंबर पाटील (वनशास्त्र) यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली. पदवी स्नातकांमध्ये सन २०१६-१७ वर्षासाठी श्रद्धा भास्कर सावंत (कृषी), टी. आर. बी. भाग्यलक्ष्मी (उद्यानविद्या), दामिनी व्ही. भारंबे (कृषी अभियांत्रिकी), अभिषेक संजय मुळ्ये, रवी अशोक चव्हाण (अन्न तंत्रज्ञान) अंजली काशिराम बी. आदम (कृषी), विनायक बबनराव पाटील (कृषी जैवतंत्रज्ञान), काजल अशोक पाटील (वनशास्त्र) यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली. सन २०१६-१७साठीचे ह्यअस्पीह्ण सुवर्णपदक श्रद्धा भास्कर सावंत (कृषी) आणि दामिनी व्ही. भारंबे (कृषी अभियांत्रिकी) यांना तर याच वर्षासाठीचे ह्यसर रॉबर्ट अ‍ॅलनह्ण सुवर्णपदक श्रद्धा भास्कर सावंत (कृषी) हिला प्रदान करण्यात आले.सन २०१५-१६साठीचे कै. जी. जी. ठाकरे सुवर्णपदक ए. मोहनकुमार (कृषी) तर याच वर्षासाठीचे हेक्झामार सुवर्णपदक निखत अन्वर तळघरकर (कृषी), सानिका संजय जोशी (कृषी), अश्विनी राजेंद्र चव्हाण (कृषी), चिन्मयी प्रसाद बाळ (कृषी) आणि सुभाश्री बिजय मोहपात्रा (कृषी) यांना प्रदान करण्यात आले.

सन २०१६-१७ साठीचे कै. मंदाकिनी सहस्त्रबुद्धे सुवर्णपदक कृष्णजा आर. नायर (कृषी) तर कै. अरुण नायकवाडी सुवर्णपदक श्वेता बसवराज कराडीपाटील (कृषी) विस्तार शिक्षण यांना बहाल करण्यात आले. 

टॅग्स :agricultureशेतीRatnagiriरत्नागिरी