शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

युपीआय पेमेंटमुळे सुट्या पैशांवरून होणारे वाद मिटले, एसटीच्या रत्नागिरी विभागाला किती उत्पन्न मिळाले.. वाचा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 16:26 IST

रत्नागिरी : तिकीट काढल्यानंतर सुट्या पैशांवरून एसटी बसमध्ये वाहक आणि प्रवाशांमध्ये हाेणारा वाद टाळण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने युपीआय ...

रत्नागिरी : तिकीट काढल्यानंतर सुट्या पैशांवरून एसटी बसमध्ये वाहक आणि प्रवाशांमध्ये हाेणारा वाद टाळण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने युपीआय पेमेंट प्रणाली सुरू केली आहे. यामुळे गाड्यांमध्ये हाेणारे वाद तुर्तास टळले असून, अवघ्या बारा दिवसात युपीआयद्वारे तिकीट काढल्यामुळे रत्नागिरी विभागाला २४ लाख ५६ हजाराचे उत्पन्न मिळाले आहे.एसटी गाड्यांमध्ये तिकीट काढताना सुट्या पैशांची कायम समस्या निर्माण हाेते. ही समस्या सोडविण्यासाठी एसटी महामंडळाने मोबाइलद्वारे ऑनलाइन व्यवहार करावेत, अशी मागणी प्रवाशांमधून सुरू हाेती. त्यानुसार महामंडळाने अँड्रॉइड इलेक्ट्रॉनिक तिकीट इशू मशीन (ईटीआयएम) सर्व आगारांना दोन महिन्यांपूर्वी उपलब्ध करून दिली आहे.

या प्रणालीमुळे प्रवासी युपीआय क्युआर कोडचा वापर करून तिकीट काढू शकतात. त्यामुळे जेवढे तिकीटाचे पैस तेवढेच पैसे देणे सुलभ झाले आहे. या प्रणालीमुळे सुट्या पैशांची भासणारी चणचण दूर झाली आहे.

तिकीट दर वाढण्यापूर्वीचे उत्पन्न (रुपयात)दिनांक         युपीआयद्वारे     पैसे देऊन२० जानेवारी     १.८०                ६२.००२१ जानेवारी     १.६४                ५७.७८२२ जानेवारी     १.४३                ५७.५८२३ जानेवारी     १.५४                ५५.५४२४ जानेवारी     १.२१                ५७.२५

तिकीट दर वाढल्यानंतर उत्पन्नदिनांक          युपीआयद्वारे   पैसे देऊन२५ जानेवारी     १.६२              ५९.९१२६ जानेवारी     २.९०              ६२.१०२७ जानेवारी     २.६९             ४९.२८२८ जानेवारी     २.१४              ६९.४९२९ जानेवारी     २.२६             ६३.३५३० जानेवारी     २.६९             ६३.२५३१ जानेवारी      २.६४            ६६.२१

सध्याच्या माहिती-तंत्रज्ञान युगात सर्वत्र रोकडविरहीत (कॅशलेस) व्यवहार केले जात आहेत. एसटी महामंडळातर्फेही प्रवाशांना कॅशलेस सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेला प्रवाशांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. - प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीpassengerप्रवासी