शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

रत्नागिरी जिल्ह्यात यंदा ७४०२ लोकांची पाण्यासाठी वणवण, शासनाची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 17:04 IST

रत्नागिरी जिल्ह्यात २९ गावातील ५६ वाड्यांमधील ७४०२ लोकांना भीषण पाणीटंचाईची झळ बसली असून, त्यांची पाण्यासाठी तडफड सुरु आहे. त्यांना ९ टँकर्सनी पाणीपुरवठा करण्यात येत असून, तोही अपुरा पडत असल्याने लोक हैराण झाले आहेत.

ठळक मुद्दे २९ गावातील ५६ वाड्यांमध्ये पाणीटंचाईकेवळ ९ टँकर्सद्वारे होतोय अपुरा पाणीपुरवठा

रत्नागिरी : जिल्ह्यात २९ गावातील ५६ वाड्यांमधील ७४०२ लोकांना भीषण पाणीटंचाईची झळ बसली असून, त्यांची पाण्यासाठी तडफड सुरु आहे. त्यांना ९ टँकर्सनी पाणीपुरवठा करण्यात येत असून, तोही अपुरा पडत असल्याने लोक हैराण झाले आहेत.टंचाईग्रस्त गावे व वाड्यांमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. भयंकर उकाडा होत असून, पाण्याची पातळी खालावली आहे. जिल्ह्यात गतवर्षी या दिवसांमध्ये ७८ गावातील १३५ वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई सुरु होती.

या टंचाईग्रस्तांना पाणीपुरवठा करताना शासनाची दमछाक झाली होती. मात्र, गतवर्षीची पाणी टंचाईची स्थिती पाहता यंदाची संख्या निम्म्यावर आली आहे. तरीही लोकांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरु आहे.मागील आठवड्यामध्ये जिल्ह्याच्या ४ तालुक्यांमध्ये २६ गावातील ५२ वाड्यांना भीषण पाणीटंचाई जाणवत होती़ त्यामध्ये खेडमध्ये १२ गावातील २१ वाड्यांमध्ये, चिपळुणातील ९ गावातील २२ वाड्यांमध्ये, संगमेश्वरात २ गावातील ६ वाड्यांना आणि लांजात ३ गावातील ३ वाड्यांचा समावेश होता.

या टंचाईग्रस्तांना प्रशासनाकडून ८ टँकर्सनी पाणीपुरवठा करण्यात होता. दिवसेंदिवस वाढणाऱ्या उष्म्याचा परिणाम येथील पाणीसाठ्यावर होत असून, टंचाईग्रस्तांची संख्या वाढत आहे.

चालू आठवड्यात खेड तालुक्यामध्ये २ गावातील ३ वाड्यांची, तर संगमेश्वरमध्ये १ एका गावातील एका वाडीची टंचाईग्रस्तांमध्ये भर पडली आहे. या टंचाईग्रस्तांना शासनाकडून केवळ ९ टँकरनी पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, तोही अपुरा पडत आहे.पाण्यासाठी भटकंतीदरवर्षी पाणीटंचाई उद्भवते़ या टंचाईग्रस्तांमध्ये धनगरवाड्यांचा समावेश आहे़ डोंगरदऱ्यात वसलेल्या धनगरवाड्यांतील लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.जनावरे तडफडू लागलीजनावरांना देण्यासाठी पाणी नसल्याने ती तडफडू लागली आहेत़ उन्हामुळे पाण्याची पातळी खालावल्याने विहिरी, ओढे, नाले आटल्याने ही परिस्थिती ओढवली.तीव्रता जास्तगेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीटंचाईचे प्रमाण कमी असले तरी तीव्रता मात्र जास्त आहे. खेड तालुक्यात तर काही किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणी