शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
2
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
3
"बेबी, आय लव्ह यू, तू खूप...", स्वयंघोषित बाबा रात्रभर पाठवायचा अश्लील मेसेज, ३५ मुलींचा छळ
4
डोळ्यांत मिरची पूड ओतली, नंतर साडीने लेकाचा गळा आवळला अन्...; जन्मदात्री आई इतकी क्रूर का झाली?
5
जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती लॅरी एलिसन ९५% संपत्ती दान करणार; काय आहे अट?
6
कमाल झाली राव! आता QR कोड नाही, तर फक्त अंगठ्याने करा पेमेंट; काय आहे ThumbPay?
7
भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी...
8
मुंबई पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूचं गूढ उकललं; ४ महिन्यांनी हत्येचा खुलासा, 'त्या' पत्रावर संशय
9
बाहुबली नेते राजा भैय्या यांच्या मुलांनी आईवर केले गंभीर आरोप, म्हणाले, "आमच्या घरात…’’  
10
ललिता पंचमी व्रत २०२५: शुक्रवारी इच्छापूर्तीसाठी 'असे' करा ललिता पंचमीचे व्रत; टाळा 'ही' एक चूक!
11
"हो मला बाबा व्हायचंय...", ५९व्या वर्षी सलमान खानला हवंय मूल, म्हणाला...
12
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
13
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
14
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
15
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
16
"पैशाचं सोंग आणता येत नाही, मग सरकार शेतकऱ्यांना जीवन संपवू देणार का?’’, विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
17
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
18
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
19
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
20
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका

रत्नागिरी जिल्ह्यात यंदा ७४०२ लोकांची पाण्यासाठी वणवण, शासनाची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 17:04 IST

रत्नागिरी जिल्ह्यात २९ गावातील ५६ वाड्यांमधील ७४०२ लोकांना भीषण पाणीटंचाईची झळ बसली असून, त्यांची पाण्यासाठी तडफड सुरु आहे. त्यांना ९ टँकर्सनी पाणीपुरवठा करण्यात येत असून, तोही अपुरा पडत असल्याने लोक हैराण झाले आहेत.

ठळक मुद्दे २९ गावातील ५६ वाड्यांमध्ये पाणीटंचाईकेवळ ९ टँकर्सद्वारे होतोय अपुरा पाणीपुरवठा

रत्नागिरी : जिल्ह्यात २९ गावातील ५६ वाड्यांमधील ७४०२ लोकांना भीषण पाणीटंचाईची झळ बसली असून, त्यांची पाण्यासाठी तडफड सुरु आहे. त्यांना ९ टँकर्सनी पाणीपुरवठा करण्यात येत असून, तोही अपुरा पडत असल्याने लोक हैराण झाले आहेत.टंचाईग्रस्त गावे व वाड्यांमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. भयंकर उकाडा होत असून, पाण्याची पातळी खालावली आहे. जिल्ह्यात गतवर्षी या दिवसांमध्ये ७८ गावातील १३५ वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई सुरु होती.

या टंचाईग्रस्तांना पाणीपुरवठा करताना शासनाची दमछाक झाली होती. मात्र, गतवर्षीची पाणी टंचाईची स्थिती पाहता यंदाची संख्या निम्म्यावर आली आहे. तरीही लोकांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरु आहे.मागील आठवड्यामध्ये जिल्ह्याच्या ४ तालुक्यांमध्ये २६ गावातील ५२ वाड्यांना भीषण पाणीटंचाई जाणवत होती़ त्यामध्ये खेडमध्ये १२ गावातील २१ वाड्यांमध्ये, चिपळुणातील ९ गावातील २२ वाड्यांमध्ये, संगमेश्वरात २ गावातील ६ वाड्यांना आणि लांजात ३ गावातील ३ वाड्यांचा समावेश होता.

या टंचाईग्रस्तांना प्रशासनाकडून ८ टँकर्सनी पाणीपुरवठा करण्यात होता. दिवसेंदिवस वाढणाऱ्या उष्म्याचा परिणाम येथील पाणीसाठ्यावर होत असून, टंचाईग्रस्तांची संख्या वाढत आहे.

चालू आठवड्यात खेड तालुक्यामध्ये २ गावातील ३ वाड्यांची, तर संगमेश्वरमध्ये १ एका गावातील एका वाडीची टंचाईग्रस्तांमध्ये भर पडली आहे. या टंचाईग्रस्तांना शासनाकडून केवळ ९ टँकरनी पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, तोही अपुरा पडत आहे.पाण्यासाठी भटकंतीदरवर्षी पाणीटंचाई उद्भवते़ या टंचाईग्रस्तांमध्ये धनगरवाड्यांचा समावेश आहे़ डोंगरदऱ्यात वसलेल्या धनगरवाड्यांतील लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.जनावरे तडफडू लागलीजनावरांना देण्यासाठी पाणी नसल्याने ती तडफडू लागली आहेत़ उन्हामुळे पाण्याची पातळी खालावल्याने विहिरी, ओढे, नाले आटल्याने ही परिस्थिती ओढवली.तीव्रता जास्तगेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीटंचाईचे प्रमाण कमी असले तरी तीव्रता मात्र जास्त आहे. खेड तालुक्यात तर काही किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणी