शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने फिरवली पाठ, पाणी नियोजनाची अवघड वाट

By शोभना कांबळे | Updated: August 29, 2023 15:47 IST

ऊन-पावसाचा खेळ सुरू

रत्नागिरी : यंदा पावसाने सुरुवातीपासूनच नागरिकांच्या तोंडचे पाणी पळविण्यास सुरुवात केली होती. यंदा आगमनच उशिरा झाले. मात्र, जून आणि जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पावसाची पाठच होती. मात्र, जुलै मध्यंतरानंतर पावसाने काही दिवस मुसळधार पडून पहिल्या दोन महिन्यांचा कोटा पूर्ण केला. मात्र, ऑगस्ट संपत आल्याने आता जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांची सरासरी गाठणे अवघड वाटत आहे. पावसाची सध्याची वाटचाल पाहता भविष्यात पाणी नियोजनाची वाट अवघड होणार असल्याचे दिसत आहे.गेल्यावर्षी पावसाने उशिरा सुरुवात केली असली तरी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे वार्षिक सरासरीच्या ७६ टक्के पाऊस ऑगस्ट महिन्यात, तर ८९ टक्के पाऊस सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत नोंदविला गेला होता. यंदा मान्सूनचे आगमनच उशिरा झाले. परंतु जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात मुसळधार पडलेल्या पावसाने जून आणि जुलै या दोन महिन्यांची सरासरी ओलांडली. मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण एकदमच कमी झाले आहे. जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात साधारणत: ८२९ मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, यंदा ऑगस्ट महिना संपत आला आहे. या महिन्यात केवळ ३७१ मिलिमीटर पाऊस पडला आहे.हवामान खात्याकडून पाऊस कोकणात पुन्हा परतणार असल्याचा अंदाज अधूनमधन व्यक्त होत असला तरी पावसाची हुलकावणी कायम आहे. मात्र, सध्या उन्हाळ्याच्या हंगामासारखे ऊन पडू लागले आहे. उष्माही वाढू लागला आहे. मात्र, पावसाची पाठच आहे. मधूनच श्रावणातील ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. सोमवारी दिवसभरात पावसाच्या सरी जोरदार कोसळल्या. पण या सरीनंतर पुन्हा तेवढेच कडाक्याचे ऊन पडत होते. त्यामुळे पावसाचा लहरीपणा वाढू लागला आहे.

तीन महिन्यांत ७४ टक्केजून ते सप्टेंबर हे चार महिने कोकणात पावसाचे मानले जातात. या चार महिन्यांच्या कालावधीत जून महिन्यात साधारणत: ८१८ मिलिमीटर, जुलै महिन्यात १२८६, ऑगस्ट महिन्यात ८२९ आणि सप्टेंबर महिन्यात ४२९ मिलिमीटर असा एकूण ३३६४ मिलिमीटर पाऊस पडतो. गेल्या तीन महिन्यांत वार्षिक सरासरीच्या ७४ टक्के पाऊस आतापर्यंत झाला आहे. त्यामुळे २५ टक्के पाऊस सप्टेंबरपर्यंत पडेल का? अशी शंका वाटत आहे.

गेल्या वर्षीही पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली नव्हती. गेल्या वर्षी २९९१ मिलिमीटर पाऊस झाला होता. त्यामुळे पाणी टंचाई लवकर निर्माण झाली. गेल्या वर्षी ऑगस्टपर्यंत २५६७ इतका पाऊस झाला होता. त्यातुलनेने यंदा पाऊस कमीच आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊस