शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

पावसाने फिरवली पाठ, पाणी नियोजनाची अवघड वाट

By शोभना कांबळे | Updated: August 29, 2023 15:47 IST

ऊन-पावसाचा खेळ सुरू

रत्नागिरी : यंदा पावसाने सुरुवातीपासूनच नागरिकांच्या तोंडचे पाणी पळविण्यास सुरुवात केली होती. यंदा आगमनच उशिरा झाले. मात्र, जून आणि जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पावसाची पाठच होती. मात्र, जुलै मध्यंतरानंतर पावसाने काही दिवस मुसळधार पडून पहिल्या दोन महिन्यांचा कोटा पूर्ण केला. मात्र, ऑगस्ट संपत आल्याने आता जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांची सरासरी गाठणे अवघड वाटत आहे. पावसाची सध्याची वाटचाल पाहता भविष्यात पाणी नियोजनाची वाट अवघड होणार असल्याचे दिसत आहे.गेल्यावर्षी पावसाने उशिरा सुरुवात केली असली तरी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे वार्षिक सरासरीच्या ७६ टक्के पाऊस ऑगस्ट महिन्यात, तर ८९ टक्के पाऊस सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत नोंदविला गेला होता. यंदा मान्सूनचे आगमनच उशिरा झाले. परंतु जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात मुसळधार पडलेल्या पावसाने जून आणि जुलै या दोन महिन्यांची सरासरी ओलांडली. मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण एकदमच कमी झाले आहे. जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात साधारणत: ८२९ मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, यंदा ऑगस्ट महिना संपत आला आहे. या महिन्यात केवळ ३७१ मिलिमीटर पाऊस पडला आहे.हवामान खात्याकडून पाऊस कोकणात पुन्हा परतणार असल्याचा अंदाज अधूनमधन व्यक्त होत असला तरी पावसाची हुलकावणी कायम आहे. मात्र, सध्या उन्हाळ्याच्या हंगामासारखे ऊन पडू लागले आहे. उष्माही वाढू लागला आहे. मात्र, पावसाची पाठच आहे. मधूनच श्रावणातील ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. सोमवारी दिवसभरात पावसाच्या सरी जोरदार कोसळल्या. पण या सरीनंतर पुन्हा तेवढेच कडाक्याचे ऊन पडत होते. त्यामुळे पावसाचा लहरीपणा वाढू लागला आहे.

तीन महिन्यांत ७४ टक्केजून ते सप्टेंबर हे चार महिने कोकणात पावसाचे मानले जातात. या चार महिन्यांच्या कालावधीत जून महिन्यात साधारणत: ८१८ मिलिमीटर, जुलै महिन्यात १२८६, ऑगस्ट महिन्यात ८२९ आणि सप्टेंबर महिन्यात ४२९ मिलिमीटर असा एकूण ३३६४ मिलिमीटर पाऊस पडतो. गेल्या तीन महिन्यांत वार्षिक सरासरीच्या ७४ टक्के पाऊस आतापर्यंत झाला आहे. त्यामुळे २५ टक्के पाऊस सप्टेंबरपर्यंत पडेल का? अशी शंका वाटत आहे.

गेल्या वर्षीही पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली नव्हती. गेल्या वर्षी २९९१ मिलिमीटर पाऊस झाला होता. त्यामुळे पाणी टंचाई लवकर निर्माण झाली. गेल्या वर्षी ऑगस्टपर्यंत २५६७ इतका पाऊस झाला होता. त्यातुलनेने यंदा पाऊस कमीच आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊस