शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
3
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
4
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
5
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
6
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
7
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
8
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
9
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
10
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
11
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
12
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
13
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
14
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
15
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
16
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
17
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
18
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
19
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
20
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?

रत्नागिरी : झाडाझडतीमुळे फळबाग लागवडीला वेग, जिल्हाधिकाऱ्यांचा जिल्हा दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 14:49 IST

जिल्हाधिकारी प्रदीप पी. आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांनी सर्व तालुक्यांमध्ये तीन दिवसांचा दौरा करून फळबाग लागवडीचा आढावा घेतला. तसेच येथील यंत्रणांच्या समस्या समजून घेतल्या. त्यामुळे आता लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ होण्यास सुरूवात झाली आहे.

ठळक मुद्देझाडाझडतीमुळे फळबाग लागवडीला वेग, जिल्हाधिकाऱ्यांचा जिल्हा दौरा दहा हजार हेक्टरवर लागवडीसाठी १५ हजार शेतकरी सकारात्मक

रत्नागिरी : जिल्हाधिकारी प्रदीप पी. आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांनी सर्व तालुक्यांमध्ये तीन दिवसांचा दौरा करून फळबाग लागवडीचा आढावा घेतला. तसेच येथील यंत्रणांच्या समस्या समजून घेतल्या. त्यामुळे आता लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. १० हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यास जिल्ह्यातील १५ हजार ३१० शेतकऱ्यांनी सकारात्मकता दर्शविली आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थेत रोजगारनिर्मिती व गुंतवणूक वाढविण्यासाठी कोकण विभागामध्ये फळबाग लागवडीला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी गतवर्षापासून फळबाग लागवडीला प्राधान्य दिले असून, त्याच्या प्रभावी अंमलबजावणीला प्रारंभ केला आहे.

तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या मदतीने सुव्यस्थित नियोजन करून ही योजना त्यांनी जिल्ह्यात व्यापक प्रमाणावर राबविण्यास सुरूवात केली. गतवर्षी लागवडीसाठी १० हजार हेक्टर क्षेत्र निर्धारित करण्यात आले होते. क्षेत्रिय स्तरावर अधिकारी व कर्मचारी यांच्या सुयोग्य समन्वयातून यासाठी लाभार्थी निवडण्यात यशही आले. मात्र, काजू कलमांच्या तुटवड्यामुळे प्रत्यक्ष पाच हजार हेक्टर क्षेत्रावरच लागवड करण्यात आली.गतवर्षाचा अनुभव लक्षात घेऊन यावर्षी प्रदीप पी. आणि त्यांच्या चमूने २०१८-१९ सालासाठी दहा हजार हेक्टर क्षेत्रासाठी पुरेशी रोपे उपलब्ध होण्यासाठी सुयोग्य नियोजन केले व लाभार्थी निवडीसाठी सुरूवातही केली आहे. या फळबाग लागवडीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी नऊ तालुक्यांचा दौरा केला.

या दौऱ्यात त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. एस. जगताप, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आरिफ शहा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) राजेंद्र अहिरे सहभागी झाले होते.

यावेळी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी दिरंगाई करणाऱ्या स्थानिक कर्मचाऱ्यांना धारेवर धरताना चांगले काम करणाऱ्या ग्रामसेवक, कृषी सहायक, ग्रामरोजगार सेवक, सरपंच यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन दिले.या दौऱ्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीला वेग आला आहे. त्यामुळे योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या वाढू लागली असून, १५ हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी लागवडीसाठी सकारात्मकता दर्शविली आहे.२ लाख हेक्टर पडिकजिल्ह्यातील एकूण ८ लाख हेक्टर क्षेत्रापैकी दोन लाख हेक्टर क्षेत्र पडिक आहे. सध्या जिल्ह्यात ९१ हजार हेक्टरवर काजू तर ६० हजार हेक्टरवर आंब्याची लागवड करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्हा हापूस आंबा व काजू या फळपिकांच्या गुणवत्तेत व उत्पादकतेत राज्यात अव्वलस्थानी आहे. त्यामुळे पडिक असलेल्या २ लाख हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीसाठी वाव आहे.जिल्ह्यात १०० कोटी होणार गुंतवणूकदहा हजार हेक्टरवर आवश्यक असलेल्या रोपांची उपलब्धता, अनुकुल पाऊस व हिरीरीने योजना राबविणारी स्थानिक स्तरावरील यंत्रणा यांच्या समन्वयातून ही लागवड यशस्वी झाल्यास प्रतिहेक्टरी सुमारे १ लाख ७० हजार याप्रमाणे तीन वर्षांच्या कालावधीत शेतकऱ्यांच्या जमिनीवर फळबाग लागवडीतून जिल्ह्यात सुमारे १०० कोटी एवढी गुंतवणूक पुढील तीन वर्षांच्या काळात होणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्याची गरज आहे. 

टॅग्स :agricultureशेतीRatnagiriरत्नागिरी