शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

राज्याच्या रिकव्हरीपेक्षा रत्नागिरी जिल्हा अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 17:56 IST

corona virus, Hospital, Ratnagirinews वेळेवर निदान, योग्य उपचार आणि रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा वेळेवर शोध घेणे यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या रिकव्हरीचे प्रमाण चांगले आहे. नवीन रुग्णांचा कमी होत जाणारा वेग हेही त्याचे महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळेच रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्णांच्या रिकव्हरीचे प्रमाण राज्याच्या प्रमाणापेक्षा अधिक आहे.

ठळक मुद्देराज्याच्या रिकव्हरीपेक्षा रत्नागिरी जिल्हा अव्वलवेळेवर निदान, योग्य उपचार आणि रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा वेळेवर शोध

मनोज मुळ्येरत्नागिरी : वेळेवर निदान, योग्य उपचार आणि रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा वेळेवर शोध घेणे यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या रिकव्हरीचे प्रमाण चांगले आहे. नवीन रुग्णांचा कमी होत जाणारा वेग हेही त्याचे महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळेच रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्णांच्या रिकव्हरीचे प्रमाण राज्याच्या प्रमाणापेक्षा अधिक आहे.राज्याचे रिकव्हरीचे प्रमाण ९२.४९ टक्के असून, रत्नागिरी जिल्ह्याचे प्रमाण ९४.३६ टक्के आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मार्च महिन्यात पहिला कोरोना रुग्ण सापडला. मार्चपासून जूनपर्यंत रुग्णवाढीचा वेग खूपच कमी होता.

ज्यावेळी जिल्ह्यांच्या सीमांवरील बंदी उठवण्यात आली, तेव्हा मोठ्या प्रमाणात परजिल्ह्यातील विशेषत: मुंबईतील कोकणवासीय रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले. त्यामुळे जुलै महिन्यापासून हा वेग वाढू लागला.जुलै महिन्यात १,२१२ रुग्ण सापडले होते. मात्र, ऑगस्टमध्ये ही संख्या २,१०६ इतकी झाली. सप्टेंबर महिन्यात तब्बल ३४७६ रुग्ण सापडले. ऑक्टोबर महिन्यापासून ही संख्या कमी झाली.तपासण्या वाढू लागल्यानंतर रत्नागिरीत स्वॅब टेस्टिंग लॅब सुरू करण्यात आली. त्यामुळे निदान लवकर होऊ लागले. निदान वेळेवर होत असल्याने रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना शोधण्याला गती देण्यात आली. त्यावेळी फक्त रत्नागिरी जिल्हा रुग्णालय हेच कोविड रुग्णालय होते. मात्र, जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये रुग्ण सापडत असल्याने कोविड रुग्णालयांची संख्या वाढवण्यात आली.

प्रत्येक तालुक्यात कोविड रुग्णालय झाल्याने उपचारांना गती आली. एका बाजूला जलद उपचार आणि दुसऱ्या बाजूला कमी झालेले रुग्ण यामुळे कोरोना रिकव्हरीचे प्रमाण चांगल्या पद्धतीने वाढू लागले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलRatnagiriरत्नागिरी