शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

राज्याच्या रिकव्हरीपेक्षा रत्नागिरी जिल्हा अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 17:56 IST

corona virus, Hospital, Ratnagirinews वेळेवर निदान, योग्य उपचार आणि रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा वेळेवर शोध घेणे यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या रिकव्हरीचे प्रमाण चांगले आहे. नवीन रुग्णांचा कमी होत जाणारा वेग हेही त्याचे महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळेच रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्णांच्या रिकव्हरीचे प्रमाण राज्याच्या प्रमाणापेक्षा अधिक आहे.

ठळक मुद्देराज्याच्या रिकव्हरीपेक्षा रत्नागिरी जिल्हा अव्वलवेळेवर निदान, योग्य उपचार आणि रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा वेळेवर शोध

मनोज मुळ्येरत्नागिरी : वेळेवर निदान, योग्य उपचार आणि रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा वेळेवर शोध घेणे यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या रिकव्हरीचे प्रमाण चांगले आहे. नवीन रुग्णांचा कमी होत जाणारा वेग हेही त्याचे महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळेच रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्णांच्या रिकव्हरीचे प्रमाण राज्याच्या प्रमाणापेक्षा अधिक आहे.राज्याचे रिकव्हरीचे प्रमाण ९२.४९ टक्के असून, रत्नागिरी जिल्ह्याचे प्रमाण ९४.३६ टक्के आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मार्च महिन्यात पहिला कोरोना रुग्ण सापडला. मार्चपासून जूनपर्यंत रुग्णवाढीचा वेग खूपच कमी होता.

ज्यावेळी जिल्ह्यांच्या सीमांवरील बंदी उठवण्यात आली, तेव्हा मोठ्या प्रमाणात परजिल्ह्यातील विशेषत: मुंबईतील कोकणवासीय रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले. त्यामुळे जुलै महिन्यापासून हा वेग वाढू लागला.जुलै महिन्यात १,२१२ रुग्ण सापडले होते. मात्र, ऑगस्टमध्ये ही संख्या २,१०६ इतकी झाली. सप्टेंबर महिन्यात तब्बल ३४७६ रुग्ण सापडले. ऑक्टोबर महिन्यापासून ही संख्या कमी झाली.तपासण्या वाढू लागल्यानंतर रत्नागिरीत स्वॅब टेस्टिंग लॅब सुरू करण्यात आली. त्यामुळे निदान लवकर होऊ लागले. निदान वेळेवर होत असल्याने रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना शोधण्याला गती देण्यात आली. त्यावेळी फक्त रत्नागिरी जिल्हा रुग्णालय हेच कोविड रुग्णालय होते. मात्र, जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये रुग्ण सापडत असल्याने कोविड रुग्णालयांची संख्या वाढवण्यात आली.

प्रत्येक तालुक्यात कोविड रुग्णालय झाल्याने उपचारांना गती आली. एका बाजूला जलद उपचार आणि दुसऱ्या बाजूला कमी झालेले रुग्ण यामुळे कोरोना रिकव्हरीचे प्रमाण चांगल्या पद्धतीने वाढू लागले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलRatnagiriरत्नागिरी