शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘कोमसाप’चे सप्टेंबरमध्ये जिल्हा साहित्य संमेलन, रत्नागिरी जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी जाहीर

By अरुण आडिवरेकर | Updated: July 24, 2023 15:54 IST

रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे येत्या सप्टेंबरमध्ये रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलन आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, ...

रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे येत्या सप्टेंबरमध्ये रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलन आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, कोमसापच्या रत्नागिरी जिल्ह्याची नवीन कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली आहे.कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रत्नागिरी जिल्हा मंडळाची कार्यकारिणी सभा जिल्हाध्यक्ष प्रा. आनंद शेलार यांच्या अध्यक्षतेखाली आणि कोमसापचे विश्वस्त प्रमुख रमेश कीर, विश्वस्त अरुण नेरुरकर, केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, गजानन तथा आबा पाटील, कार्यवाह माधव अंकलगे, कोकण मराठी साहित्य परिषद युवाशक्तीचे जिल्हाध्यक्ष अरुण मोर्ये यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी झालेल्या रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीला जिल्ह्यातील शाखांचे अध्यक्ष, जिल्हा प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर म्हणाल्या की, नव्या कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यात कोमसापचे कार्य कसे वाढेल यादृष्टीने प्रयत्नशील राहण्याची आवश्यकता आहे. वर्षभरात विविध कार्यक्रमांचे नियोजन करून जिल्ह्यातील साहित्यिकांना कोमसापच्या प्रवाहात आणण्यासाठी काम करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. नूतन अध्यक्ष आनंद शेलार यांनी जिल्ह्यात कोमसापचे संघटन मजबूत करण्याचे काम यापुढील काळात करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला.विश्वस्त प्रमुख रमेश कीर आणि अरुण नेरुरकर यांनीही मार्गदर्शन करताना कोमसापने आतापर्यंत मोठ्या प्रमाणात साहित्य चळवळ प्रवाहित ठेवण्यासाठी कार्य केले आहे. भविष्यात कोमसापच्या कार्यकर्त्यांनी नकारात्मक बाबीकडे दुर्लक्ष करून सकारात्मक विचाराने प्रेरित होऊन कार्य करताना युवा पिढीला प्राधान्य दिले पाहिजे, असे सांगितले.या सभेला लांजा शाखाध्यक्ष रामचंद्र जाधव, राजेश गोसावी, गुहागर शाखाध्यक्ष शाहिद खेरडकर, गुहागर शाखेचे प्रा. बाळासाहेब लबडे, राजापूरचे विनोद मिरगुले, खेडचे गोविंद राठोड, मालगुंड शाखेच्या अध्यक्षा नलिनी खेर, मालगुंड शाखेचे प्रतिनिधी गजानन पाटील, रत्नागिरी शाखेचे सचिव सुनील चव्हाण, खेड शाखेचे जलील राजपूरकर उपस्थित होते. राजापूर शाखाध्यक्ष वासुदेव तुळसणकर आणि रत्नागिरी शाखा अध्यक्षा तेजा मुळ्ये यांनी सभेतील निर्णयांना पाठिंबा असल्याचे लेखी पत्राद्वारे कळविले होते. केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे यांनी आभार मानले.

नूतन कार्यकारिणीउपाध्यक्ष - गोविंद राठोड, वासुदेव तुळसणकर, सचिव - राजेश गोसावी, सहसचिव - विनोद मिरगुले, खजिनदार- शाहिद खेरडकर, केंद्रीय प्रतिनिधी- बाळासाहेब लबडे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीkonkanकोकण