शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
2
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
3
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
4
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
5
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
6
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
7
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
8
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
9
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
10
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
11
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
12
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
13
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
14
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
15
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
16
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
17
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
18
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
19
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
20
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला, बावनदीने धोक्याची पातळी ओलांडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 11:43 IST

अरबी समुद्र व उत्तर महाराष्ट्राच्या परिसरात झालेल्या चक्राकार वाऱ्यामुळे कोकणात वादळी वाऱ्यासह धुवाँधार पाऊस पडत आहे. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे कोसळली, विद्युत खांब उन्मळून पडले आहेत.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला, बावनदीने धोक्याची पातळी ओलांडलीराजापुरात महामार्गावरील वाहतूक बंदअ, अनेकभागातील वीज गायब

रत्नागिरी : अरबी समुद्र व उत्तर महाराष्ट्राच्या परिसरात झालेल्या चक्राकार वाऱ्यामुळे कोकणात वादळी वाऱ्यासह धुवाँधार पाऊस पडत आहे. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे कोसळली, विद्युत खांब उन्मळून पडले आहेत.

पावसामुळे कोकणातील नदीनाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात पहाटेपासून पावसाचा जोर वाढला असून, महामार्गावरील बावनदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने वाहतूक थांबवली आहे.

गेल्या काही दिवसापासून कोकणातील काही भागात पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र, सोमवारपासून जिल्ह्यात वादळीवाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडत आहे. बुधवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढला आहे.चोवीस तास होऊन गेले तरी चांदेराई बाजारपेठेतील पाणी कमी होण्याची चिन्हे नाहीत. मंगळवारी सकाळी बाजारपेठेत पाणी शिरण्यास सुरुवात झाली ते दुपारी १२ वाजेपर्यंत पाण्याची पातळी वाढत होती. रात्री ओहोटीच्या वेळेस रात्री १ वाजल्यानंतर थोडे पाणी कमी झाले. परंतु आता पुन्हा पहाटे ६ वाजता अचानक पुन्हा पाण्याचा वेग वाढला असून, पाण्याची पातळी अधिक असून, पाणी खूप वेगात वाढत असल्याने चांदेराई, हरचिरी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.राजापूर शहरातील अर्जुना नदीवरील पूल धोकादायक असल्याने मंगळवारी रात्रीपासून मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर राजापूर शहरातील अर्जुना नदीवरील पूल धोकादायक असल्याने मंगळवारी रात्री आठ वाजता पुलावरी वाहतूक बंद करण्यात आली होती.

 

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी