शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला, बावनदीने धोक्याची पातळी ओलांडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 11:43 IST

अरबी समुद्र व उत्तर महाराष्ट्राच्या परिसरात झालेल्या चक्राकार वाऱ्यामुळे कोकणात वादळी वाऱ्यासह धुवाँधार पाऊस पडत आहे. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे कोसळली, विद्युत खांब उन्मळून पडले आहेत.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला, बावनदीने धोक्याची पातळी ओलांडलीराजापुरात महामार्गावरील वाहतूक बंदअ, अनेकभागातील वीज गायब

रत्नागिरी : अरबी समुद्र व उत्तर महाराष्ट्राच्या परिसरात झालेल्या चक्राकार वाऱ्यामुळे कोकणात वादळी वाऱ्यासह धुवाँधार पाऊस पडत आहे. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे कोसळली, विद्युत खांब उन्मळून पडले आहेत.

पावसामुळे कोकणातील नदीनाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात पहाटेपासून पावसाचा जोर वाढला असून, महामार्गावरील बावनदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने वाहतूक थांबवली आहे.

गेल्या काही दिवसापासून कोकणातील काही भागात पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र, सोमवारपासून जिल्ह्यात वादळीवाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडत आहे. बुधवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढला आहे.चोवीस तास होऊन गेले तरी चांदेराई बाजारपेठेतील पाणी कमी होण्याची चिन्हे नाहीत. मंगळवारी सकाळी बाजारपेठेत पाणी शिरण्यास सुरुवात झाली ते दुपारी १२ वाजेपर्यंत पाण्याची पातळी वाढत होती. रात्री ओहोटीच्या वेळेस रात्री १ वाजल्यानंतर थोडे पाणी कमी झाले. परंतु आता पुन्हा पहाटे ६ वाजता अचानक पुन्हा पाण्याचा वेग वाढला असून, पाण्याची पातळी अधिक असून, पाणी खूप वेगात वाढत असल्याने चांदेराई, हरचिरी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.राजापूर शहरातील अर्जुना नदीवरील पूल धोकादायक असल्याने मंगळवारी रात्रीपासून मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर राजापूर शहरातील अर्जुना नदीवरील पूल धोकादायक असल्याने मंगळवारी रात्री आठ वाजता पुलावरी वाहतूक बंद करण्यात आली होती.

 

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी