शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयामुळे मिळाली तीन नवजात शिशूंना नवदृष्टी

By शोभना कांबळे | Updated: July 18, 2023 13:22 IST

‘आरबीएसके’ आणि ‘डीआयई’ कार्यक्रमाअंतर्गत अवघड शस्त्रक्रिया

शोभना कांबळेरत्नागिरी : नवजात शिशूंच्या चाचण्या वेळेवर झाल्या तर त्यांच्यातील कायमचे अंधत्व दूर होऊ शकते. अशाच तीन नवजात बालकांना येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात योग्य उपचार मिळाल्याने त्यांच्यात येणारे कायमस्वरूपी अंधत्व टळले आहे. यात मध्य प्रदेशातील कामगाराच्या बालकाचा व रत्नागिरीतील दोन बालकांचा समावेश आहे.रत्नागिरीतील दोन महिलांची जिल्हा शासकीय रुग्णालयात नाॅर्मल प्रसूती झाली, तर मध्यप्रदेशातून कामानिमित्त दापोलीत असलेल्या एका कामगाराच्या पत्नीची दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात नाॅर्मल प्रसूती झाली होती. दोन किलोंपेक्षा कमी वजन असल्याने या बाळांच्या रुग्णालयाच्या ‘डीईआयसी’ कार्यक्रमाअंतर्गत कानासाठी ‘OAE’ आणि दृष्टीसाठी ‘ROP’ या चाचण्या करण्यात आल्या. यावेळी या बालकांमध्ये तीव्र दृष्टिदोष आढळला. या बालकांना जिल्हा रुग्णालयाच्या विशेष नवजात शिशू काळजी कक्षात (एसएनसीयू) ठेवून त्यांच्यावर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य (आरबीएसके) आणि ‘डीआयई’ कार्यक्रमाअंतर्गत उपचार करण्याचा निर्णय जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. संघमित्रा फुले यांनी घेतला.या बाळांच्या डोळ्यांवर आवश्यक ती शस्त्रक्रिया करणे अवघड आणि आव्हानात्मक होते. त्यासाठी आवश्यक असलेले ११ हजार रुपयांचे इंजेक्शन सहजासहजी उपलब्ध होत नाही; मात्र महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेतून हे इंजेक्शन मोफत उपलब्ध झाले. ‘आरबीएसके’ आणि ‘डीआयई’ या कार्यक्रमाअंतर्गत डाॅ. प्रतिभा छछडी (रेटिनातज्ज्ञ) यांनी तातडीने या बालकांवर उपचार केले. त्यामुळे या बालकांना कायमस्वरूपी अंधत्वापासून वाचविणे शक्य झाले.या बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया व उपचार केल्यानंतर सोमवारी त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. यावेळी या मातांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते. या बाळांसाठी परिश्रम घेतलेल्या जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. संघमित्रा फुले, बालरोगतज्ज्ञ डाॅ. विजय सूर्यगंध, एसएनसीयू इन्चार्ज़ सुवर्णा कदम, तसेच जिल्हा रुग्णालयाची संपूर्ण टीम यांना या मातांनी धन्यवाद दिले.

ROP (Retinopathy Of Prematurity) म्हणजे काय?२ किलोंपेक्षा कमी वजनाच्या आणि मुदतपूर्व जन्मलेल्या बालकांमध्ये आढळणारा नेत्रविकार. डोळ्यांच्या अंत:पटलावरील रक्तवाहिन्यांची वाढ अपूर्ण असते. बाळ आजारी पडल्यास ROP या आजारामुळे कायमचे अंधत्व येऊ शकते.

या बालकांवर ‘आरबीएसके’ आणि ‘डीआयई’अंतर्गत तत्काळ इंजेक्शन उपलब्ध होऊन योग्य वेळी उपचार मिळाल्यामुळे या बालकांना कायमस्वरूपी अंधत्वापासून वाचविता आले. आतापर्यंत आठ नवजात बालकांना नवदृष्टी मिळाली आहे. - डाॅ. संघमित्रा फुले-गावडे, जिल्हा शल्यचिकित्सक, रत्नागिरी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhospitalहॉस्पिटल