शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
2
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट
3
पाकिस्तानच्या अडचणी वाढणार! कर्ज दिल्यानंतर IMFने दिला इशारा; ११ अटींचे पालनही बंधनकारक
4
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आता केवळ या दोन नावांची चर्चा, तर्कवितर्कांना उधाण, कधी होणार घोषणा  
5
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
6
“‘नरकातला स्वर्ग’चे श्रेय स्वप्ना पाटकरांना, संजय राऊत देशसेवेसाठी तुरुंगात गेले नव्हते”
7
ऑटो जगतात खळबळ! निस्सान भारतासह जगभरातील प्रकल्प बंद करण्याच्या तयारीत; पैकी जपानमधील दोन... 
8
भारतीय सैन्याच्या शौर्याला, धाडसाला कांदिवलीच्या नागरिकांचा सलाम; काढली 'तिरंगा पदयात्रा'
9
PM मोदींचा एअरबेस दौरा, डेलीगेशन अन् चॅनेल बॅन...शहबाज शरीफ करताहेत भारताची नक्कल
10
Ayodhya Temple : राम मंदिराच्या सुरक्षेत मोठा बदल, २५० सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केले! करण काय?
11
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
12
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
13
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...
14
पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रीक बसची रेंज किती; कालच पाहिली, १,२४,००० किमी एवढे प्रचंड रनिंग झालेली बस...
15
अमेरिकेने ४ कोटी रुपये किमतीचे भारतीय आंबे का नष्ट केले? एक चूक सर्वांना महागात पडली
16
मिथुन चक्रवर्ती अडचणीत, BMC कडून सात दिवसांची 'डेडलाइन', काय आहे संपूर्ण प्रकरण?
17
बारावी शिकलेली रिसेप्शनिस्ट ज्योती पाकिस्तानपर्यंत पोहोचली कशी? 'या' देशांचीही केलीय वारी
18
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
19
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
20
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?

रत्नागिरी जिल्हा दुष्काळी जाहीर करा

By admin | Updated: July 5, 2014 00:00 IST

जिल्ह्यात पाऊस नसल्याने भाताची रोपे सुकून चालली आहेत

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पाऊस नसल्याने भाताची रोपे सुकून चालली आहेत. लावणी वेळेत न झाल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. आता पाऊस पडला तरी लावणी करणे अशक्य असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा दुष्काळी जिल्हा म्हणून जाहीर करावा, अशी मागणी कुणबी सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष दादा बैकर यांनी केली आहे. कुणबी सेनेतर्फे गुरुवारी तहसीलदार वृषाली पाटील यांची भेट घेवून त्यांना निवेदन देण्यात आले. दि. २५ मे रोजी रोहिणी नक्षत्राला प्रारंभ झाल्यापासून पेरणीला सुरुवात झाली. सुरुवातीला पाऊस पडल्याने रोपे रुजून आली. येथील जमीन डोंगराळ, रेताड व खडकाळ असल्याने व सिंचनाची व्यवस्था नसल्याने पाण्याचा साठा होत नाही. पाऊस महिनाभर लांबल्याने रुजलेली रोपे सुकून चालली आहेत. पावसाअभावी लावणीची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला दिलासा मिळावा, यासाठी शासनाने दुष्काळी जिल्हा म्हणून जाहीर करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या शिष्टमंडळात शहरप्रमुख दीपक निवाते, उपशहरप्रमुख अमोल निर्मळ, चंद्रकांत मांडवकर, चिपळूण तालुकाप्रमुख काशिनाथ राणे, विठ्ठल मते, यशवंत भुवड, रवी भाताडे, गणेश फके, भारिपचे सुभाष जाधव यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)