शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्हा दुष्काळी जाहीर करा

By admin | Updated: July 5, 2014 00:00 IST

जिल्ह्यात पाऊस नसल्याने भाताची रोपे सुकून चालली आहेत

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पाऊस नसल्याने भाताची रोपे सुकून चालली आहेत. लावणी वेळेत न झाल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. आता पाऊस पडला तरी लावणी करणे अशक्य असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा दुष्काळी जिल्हा म्हणून जाहीर करावा, अशी मागणी कुणबी सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष दादा बैकर यांनी केली आहे. कुणबी सेनेतर्फे गुरुवारी तहसीलदार वृषाली पाटील यांची भेट घेवून त्यांना निवेदन देण्यात आले. दि. २५ मे रोजी रोहिणी नक्षत्राला प्रारंभ झाल्यापासून पेरणीला सुरुवात झाली. सुरुवातीला पाऊस पडल्याने रोपे रुजून आली. येथील जमीन डोंगराळ, रेताड व खडकाळ असल्याने व सिंचनाची व्यवस्था नसल्याने पाण्याचा साठा होत नाही. पाऊस महिनाभर लांबल्याने रुजलेली रोपे सुकून चालली आहेत. पावसाअभावी लावणीची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला दिलासा मिळावा, यासाठी शासनाने दुष्काळी जिल्हा म्हणून जाहीर करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या शिष्टमंडळात शहरप्रमुख दीपक निवाते, उपशहरप्रमुख अमोल निर्मळ, चंद्रकांत मांडवकर, चिपळूण तालुकाप्रमुख काशिनाथ राणे, विठ्ठल मते, यशवंत भुवड, रवी भाताडे, गणेश फके, भारिपचे सुभाष जाधव यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)