शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

प्रादेशिक योजनांमुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेला तोटाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 13:23 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील आठ प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनांच्या पाणीपट्टीच्या वसुलीपेक्षा खर्च जास्त असल्याने दरवर्षी जिल्हा परिषदेला लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे़ तरीही लोकांचे पाण्यावाचून हाल होऊ नयेत, यासाठी ना नफा, ना तोटा या तत्त्वावर या योजना चालविण्यात येत आहेत़.

ठळक मुद्देप्रादेशिक योजनांमुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेला तोटाचना नफा, ना तोटा तत्त्वावर योजना

रत्नागिरी : जिल्ह्यातील आठ प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनांच्या पाणीपट्टीच्या वसुलीपेक्षा खर्च जास्त असल्याने दरवर्षी जिल्हा परिषदेला लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे़ तरीही लोकांचे पाण्यावाचून हाल होऊ नयेत, यासाठी ना नफा, ना तोटा या तत्त्वावर या योजना चालविण्यात येत आहेत़.जिल्ह्यातील आठ प्रादेशिक योजनांमधून अनेक गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो़ या योजनांची देखभाल व दुरुस्ती जिल्हा परिषदेकडून करण्यात येते़ मागील अनेक वर्षांपासून या पाणी योजनांच्या माध्यमातून लाखो लोकांची तहान भागवली जात आहे़ तरीही काही योजनांची पाणीपट्टी वेळेवर भरली जात नसल्याने या योजनांची देखभाल दुरुस्ती करताना अडचणीचे ठरत आहे़.सन २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये देखभाल व दुरुस्तीच्या आराखड्याबाबत या योजनांसाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती़ या संपर्क अधिकाऱ्यांनी पाहणी करुन जिल्हा परिषद प्रशासनाला अहवाल सादर केला होता़, त्यानंतर या योजनांच्या एकूण स्थितीबाबत चर्चा करण्यासाठी त्या-त्या सरपंचांना निमंत्रित करण्यात आले होते़ त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीच्या सभेत थकीत पाणीपट्टीबाबत पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता़. दरम्यान, पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये आरडाओरड सुरु झाली होती़ काही ग्रामपंचायतींनी पाणीपुरवठा बंद करताच थकीत पाणीपट्टी भरणा केली़ या आठही योजनांची सन २०१७-१८मध्ये ४ कोटी ११ लाख ३८ हजार रुपये पाणीपट्टीची मागणी असतानाही केवळ ८५ लाख रुपये वसुली झाली होती़.

या योजनांवर देखभाल दुरुस्ती, वीज देयकांसह एकूण २ कोटी ५४ लाख रुपये खर्च झाला होता़ त्यामुळे जिल्हा परिषदेला ही योजना चालविताना सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात १ कोटी ६९ लाख १८ हजार रुपये नुकसान सोसावे लागले होते़, त्यावर उपाययोजना म्हणूनच थकीत ग्रामपंचायतींचा पाणी पुरवठा तत्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला होता़,

मात्र, पाणी बंद केल्याने ग्रामपंचायतींनी थकीत पाणीपट्टी भरण्याकडे विशेष लक्ष देऊन रक्कमेचा भरणा केला होता़, त्यामुळे चालू आर्थिक वर्षामध्ये या योजनांकडून पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या किती ग्रामपंचायतींची पाणीपट्टी थकीत राहिली आहे, हे आठवडाभरानंतर पुढे येणार आहे़. 

टॅग्स :zpजिल्हा परिषदRatnagiriरत्नागिरी